शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

श्रमदानाला वरुणराजाची साथ; शिवार झाले पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:44 IST

सिन्नर : रात्रीचा दिवस करीत तब्बल ५० दिवस श्रमदानाच्या माध्यमातून घाम गाळणाºया जलमित्रांच्या मदतीला वरुणराजा धावून आला आहे. शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे जलमित्रांनी तयार केलेले समतल चर, डोंगरावरील खोलगट चर, शेततळे, मातीबांध, दगडी बांध, जाळी बंधारे, सिमेंट बंधारे आणि पाझर तलावात पाण्याची आवक सुरू झाली आहे. कोनांबे परिसरात सुरू असलेल्या संततधारेने पानी फाउण्डेशनच्या कामाचे सार्थक झाले असून, सर्वच शिवार पाण्याने आबादानी झाल्याचे चित्र रविवारी पहायला मिळाले.

ठळक मुद्देसिन्नर : रात्रीचा दिवस करून राबलेल्या कष्टकऱ्यांच्या कामाचे सार्थक

सिन्नर : रात्रीचा दिवस करीत तब्बल ५० दिवस श्रमदानाच्या माध्यमातून घाम गाळणाºया जलमित्रांच्या मदतीला वरुणराजा धावून आला आहे.शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे जलमित्रांनी तयार केलेले समतल चर, डोंगरावरील खोलगट चर, शेततळे, मातीबांध, दगडी बांध, जाळी बंधारे, सिमेंट बंधारे आणि पाझर तलावात पाण्याची आवक सुरू झाली आहे. कोनांबे परिसरात सुरू असलेल्या संततधारेने पानी फाउण्डेशनच्या कामाचे सार्थक झाले असून, सर्वच शिवार पाण्याने आबादानी झाल्याचे चित्र रविवारी पहायला मिळाले.वडझिरे, हरसुले, धोंडबार या गावातील स्ट्रक्चरमध्येही संततधारेने पाणी साचले आहे. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरविण्याचे ध्येय पानी फाउण्डेशनच्या कामामुळे साध्य होताना दिसत आहे. टंचाईचा सामना करणाºया या गावांमध्ये भविष्यात येणारी आबादानी इतर गावांना खºया अर्थाने प्रेरणादायी ठरणार आहे. गेल्यावर्षीही पानी फाउण्डेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे मार्गी लागली होती; मात्र पावसाने पाठ फिरविल्याने ग्रामस्थांचा हिरमोड झाला होता. यंदाच्या पावसाने हिरमुसलेल्या चेहऱ्यांवर आनंदाची लकेर उमटण्याची अपेक्षा आहे. एप्रिल आणि मे महिन्यातीलतीव्र उष्णतेच्या लाटेत जीवनसुखकर करण्यासाठी जलमित्रांनी केलेल्या कष्टाला वरुणराजाने संततधार बरसण्यास प्रारंभ करून साथ दिली आहे.सात गावे ठरली अंतिम परीक्षणासाठी पात्र १२४ गावांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ९० गावांतील नागरिकांनी प्रशिक्षण घेतले. ५० गावे श्रमदानात प्रत्यक्ष सहभागी झाली. त्यापैकी कोनांबे, वडझिरे, पाटोळे, हिवरे, आशापूर, चास आणि हरसूले ही गावे कामांच्या पडताळणीसाठी निवडली. तर कोनांबे, वडझिरे, पाटोळे आणि हिवरे ही ४ गावे अंतिम परीक्षणास पात्र ठरली. गेल्या वर्षी वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या कोनांबे गावाने यंदा ८८ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे ते राज्यस्तरीय स्पर्धेत आहे. तर वडझिरे, पाटोळे आणि हिवरे यांच्यात तालुक्यातील प्रथम तीन क्रमांकासाठी प्रचंड चुरस आहे.प्रत्येक गावात पर्जन्यमापक महसूल विभागाकडून अंदाजे नोंदविली जाणारी पावसाची आकडेवारी शेतकºयांच्या मुळावर उठते. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी पानी फाउंडेशनने साध्या प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर करून पर्जन्यमापक बसविले आहेत. त्याचे रीडिंग घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या गावात एका व्यक्तीची पर्जन्य नोंदीसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे पाणी फाउंडेशनच्या समन्वयक सुषमा मानकर, नागेश गरड, प्रवीण डोणगावे यांनी सांगितले. वॉटरकप स्पर्धेत श्रमदान करीत ग्रामस्थांनी मोठे काम उभे केले. टंचाईवर मात करण्यासाठी सरसावलेल्या बायाबापडे आणि चिमुकल्यांचे कष्ट सार्थकी लागले आहेत. गावोगावी तयार करण्यात आलेले स्ट्रक्चर पावसाने तुडुंब भरले असून, श्रमदानाचे खºया अर्थाने चीज झाले.-सुषमा मानकर,समन्वयक, पानी फाउण्डेशन