शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

महापुरात वाहून गेला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 01:03 IST

गंगापूररोड व आनंदवली भागातील बंगल्यांमध्ये धुणेभांडी घरकाम, रोजंदारीवर काम करून कुटुंबाचे पालनपोषण करणारे आनंदवली, बजरंगनगर व शिवनगर भागातील नागरिकांचे महापुरामुळे जगणे मुश्कील करून टाकले. त्यांच्या घरांची पडझड झाली, पत्रे उडाले, घरांतील संसार गोदावरी नदीला आलेल्या महापुरात वाहून गेला.

गंगापूर : गंगापूररोड व आनंदवली भागातील बंगल्यांमध्ये धुणेभांडी घरकाम, रोजंदारीवर काम करून कुटुंबाचे पालनपोषण करणारे आनंदवली, बजरंगनगर व शिवनगर भागातील नागरिकांचे महापुरामुळे जगणे मुश्कील करून टाकले. त्यांच्या घरांची पडझड झाली, पत्रे उडाले, घरांतील संसार गोदावरी नदीला आलेल्या महापुरात वाहून गेला.आनंदवली, शिवनगर, बजरंगनगर परिसरातील नागरिकांचे महापुरात मोठे नुकसान झाले. रात्रीच्या सुमारास गोदावरी नदीपात्रातील पाणी जसजसे वाढू लागले तसतसे गंगापूर, आनंदवली भागातील शिवनगर, बजरंगनगर भागातील नागरिकांची तारांबळ उडाली.अचानकपणे पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने नागरिकांना आपले साहित्य वाहून नेण्यासाठीही वेळ मिळाला नसल्याने या भागातील नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेला. घरातील प्रत्येक वस्तू गोदेच्या पुरात वाहून गेली. पायाच्या गुडघ्यापर्यंत पाणी आल्यानंतर असे वाटले की कमी होईल म्हणून आम्ही कोणीच जास्त काळजी घेतली नाही, पण नंतर पाणी पंधरा मिनिटात वाढून कमरेपर्यंत पोहोचले आणि लेकराबाळांचा आणि स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आम्हाला काहीच वाचवायला वेळच मिळाला नाही. आनंदवलीमधील बजरंगनगर, शिवनगरची अवस्था अशी बिकट होती. त्यानंतर त्यांना महापालिकेच्या शाळेत हलवण्यात आले. तिथे त्यांची राहण्याची आणि दोन वेळच्या खिचडीची व्यवस्था करण्यात आली. पण प्रशासनाचे लोक आमच्या घराचे नुकसान बघायलादेखील फिरकले नसल्याची व्यथा येथील रहिवाशांनी मांडली. आनंदवली व चांदशी गावाला जोडणाऱ्या महापालिकेने बांधलेल्या नवीन पुलापर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने मोठा परिसर महापुराच्या पाण्याखाली गेला होता. साधारण १२० घरांचे नुकसान झाल्याचे समजते. शासनाच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला १० किलो तांदूळ, १० किलो गहू मोफत वाटण्याचे काम सध्या सुरू आहे.घराच्या पत्रांच्या वरपर्यंत पाणी गेले होते. सर्व भिंती भिजून आता त्या ओल्या झाल्याने कधी पडतील सांगत येत नाही, आम्ही आमचा जीव धोक्यात घेऊन राहत आहोत. घरातील सर्व वस्तू वाहून गेल्याने आमचे खूप नुकसान झाले आहे.- सरूबाई साबळे, बजरंगनगर, आनंदवलीदुकानातील किराणा सामान आणि घरातील फ्रीज, टीव्ही आणि अन्य सर्व वस्तू वाहून गेल्या. हजारो रु पयांचे नुकसान झाले आहे, मात्र अजून कोणतीही मदत मिळाली नाही.- कमळाबाई सांगळे, बजरंगनगरगोदावरी नदीला आलेल्या पुराचे पाणी संपूर्ण घरात शिरले होते. घरातील जितक्या वस्तू हाती लागल्या तितक्या घेतल्या, लहान मुलांना कवटाळून महापालिकेच्या शाळेजवळच जाऊन आसरा घेतला. घराच्या भिंतींसह धान्य, कपडे, कपाट सगळं वाहून गेलं.- सरला महाजन, बजरंगनगरमहापुरामुळे आमच्या घरात पाणी शिरले. लाकडाचे कपाट, सर्व मौल्यवान वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने आता सरकार काय मदत देते त्यांच्या आशेवर बसलोय. सरकारने लवकरात लवकर मदत करून गरिबांचे कल्याण करावे हीच इच्छा आहे.- इंदुबाई दराडे, शिवनगर, आनंदवलीनदीच्या पुराचे पाणी घरात शिरल्याने लाकडी फळ्यांवर असलेली भांडी पुन्हा हाती लागली नाही. गॅस शेगडी सिलिंडर पोरांनी बाहेर घेऊन पळ काढल्याने पुन्हा चूल मांडली.- संजय धुमाळ, आनंदवलीरविवारी सकाळी आलेल्या पुराचे पाणी आमच्या घरात शिरल्याने सर्व संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. घराचे पत्रे वाहून गेले, भिंती पडल्या, आम्ही कसाबसा जीव वाचवत सगळे साहित्य सोडून पळालो. मात्र सगळीकडे पाणीच पाणी होते.- ज्योती सांगळे, बजरंगनगर, रहिवासी

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय