शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

श्रमदानाला वरुणराजाची साथ; शिवार झाले पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:44 IST

सिन्नर : रात्रीचा दिवस करीत तब्बल ५० दिवस श्रमदानाच्या माध्यमातून घाम गाळणाºया जलमित्रांच्या मदतीला वरुणराजा धावून आला आहे. शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे जलमित्रांनी तयार केलेले समतल चर, डोंगरावरील खोलगट चर, शेततळे, मातीबांध, दगडी बांध, जाळी बंधारे, सिमेंट बंधारे आणि पाझर तलावात पाण्याची आवक सुरू झाली आहे. कोनांबे परिसरात सुरू असलेल्या संततधारेने पानी फाउण्डेशनच्या कामाचे सार्थक झाले असून, सर्वच शिवार पाण्याने आबादानी झाल्याचे चित्र रविवारी पहायला मिळाले.

ठळक मुद्देसिन्नर : रात्रीचा दिवस करून राबलेल्या कष्टकऱ्यांच्या कामाचे सार्थक

सिन्नर : रात्रीचा दिवस करीत तब्बल ५० दिवस श्रमदानाच्या माध्यमातून घाम गाळणाºया जलमित्रांच्या मदतीला वरुणराजा धावून आला आहे.शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे जलमित्रांनी तयार केलेले समतल चर, डोंगरावरील खोलगट चर, शेततळे, मातीबांध, दगडी बांध, जाळी बंधारे, सिमेंट बंधारे आणि पाझर तलावात पाण्याची आवक सुरू झाली आहे. कोनांबे परिसरात सुरू असलेल्या संततधारेने पानी फाउण्डेशनच्या कामाचे सार्थक झाले असून, सर्वच शिवार पाण्याने आबादानी झाल्याचे चित्र रविवारी पहायला मिळाले.वडझिरे, हरसुले, धोंडबार या गावातील स्ट्रक्चरमध्येही संततधारेने पाणी साचले आहे. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरविण्याचे ध्येय पानी फाउण्डेशनच्या कामामुळे साध्य होताना दिसत आहे. टंचाईचा सामना करणाºया या गावांमध्ये भविष्यात येणारी आबादानी इतर गावांना खºया अर्थाने प्रेरणादायी ठरणार आहे. गेल्यावर्षीही पानी फाउण्डेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे मार्गी लागली होती; मात्र पावसाने पाठ फिरविल्याने ग्रामस्थांचा हिरमोड झाला होता. यंदाच्या पावसाने हिरमुसलेल्या चेहऱ्यांवर आनंदाची लकेर उमटण्याची अपेक्षा आहे. एप्रिल आणि मे महिन्यातीलतीव्र उष्णतेच्या लाटेत जीवनसुखकर करण्यासाठी जलमित्रांनी केलेल्या कष्टाला वरुणराजाने संततधार बरसण्यास प्रारंभ करून साथ दिली आहे.सात गावे ठरली अंतिम परीक्षणासाठी पात्र १२४ गावांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ९० गावांतील नागरिकांनी प्रशिक्षण घेतले. ५० गावे श्रमदानात प्रत्यक्ष सहभागी झाली. त्यापैकी कोनांबे, वडझिरे, पाटोळे, हिवरे, आशापूर, चास आणि हरसूले ही गावे कामांच्या पडताळणीसाठी निवडली. तर कोनांबे, वडझिरे, पाटोळे आणि हिवरे ही ४ गावे अंतिम परीक्षणास पात्र ठरली. गेल्या वर्षी वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या कोनांबे गावाने यंदा ८८ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे ते राज्यस्तरीय स्पर्धेत आहे. तर वडझिरे, पाटोळे आणि हिवरे यांच्यात तालुक्यातील प्रथम तीन क्रमांकासाठी प्रचंड चुरस आहे.प्रत्येक गावात पर्जन्यमापक महसूल विभागाकडून अंदाजे नोंदविली जाणारी पावसाची आकडेवारी शेतकºयांच्या मुळावर उठते. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी पानी फाउंडेशनने साध्या प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर करून पर्जन्यमापक बसविले आहेत. त्याचे रीडिंग घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या गावात एका व्यक्तीची पर्जन्य नोंदीसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे पाणी फाउंडेशनच्या समन्वयक सुषमा मानकर, नागेश गरड, प्रवीण डोणगावे यांनी सांगितले. वॉटरकप स्पर्धेत श्रमदान करीत ग्रामस्थांनी मोठे काम उभे केले. टंचाईवर मात करण्यासाठी सरसावलेल्या बायाबापडे आणि चिमुकल्यांचे कष्ट सार्थकी लागले आहेत. गावोगावी तयार करण्यात आलेले स्ट्रक्चर पावसाने तुडुंब भरले असून, श्रमदानाचे खºया अर्थाने चीज झाले.-सुषमा मानकर,समन्वयक, पानी फाउण्डेशन