शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
4
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
5
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
6
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
7
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
8
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
9
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
10
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
11
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
12
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
13
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
14
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
15
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
16
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
17
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
18
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
19
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
20
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ

गतवर्षाच्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:47 IST

गत वर्षी सरासरीपेक्षा ११३ टक्के झालेले पर्जन्यमान व राज्य सरकारने दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ केलेले असतानाही जिल्ह्णात यंदा गत वर्षाच्या तुलनेत शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ झाली असून, मार्चअखेर २३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याने शेतकरी कर्जमाफी फोल ठरल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

नाशिक : गत वर्षी सरासरीपेक्षा ११३ टक्के झालेले पर्जन्यमान व राज्य सरकारने दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ केलेले असतानाही जिल्ह्णात यंदा गत वर्षाच्या तुलनेत शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ झाली असून, मार्चअखेर २३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याने शेतकरी कर्जमाफी फोल ठरल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, चालू वर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक म्हणजे दहा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.  गेल्या वर्षी जिल्ह्णात सर्वत्र समाधानकारक पर्जन्यमान होऊन खरीप हंगामाची पीक पैसेवारी ५० पैशांहून अधिक नोंदविली गेली होती. शिवाय जिल्ह्यातील धरणेही शंभर टक्के फुल्ल होऊन नद्या, नाले दुथडी भरून वाहिले त्यामुळे शेतकºयांना ‘अच्छे दिन’ आल्याची अपेक्षा व्यक्त केली गेली. त्यातच राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान योजना लागू करून कर्जदार शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ केले. नाशिक जिल्ह्णातील सुमारे ९० हजारांच्या आसपास शेतकºयांना याचा लाभ मिळाला. असे असतानाही शेतकºयांच्या आत्महत्या कमी होतील असा अंदाज बांधला जात असताना सन २०१७ मध्ये डिसेंबरअखेर १०४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. तोच कित्ता चालू वर्षीही सुरू असून, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जिल्ह्णात २३ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. गत वर्षाच्या तुलनेत सातने संख्येत वाढ झाली आहे. गत वर्षी जानेवारी ते मार्च या काळात १६ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा मात्र संख्या २३ वर पोहोचली आहे. चालू वर्षी जानेवारीत ९, फेब्रुवारी ४ व मार्च महिन्यात दहा शेतकºयांनी आत्महत्या केल्याने प्रशासन यंत्रणाही हादरली आहे.घोषणा हवेतचजिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटना पाहता कर्जमाफीची मात्रा शेतकºयांना फारशी लागू पडली नसल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. मध्यंतरीच्या काळात अवकाळी पावसाने घातलेले थैमान, गारपीट, कापसावरील बोंडअळी यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले असून, कांद्याच्या भावात दरदिवसा घसरण होऊ लागली आहे तर मक्याचे अमाप पीक येऊनही पाहिजे त्याप्रमाणात दर न मिळाल्याने नाराजी आहे. द्राक्षपिकावर हवामानाचा परिणाम झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी जवळचा मार्ग म्हणून आत्महत्येला प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे शेतकरी आत्महत्या रोखण्याची जिल्हा प्रशासनाची घोषणाही हवेतच विरली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या