शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

एकाच टॉवरवर चार कंपन्यांचा संसार....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 14:37 IST

सायखेडा : विज्ञान आणि तंत्रज्ञानाने भरपूर प्रगती साधली असली तरी आजही ग्रामीण भागासह खेड्या पाड्यात वाड्यावस्तीत विकसीत व अद्ययावत तंत्रज्ञान पोहचले नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. गोदाकाठ परीसरात स्वतंत्र विविध कंपन्याचे मोबाईल रेंजसाठी टॉवर उपलब्ध असून मोबाईल धारकांना पुरेसा रेंज मिळत नसल्याने मोबाईलधारक त्रस्त झाले आहे.

ठळक मुद्देसायखेडा : गोदाकाठ परीसरात मोबाईल रेंज नसल्याने ग्राहक हैराण

सायखेडा : विज्ञान आणि तंत्रज्ञानाने भरपूर प्रगती साधली असली तरी आजही ग्रामीण भागासह खेड्या पाड्यात वाड्यावस्तीत विकसीत व अद्ययावत तंत्रज्ञान पोहचले नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. गोदाकाठ परीसरात स्वतंत्र विविध कंपन्याचे मोबाईल रेंजसाठी टॉवर उपलब्ध असून मोबाईल धारकांना पुरेसा रेंज मिळत नसल्याने मोबाईलधारक त्रस्त झाले आहे.गेल्या काही महिन्यात मोबाइल कंपन्यांनी ग्राहकांना अक्षरश: सर्वच पातळ्यांवर मेटाकुटीला आणले आहे. ‘फोर जी’ सेवा असताना सायखेडा परीसरात मोबाईलला टूजी किंवा थ्री जी रेंज मिळत आहे. इंटरनेटची परिस्थितीत तर याहून वाईट असून डिजिटल इंडियाचा बोऱ्या वाजला आहे. स्थानिक कर अथवा शासकीय महसूल बुडविण्यासाठी एकाच टॉवरवर चार चार कंपन्यांचा संसार चालू आहे.कंपन्यांच्या वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत कोठेही तक्र ार केली. तरी त्याचाउपयोगनाही. परीसरात सध्या अनेक नामांकित कंपन्यांच्या मोबाईल सेवा कार्यरत आहेत. मात्र, यापैकी अपवाद वगळता बहूतेक कंपन्यांच्या सेवेचा येथे पूरता फज्जा उडाला आहे.मागील कित्येक महिन्यांपासून बीएसएनएलपासून अन्य मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी गुडघे टेकले आहेत. त्यामुळे तालुक्यात मोबाइल नेटवर्क सेवा सुविधानाही. येथील इंटरनेट सेवेसह मोबाइल रेंज काही महिन्यांपासून गायब झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.कित्येकदा रेंजच गायब असते, रेंज असेल तर लाइन व्यस्त असतात. त्यामुळे बराचकाळ कॉल लागत नाही. मधूनच नेटवर्क गायब होते, नाही तर कॉलमध्ये कंजेक्शन ठरलेलेच. यातूनही जर कॉल लागला तर बोलत असतानाच तो बंदही पडतो.यासोबतच इंटरनेट सेवामधील अवस्थाही यापेक्षा दयनीय झाली आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात सातत्याने मोबाईल यंत्रणा ठप्प होऊ लागली आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्षच होते आहे. मात्र, यावेळेला ग्राहकांत संतापाची लाट अन् मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.त्यामुळे संबधीत मोबाईल सेवा देणाºया टॉवर कंपनीने वेळीच कुचकामी यंत्रणेला सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्राहक करीत आहेत.

टॅग्स :BSNLबीएसएनएलMobileमोबाइल