शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

महापुरात वाहून गेला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 1:02 AM

गंगापूररोड व आनंदवली भागातील बंगल्यांमध्ये धुणेभांडी घरकाम, रोजंदारीवर काम करून कुटुंबाचे पालनपोषण करणारे आनंदवली, बजरंगनगर व शिवनगर भागातील नागरिकांचे महापुरामुळे जगणे मुश्कील करून टाकले. त्यांच्या घरांची पडझड झाली, पत्रे उडाले, घरांतील संसार गोदावरी नदीला आलेल्या महापुरात वाहून गेला.

गंगापूर : गंगापूररोड व आनंदवली भागातील बंगल्यांमध्ये धुणेभांडी घरकाम, रोजंदारीवर काम करून कुटुंबाचे पालनपोषण करणारे आनंदवली, बजरंगनगर व शिवनगर भागातील नागरिकांचे महापुरामुळे जगणे मुश्कील करून टाकले. त्यांच्या घरांची पडझड झाली, पत्रे उडाले, घरांतील संसार गोदावरी नदीला आलेल्या महापुरात वाहून गेला.आनंदवली, शिवनगर, बजरंगनगर परिसरातील नागरिकांचे महापुरात मोठे नुकसान झाले. रात्रीच्या सुमारास गोदावरी नदीपात्रातील पाणी जसजसे वाढू लागले तसतसे गंगापूर, आनंदवली भागातील शिवनगर, बजरंगनगर भागातील नागरिकांची तारांबळ उडाली.अचानकपणे पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने नागरिकांना आपले साहित्य वाहून नेण्यासाठीही वेळ मिळाला नसल्याने या भागातील नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेला. घरातील प्रत्येक वस्तू गोदेच्या पुरात वाहून गेली. पायाच्या गुडघ्यापर्यंत पाणी आल्यानंतर असे वाटले की कमी होईल म्हणून आम्ही कोणीच जास्त काळजी घेतली नाही, पण नंतर पाणी पंधरा मिनिटात वाढून कमरेपर्यंत पोहोचले आणि लेकराबाळांचा आणि स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आम्हाला काहीच वाचवायला वेळच मिळाला नाही. आनंदवलीमधील बजरंगनगर, शिवनगरची अवस्था अशी बिकट होती. त्यानंतर त्यांना महापालिकेच्या शाळेत हलवण्यात आले. तिथे त्यांची राहण्याची आणि दोन वेळच्या खिचडीची व्यवस्था करण्यात आली. पण प्रशासनाचे लोक आमच्या घराचे नुकसान बघायलादेखील फिरकले नसल्याची व्यथा येथील रहिवाशांनी मांडली. आनंदवली व चांदशी गावाला जोडणाऱ्या महापालिकेने बांधलेल्या नवीन पुलापर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने मोठा परिसर महापुराच्या पाण्याखाली गेला होता. साधारण १२० घरांचे नुकसान झाल्याचे समजते. शासनाच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला १० किलो तांदूळ, १० किलो गहू मोफत वाटण्याचे काम सध्या सुरू आहे.घराच्या पत्रांच्या वरपर्यंत पाणी गेले होते. सर्व भिंती भिजून आता त्या ओल्या झाल्याने कधी पडतील सांगत येत नाही, आम्ही आमचा जीव धोक्यात घेऊन राहत आहोत. घरातील सर्व वस्तू वाहून गेल्याने आमचे खूप नुकसान झाले आहे.- सरूबाई साबळे, बजरंगनगर, आनंदवलीदुकानातील किराणा सामान आणि घरातील फ्रीज, टीव्ही आणि अन्य सर्व वस्तू वाहून गेल्या. हजारो रु पयांचे नुकसान झाले आहे, मात्र अजून कोणतीही मदत मिळाली नाही.- कमळाबाई सांगळे, बजरंगनगरगोदावरी नदीला आलेल्या पुराचे पाणी संपूर्ण घरात शिरले होते. घरातील जितक्या वस्तू हाती लागल्या तितक्या घेतल्या, लहान मुलांना कवटाळून महापालिकेच्या शाळेजवळच जाऊन आसरा घेतला. घराच्या भिंतींसह धान्य, कपडे, कपाट सगळं वाहून गेलं.- सरला महाजन, बजरंगनगरमहापुरामुळे आमच्या घरात पाणी शिरले. लाकडाचे कपाट, सर्व मौल्यवान वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने आता सरकार काय मदत देते त्यांच्या आशेवर बसलोय. सरकारने लवकरात लवकर मदत करून गरिबांचे कल्याण करावे हीच इच्छा आहे.- इंदुबाई दराडे, शिवनगर, आनंदवलीनदीच्या पुराचे पाणी घरात शिरल्याने लाकडी फळ्यांवर असलेली भांडी पुन्हा हाती लागली नाही. गॅस शेगडी सिलिंडर पोरांनी बाहेर घेऊन पळ काढल्याने पुन्हा चूल मांडली.- संजय धुमाळ, आनंदवलीरविवारी सकाळी आलेल्या पुराचे पाणी आमच्या घरात शिरल्याने सर्व संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. घराचे पत्रे वाहून गेले, भिंती पडल्या, आम्ही कसाबसा जीव वाचवत सगळे साहित्य सोडून पळालो. मात्र सगळीकडे पाणीच पाणी होते.- ज्योती सांगळे, बजरंगनगर, रहिवासी

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय