शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक वन्यजीव सप्ताह : ‘वन्यजीव जगवा, पृथ्वी वाचवा...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 13:35 IST

सर्पदंशापासून मानवाने स्वत:ला कसे सुरक्षित ठेवावे? विषारी सर्पांचा वावर कधी व कोठे असू शकतो? याविषयीदेखील त्यांनी बारकाईने माहिती समजावून दिली.

ठळक मुद्दे‘रोडकिल’ही समस्या धोक्याची वन्यजीवांचे रस्त्यांवर मृत्यूमुखी होण्याचे प्रमाण वाढले

नाशिक : पृथ्वी सर्वांची आहे. या पृथ्वीवर केवळ माणसाने आपला हक्क स्वार्थापोटी गाजविणे चुकीचे असून निसर्गाच्या जीवसृष्टीचादेखील विचार करायला हवा, वन्यजीव जगविले तर पृथ्वी वाचेल आणि निसर्गाच्या प्रकोपापासून सुरक्षित राहू शकेल, असा सूर वन्यजीव सप्ताह शुभारंभाच्या निमित्ताने उमटला.नाशिकवनविभागाच्या वतीने मंगळवारी (दि.१) वन्यजीव सप्ताहचा शुभारंभ व राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती व प्रबोधनपर उपक्रमांविषयीची माहिती देण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. उंटवाडी रस्त्यावरील वनविश्रामगृहात झालेल्या चर्चासत्राला प्रमुख पाहूणे म्हणून सर्प अभ्यासक भरत जोशी यांच्यासह मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, उपवनसंरक्षक शिवाजी फुले, तुषार चव्हाण, विभागीय वन अधिकारी स्वप्नील घुरे, सहायक वनसंरक्षक राजेंद्र मगदुम व्यासपिठावर उपस्थित होते.यावेळी जोशी यांनी दुर्मीळ होत जाणा-या सर्पांविषयी माहिती देत अन्नसाखळीत सर्पांची भूमिका पटवून दिली. यावेळी त्यांनी महाराष्टÑात आढळणा-या विषारी, बिनविषारी सर्पांच्या प्रजातींची माहिती देत सर्पदंशनंतर उपचाराविषयीदेखील उपस्थितांना जागरूक केले. महाराष्टÑात सर्वाधिक सर्पांचा मृत्यू भीतीपोटी आणि अंधश्रध्देतून होत असल्याचे यावेळी ते म्हणाले. सर्प हा अन्नसाखळीमधील अत्यंत महत्त्वाचा सरपटणारा प्राणी आहे. सर्पदंशापासून मानवाने स्वत:ला कसे सुरक्षित ठेवावे? विषारी सर्पांचा वावर कधी व कोठे असू शकतो? याविषयीदेखील त्यांनी बारकाईने माहिती समजावून दिली.इको-एको संस्थेचे स्वयंसेवक वन्यजीवप्रेमी अभिजीत महाले यांनी वन्यजीवांचे रेस्क्यू आॅपरेशनदरम्यान घ्यावयाची खबरदारी याविषयी माहिती सांगितली. अलिकडे ‘रोडकिल’ही समस्या मानवाप्रमाणेच वन्यजीवांसाठीदेखील धोक्याची बनली आहे. वन्यजीवांचे रस्त्यांवर मृत्यूमुखी होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगून लक्ष वेधले. पक्षीमित्र अनिल माळी यांनी गिधाडसारख्या दुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्याच्यासंवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. सुदैवाने नाशिकच्या सभोवताली गिधाड अजूनही अस्तित्वात असून त्यांचे संवर्धन संरक्षण आवश्यक असून त्यासाठी ‘गिधाड संरक्षित क्षेत्र’ तत्काळ विकसीत होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी टी.जे.चौहान बिटको विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह विविध संस्थांचे स्वयंसेवक उपस्थित होते. आभार वनसंरक्षक गणेश झोळे यांनी मानले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवNashikनाशिकforest departmentवनविभाग