शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

यंदा २५ टक्केच द्राक्ष निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:14 IST

जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीला कोरोनाचा फटका बसला असून, साडेतीन लाख मेट्रिक टन द्राक्ष पडून असून, मागील वर्षाच्या तुलनेत केवळ यंदा केवळ २५ टक्के निर्यात झाली आहे. त्यामुळे उत्पादकांचे धाबे दणाणले आहे. मागील वर्षी २०१८-१९ साली २ लाख ४६ हजार १३३ मेट्रिक टन द्राक्ष निर्यातीनंतर भारताला मिळालेले २३३५ कोटी रुपयांचे परकीय चलन घटून मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्केच मिळेल असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : तीन लाख मेट्रिक टन माल पडून, उत्पादक धास्तावले

शेखर देसाई।लासलगाव : जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीला कोरोनाचा फटका बसला असून, साडेतीन लाख मेट्रिक टन द्राक्ष पडून असून, मागील वर्षाच्या तुलनेत केवळ यंदा केवळ २५ टक्के निर्यात झाली आहे. त्यामुळे उत्पादकांचे धाबे दणाणले आहे.मागील वर्षी २०१८-१९ साली २ लाख ४६ हजार १३३ मेट्रिक टन द्राक्ष निर्यातीनंतर भारताला मिळालेले २३३५ कोटी रुपयांचे परकीय चलन घटून मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्केच मिळेल असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.कधी अवकाळी तर तर अस्मानी संकटाचा सामना करणारे द्राक्ष बागायतदारांना यावर्षी चांगले दर मिळण्याची शक्यता आता कोरोनामुळे धुळीस मिळाली आहे. त्यामुळे देशाला आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. नाशिक जिल्हा द्राक्षाचे आगारच आहे. निर्यातक्षम द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.नाशिक जिल्हा व परिसरामध्ये अजूनही ६० हजार एकरच्या जवळपास द्राक्षबागा तयार असून साधारणत: साडेतीन ते चार लाख मेट्रिक टन द्राक्ष अजूनही पडून आहे. कोरोनामुळे मजुरांअभावी द्राक्ष निर्यात पूर्णत: कोलमडली असून निर्यातक्षम द्राक्ष २० ते २२ रुपये प्रतिकिलोने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, मात्र इतके कमी दर असूनही द्राक्षाला ग्राहक नसल्याने शेतकºयांना या द्राक्षाचे बेदाणे करावे लागत आहे.संचारबंदी असल्याने मजूर मिळणे कठीणनाशिक जिल्ह्यातून १८ देशांमध्ये आतापर्यंत द्राक्षाची निर्यात करण्यात आलेली आहे. द्राक्ष पंढरी असलेल्या जिल्ह्यात द्राक्षाचा हंगाम संपत आला असताना कोरोनाचा फटका बसला आहे. देशभरात लॉकडाउन आणि संचारबंदी असल्याने मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे साडेतीन ते चार लाख मेट्रिक टन द्राक्षाचे पुढे काय करायचे असा प्रश्न उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे. यंदाच्या हंगामामध्ये नाशिक जिल्ह्यातून ८३ हजार ५०० मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. जिल्ह्यातील द्राक्षे सातासमुद्रापार असणाºया अनेक देशात निर्यात होतात. परिसरातील शेतकरी प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटांवर मात करून गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादन घेतात. यावर्षी तर अवकाळीमुळे निर्माण झालेले खराब वातावरण अशी प्रचंड मेहनत घेत शेतकºयांनी निर्यातक्षम द्राक्षबागा वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यातच कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने डोके वर काढल्याने त्याचा द्राक्ष निर्यातीला मोठा फटका बसतो आहे. मागील ४ एप्रिलपर्यंत वर्षी जिल्ह्यातून १ लाख ९ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली होती, मात्र या कोरोना संकटामुळे यंदा द्राक्ष निर्यात रोडावली असून, मोठ्या प्रमाणात द्राक्ष हे बागेतच पडून आहेत.देशभरात संचारबंदी लागू करण्यात आल्याने द्राक्षासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. बागायतदारांकडे असलेले मजूर भीतीपोटी निघून गेले आहेत. द्राक्ष काढण्याबरोबरच पॅकेजिंगसाठीदेखील कामगार लागतात, मात्र संचारबंदीमुळे पाचपेक्षा अधिक कामगार जमण्यास परवानगी नसल्याने त्याचीदेखील अडचण निर्माण झाल्यानेच याचा फटका द्राक्षबागेला बसला आहे.- जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघवर्षनिहाय द्राक्ष निर्यात व मिळालेले परकीय चलन२०१५-१६ - १३२६४७ मेट्रिक टन - १३६२.२७ कोटी२०१६-१७ - १९८४७१ मेट्रिक टन - १७८१.७१ कोटी२०१७-१८ - १८८२२१ मेट्रिक टन - १९०० कोटी२०१८-१९ - २४६१३३ मेट्रिक टन - २३३५ कोटी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarketबाजार