शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

विश्व जलशांती यात्रा काढणार

By admin | Updated: July 1, 2015 01:41 IST

विश्व जलशांती यात्रा काढणार

नाशिक : जगाला पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी, जलसाक्षरतेचा जागर करण्यासाठी प्रख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह हे उद्यापासून (दि. १) विश्व जलशांती यात्रा काढणार असून, तब्बल पाच वर्षे चालणाऱ्या या यात्रेचा प्रारंभ नाशकातून होणार आहे. डॉ. सिंह उद्या नाशकात वृक्षारोपण करून यात्रेसाठी जर्मनीकडे रवाना होणार आहेत.जलसंकटामुळे ओसाड झालेल्या राजस्थानमधील काही गावांत हिरवाई फुलवणाऱ्या डॉ. सिंह यांनी हाच वसा जगाला देण्यासाठी या विश्वयात्रेचे आयोजन केले आहे. यासंदर्भात डॉ. सिंह म्हणाले, जेथे पाणी असते, तेथे सुख-समृद्धी वास करते. त्यामुळे जगामध्ये जलसाक्षरता वाढवण्याची गरज आहे. त्यातून जलयुद्धाऐवजी जलशांती निर्माण होऊ शकेल. या पार्श्वभूमीवर आपण पुढील पाच वर्षे जगभरात भ्रमंती करणार असून, पहिला दौरा जर्मनीचा केला जाईल. तेथील दहा-बारा शहरांना भेटी दिल्यानंतर आपण भारतात परत येऊ. त्यानंतर इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स चार्ल्स यांच्या आमंत्रणावरून इंग्लंडच्या दौऱ्यावर जाऊ. तेथे थेम्स नदीला आलेल्या पुरासाठी आपल्या सूचनांनुसार उपाययोजना सुरू आहेत. या दौऱ्यात त्यांची पाहणी केली जाईल. त्यानंतर स्टॉकहोम, स्वीडन अशा अनेक देशांचे दौरे करून तेथील लोकांना नद्यांचे महत्त्व पटवून देणार आहोत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या यात्रेला नाशकातून प्रारंभ करीत आहोत. नीर, नदी व नारी यांचा सन्मान हा कुंभमेळ्याचा मूळ उद्देश होता; मात्र कालौघात तो हरवला. येत्या कुंभमेळ्यात लोकांना हा खरा अर्थ पटवून देण्याची चांगली संधी आहे. ‘ग्रीन कुंभ’ या संकल्पनेची मुहूर्तमेढ नाशकातून करून देशापुढे आदर्श निर्माण करण्याची गरज आहे, असेही डॉ. सिंह म्हणाले.