शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

अनुदान चुकीच्या खात्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 01:36 IST

गेल्यावर्षी दुष्काळी म्हणून जाहीर केलेल्या बागलाण तालुक्यातील लाभार्थ्यांचे दुष्काळी अनुदान चुकीच्या खाते क्रमांकावर वर्ग केल्याचा प्रकार सटाणा तहसील कार्यालयाने केल्याने लाभार्थी गेल्या दोन महिन्यांपासून लाभापासून वंचित असल्याची तक्रार समोर आली आहे.

नाशिक : गेल्यावर्षी दुष्काळी म्हणून जाहीर केलेल्या बागलाण तालुक्यातील लाभार्थ्यांचे दुष्काळी अनुदान चुकीच्या खाते क्रमांकावर वर्ग केल्याचा प्रकार सटाणा तहसील कार्यालयाने केल्याने लाभार्थी गेल्या दोन महिन्यांपासून लाभापासून वंचित असल्याची तक्रार समोर आली आहे. विशेष म्हणजे बॅँकेनेदेखील चुकीच्या खाते क्रमांकाबाबत तहसील कार्यालयाला कळवूनही त्यात अजूनही सुधारणा करण्यात आली नसल्याने सर्वसामान्य लाभार्थी वेठीस धरले जात आहेत.गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागला. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांपैकी बागलाण तालुक्याचाही समावेश केला. शासनाच्या नियमाप्रमाणे दुष्काळी अनुदान जिल्ह्णाला प्राप्त झाल्यानंतर यंदा एप्रिल-मे महिन्यात दुष्काळी अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. मात्र सदर अनुदान वर्ग करताना अनेकांचे खाते क्रमांकच चुकल्यामुळे त्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तहसील कार्यालयाने लाभार्थ्यांचे अनुदान बॅँक खातेक्रमांकासह बॅँकेत वर्ग केले मात्र त्यांना बॅँकेने चुकीच्या क्रमांकाबद्दल कळूनही अद्यापही त्यात सुधारणा करण्यात आली नसल्याचे समजते. लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. पहिल्या टप्प्याचेच अद्याप अनुदान मिळाले नसल्याने दुसऱ्या टप्प्याचा प्रश्नच नसल्याचेही तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे तहसील कर्यालयातून बॅँकेत, बॅँकेतून तहसील कार्यालयात आणि तहसील कार्यालयातून तलाठी कार्यालय अशी पायपीट करावी लागत आहे. तहसील कार्यालयाने तलाठी कार्यालयाकडे बोट दाखवून तलाठी कार्यालयातून दुरुस्ती करवून आणण्याच्या सूचना लाभार्थ्यांनी केलेल्या आहेत. या प्रकारामुळे मात्र वयोवृद्धांना गेल्या दोन महिन्यांपासून कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.कर्मचाऱ्यांचा असहकारतहसील कार्यालयातील संबंधित कर्मचारी हे ११ वाजता कामावर येत असल्याची तक्रार असून, दुपारी ३ ते ४ जेवणाच्या सुट्टीच्या नावाखाली काम ठप्प असल्याची तक्रारदेखील वंचित लाभार्थ्यांकडून करण्यात आलेली आहे.असा कोणताही प्रकार घडलेला नाही. दुष्काळी अनुदान दोन टप्प्यांत आलेले आहे. पहिल्या टप्प्यात कोणतीही तक्रार नसताना दुसºया टप्प्यात तक्रार असण्याचे काही कारण नाही. ज्या काही त्रुटी होत्या त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत.- जितेंद्र इंगळे, तहसीलदार, सटाणा

टॅग्स :droughtदुष्काळnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय