शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

गतवर्षाच्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:47 IST

गत वर्षी सरासरीपेक्षा ११३ टक्के झालेले पर्जन्यमान व राज्य सरकारने दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ केलेले असतानाही जिल्ह्णात यंदा गत वर्षाच्या तुलनेत शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ झाली असून, मार्चअखेर २३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याने शेतकरी कर्जमाफी फोल ठरल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

नाशिक : गत वर्षी सरासरीपेक्षा ११३ टक्के झालेले पर्जन्यमान व राज्य सरकारने दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ केलेले असतानाही जिल्ह्णात यंदा गत वर्षाच्या तुलनेत शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ झाली असून, मार्चअखेर २३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याने शेतकरी कर्जमाफी फोल ठरल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, चालू वर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक म्हणजे दहा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.  गेल्या वर्षी जिल्ह्णात सर्वत्र समाधानकारक पर्जन्यमान होऊन खरीप हंगामाची पीक पैसेवारी ५० पैशांहून अधिक नोंदविली गेली होती. शिवाय जिल्ह्यातील धरणेही शंभर टक्के फुल्ल होऊन नद्या, नाले दुथडी भरून वाहिले त्यामुळे शेतकºयांना ‘अच्छे दिन’ आल्याची अपेक्षा व्यक्त केली गेली. त्यातच राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान योजना लागू करून कर्जदार शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ केले. नाशिक जिल्ह्णातील सुमारे ९० हजारांच्या आसपास शेतकºयांना याचा लाभ मिळाला. असे असतानाही शेतकºयांच्या आत्महत्या कमी होतील असा अंदाज बांधला जात असताना सन २०१७ मध्ये डिसेंबरअखेर १०४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. तोच कित्ता चालू वर्षीही सुरू असून, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जिल्ह्णात २३ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. गत वर्षाच्या तुलनेत सातने संख्येत वाढ झाली आहे. गत वर्षी जानेवारी ते मार्च या काळात १६ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा मात्र संख्या २३ वर पोहोचली आहे. चालू वर्षी जानेवारीत ९, फेब्रुवारी ४ व मार्च महिन्यात दहा शेतकºयांनी आत्महत्या केल्याने प्रशासन यंत्रणाही हादरली आहे.घोषणा हवेतचजिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटना पाहता कर्जमाफीची मात्रा शेतकºयांना फारशी लागू पडली नसल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. मध्यंतरीच्या काळात अवकाळी पावसाने घातलेले थैमान, गारपीट, कापसावरील बोंडअळी यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले असून, कांद्याच्या भावात दरदिवसा घसरण होऊ लागली आहे तर मक्याचे अमाप पीक येऊनही पाहिजे त्याप्रमाणात दर न मिळाल्याने नाराजी आहे. द्राक्षपिकावर हवामानाचा परिणाम झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी जवळचा मार्ग म्हणून आत्महत्येला प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे शेतकरी आत्महत्या रोखण्याची जिल्हा प्रशासनाची घोषणाही हवेतच विरली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या