शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात ४० टक्के कांदा चाळीत पडून

By admin | Updated: August 26, 2016 21:59 IST

शासनाची संदिग्ध भूमिका : अडतीचा वरवर दिलासा; कांदा सडू लागल्याने शेतकरी चिंतित

 येवला : शेतकऱ्याची अडतीच्या जाचातून सुटका व्हावी म्हणून शासनाने अडत बंदचे धोरण अंगीकारले. शासनाने घेतलेला अडतमुक्तीचा निर्णय शेतकरी हिताचा असला तरी शासनाने पर्यायी व्यवस्था उभी न करता हा निर्णय घेतल्याने राबविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.शासनाने अडतीचा निर्णय घेण्याच्या काळात कांद्याचे कोसळलेले भाव शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणत असतानाच, वरवर अडतीचा दिलासा दिसत असला तरी कांद्याची पुरती वाट लागली असून, शासनाच्या संदिग्धतेमुळे शेतकऱ्याच्या चाळीत ४० टक्के कांदा पडून आहे. भाव घसरल्याने चाळीत साठवलेला हजारो क्विंटल कांदा सडत असल्याने शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.शेतकऱ्याची अडतीच्या जाचातून सुटका व्हावी म्हणून शासनाने अडत बंदचे धोरण अंगीकारले. शासनाने घेतलेला अडतमुक्तीचा निर्णय शेतकरी हिताचा असला तरी शासनाने पर्यायी व्यवस्था उभी न करता हा निर्णय घेतल्याने राबविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या खासगी मार्केटला मनमानी चालू असल्याचे निदर्शनास येत आहे. कांदा चाळीत सडून देण्यापेक्षा अडत परवडली असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. मार्केटला येत असलेल्या उन्हाळ कांद्याला आॅक्टोबरअखेरपर्यंत चांगले दिवस असायचे. आगामी ४० दिवसात सुट्ट्या वजा जाता २७ दिवस मार्केटचे काम चालणार आहे. शिल्लक उन्हाळ कांद्याला भाव नाही आणि उठावही नाही.बाजार समितीच्या जुन्या प्रचलित पद्धतीत मार्केट कमिटीची हमी असल्याने शेतकऱ्याची फसवणूक होत नव्हती. शासनाच्या शेतकरी हिताच्या अडत रद्द धोरणात भांडवलदार अडत्या बाजूला करताना समांतर खरेदीदार यंत्रणा शासन तयार करण्यास असमर्थ ठरली आहे. त्यामुळे आपला माल इतरत्र विकला तर पैसे तर बुडणार नाही ना, अशी शंका शेतकऱ्यांना आहे. पारदर्शक व्यवहार, फसवणूक, पेमेंट यावर आता खाजगी ठिकाणी कोणाचेही सध्या नियंत्रण असणार नाही. शासनाने शेतकऱ्यांना आपल्या मालाची निर्धोक व खात्रीशीर विक्री करता यावी अशी कोणतीही समांतर व्यवस्था केलेली नसल्याने, अडत रद्दच्या चांगल्या निर्णयाला ग्रहण लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून शासनाने मार्ग काढला पाहिजे. आशावादी शेतकरी मात्र पुन्हा कांद्याची तयार रोपे लागवड करण्याच्या धावपळीत दिसत आहे. (वार्ताहर)