शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

विश्व जलशांती यात्रा काढणार

By admin | Updated: July 1, 2015 01:41 IST

विश्व जलशांती यात्रा काढणार

नाशिक : जगाला पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी, जलसाक्षरतेचा जागर करण्यासाठी प्रख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह हे उद्यापासून (दि. १) विश्व जलशांती यात्रा काढणार असून, तब्बल पाच वर्षे चालणाऱ्या या यात्रेचा प्रारंभ नाशकातून होणार आहे. डॉ. सिंह उद्या नाशकात वृक्षारोपण करून यात्रेसाठी जर्मनीकडे रवाना होणार आहेत.जलसंकटामुळे ओसाड झालेल्या राजस्थानमधील काही गावांत हिरवाई फुलवणाऱ्या डॉ. सिंह यांनी हाच वसा जगाला देण्यासाठी या विश्वयात्रेचे आयोजन केले आहे. यासंदर्भात डॉ. सिंह म्हणाले, जेथे पाणी असते, तेथे सुख-समृद्धी वास करते. त्यामुळे जगामध्ये जलसाक्षरता वाढवण्याची गरज आहे. त्यातून जलयुद्धाऐवजी जलशांती निर्माण होऊ शकेल. या पार्श्वभूमीवर आपण पुढील पाच वर्षे जगभरात भ्रमंती करणार असून, पहिला दौरा जर्मनीचा केला जाईल. तेथील दहा-बारा शहरांना भेटी दिल्यानंतर आपण भारतात परत येऊ. त्यानंतर इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स चार्ल्स यांच्या आमंत्रणावरून इंग्लंडच्या दौऱ्यावर जाऊ. तेथे थेम्स नदीला आलेल्या पुरासाठी आपल्या सूचनांनुसार उपाययोजना सुरू आहेत. या दौऱ्यात त्यांची पाहणी केली जाईल. त्यानंतर स्टॉकहोम, स्वीडन अशा अनेक देशांचे दौरे करून तेथील लोकांना नद्यांचे महत्त्व पटवून देणार आहोत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या यात्रेला नाशकातून प्रारंभ करीत आहोत. नीर, नदी व नारी यांचा सन्मान हा कुंभमेळ्याचा मूळ उद्देश होता; मात्र कालौघात तो हरवला. येत्या कुंभमेळ्यात लोकांना हा खरा अर्थ पटवून देण्याची चांगली संधी आहे. ‘ग्रीन कुंभ’ या संकल्पनेची मुहूर्तमेढ नाशकातून करून देशापुढे आदर्श निर्माण करण्याची गरज आहे, असेही डॉ. सिंह म्हणाले.