शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

अनुदान चुकीच्या खात्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 01:36 IST

गेल्यावर्षी दुष्काळी म्हणून जाहीर केलेल्या बागलाण तालुक्यातील लाभार्थ्यांचे दुष्काळी अनुदान चुकीच्या खाते क्रमांकावर वर्ग केल्याचा प्रकार सटाणा तहसील कार्यालयाने केल्याने लाभार्थी गेल्या दोन महिन्यांपासून लाभापासून वंचित असल्याची तक्रार समोर आली आहे.

नाशिक : गेल्यावर्षी दुष्काळी म्हणून जाहीर केलेल्या बागलाण तालुक्यातील लाभार्थ्यांचे दुष्काळी अनुदान चुकीच्या खाते क्रमांकावर वर्ग केल्याचा प्रकार सटाणा तहसील कार्यालयाने केल्याने लाभार्थी गेल्या दोन महिन्यांपासून लाभापासून वंचित असल्याची तक्रार समोर आली आहे. विशेष म्हणजे बॅँकेनेदेखील चुकीच्या खाते क्रमांकाबाबत तहसील कार्यालयाला कळवूनही त्यात अजूनही सुधारणा करण्यात आली नसल्याने सर्वसामान्य लाभार्थी वेठीस धरले जात आहेत.गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागला. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांपैकी बागलाण तालुक्याचाही समावेश केला. शासनाच्या नियमाप्रमाणे दुष्काळी अनुदान जिल्ह्णाला प्राप्त झाल्यानंतर यंदा एप्रिल-मे महिन्यात दुष्काळी अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. मात्र सदर अनुदान वर्ग करताना अनेकांचे खाते क्रमांकच चुकल्यामुळे त्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तहसील कार्यालयाने लाभार्थ्यांचे अनुदान बॅँक खातेक्रमांकासह बॅँकेत वर्ग केले मात्र त्यांना बॅँकेने चुकीच्या क्रमांकाबद्दल कळूनही अद्यापही त्यात सुधारणा करण्यात आली नसल्याचे समजते. लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. पहिल्या टप्प्याचेच अद्याप अनुदान मिळाले नसल्याने दुसऱ्या टप्प्याचा प्रश्नच नसल्याचेही तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे तहसील कर्यालयातून बॅँकेत, बॅँकेतून तहसील कार्यालयात आणि तहसील कार्यालयातून तलाठी कार्यालय अशी पायपीट करावी लागत आहे. तहसील कार्यालयाने तलाठी कार्यालयाकडे बोट दाखवून तलाठी कार्यालयातून दुरुस्ती करवून आणण्याच्या सूचना लाभार्थ्यांनी केलेल्या आहेत. या प्रकारामुळे मात्र वयोवृद्धांना गेल्या दोन महिन्यांपासून कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.कर्मचाऱ्यांचा असहकारतहसील कार्यालयातील संबंधित कर्मचारी हे ११ वाजता कामावर येत असल्याची तक्रार असून, दुपारी ३ ते ४ जेवणाच्या सुट्टीच्या नावाखाली काम ठप्प असल्याची तक्रारदेखील वंचित लाभार्थ्यांकडून करण्यात आलेली आहे.असा कोणताही प्रकार घडलेला नाही. दुष्काळी अनुदान दोन टप्प्यांत आलेले आहे. पहिल्या टप्प्यात कोणतीही तक्रार नसताना दुसºया टप्प्यात तक्रार असण्याचे काही कारण नाही. ज्या काही त्रुटी होत्या त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत.- जितेंद्र इंगळे, तहसीलदार, सटाणा

टॅग्स :droughtदुष्काळnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय