शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

अजंग रस्त्याचे काम काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:49 IST

गेल्या दीड वर्षभरात अठरा जणांच्या निष्पाप वाहनचालकांचा बळी घेणारा अजंग- मालेगाव रस्त्याची सुधारणा कधी होईल असा प्रश्न विचारला जात होता. अजंग ते मालेगाव रस्त्याचा प्रवास जीवघेणा ठरत अनेक लहान-मोठ्या अपघातांना दररोज निमंत्रण मिळत होते. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत होता.

ठळक मुद्देप्रशासनास आली जाग : राजगड प्रतिष्ठानच्या आंदोलनाचा परिणाम

वडनेर : गेल्या दीड वर्षभरात अठरा जणांच्या निष्पाप वाहनचालकांचा बळी घेणारा अजंग- मालेगाव रस्त्याची सुधारणा कधी होईल असा प्रश्न विचारला जात होता. अजंग ते मालेगाव रस्त्याचा प्रवास जीवघेणा ठरत अनेक लहान-मोठ्या अपघातांना दररोज निमंत्रण मिळत होते. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत होता.या रस्त्यासाठी राजगड प्रतिष्ठानच्या आंदोलनास यश मिळाले असून रस्त्याचे काम अखेर सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ‘लोकमत’ने याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून रस्त्याची दुरवस्था मांडली होती. अजंग ते मालेगाव या राज्यमार्गाच्या रखडलेल्या कामासाठी अजंग येथे प्रशांतनगर बायपास जवळ, राजगड प्रतिष्ठाण, मातोश्री रिक्षा चालक-मालक संघटना व ग्रामस्थांमार्फत दीड महिन्यापूर्वी आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. अजंग ते मालेगाव या रस्त्याच्या रूंदीकरणाच्या नावाखाली दहा ते अकरा महिन्यांपासून रस्ता दोन्ही बाजूंना खोदून ठेवला आहे. अरूंद रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याने वापरण्यात येणारा रस्ताही खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हाच प्रश्न निर्माण झाला असून, या रस्त्याच्या कामाबाबत यापूर्वीही अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आली आहेत.यानंतर थातुरमातुर डागडुजी करीत कामाला सुरुवात करण्यात आली व लगेचच काम पुन्हा बंद झाले. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे यापूर्वीही अनेकदा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शिवाय अनेक लोक जखमीही झाले आहेत, मात्र तरीही संबंधित खात्याने अजंग-मालेगाव रस्ता रुंदीकरणाच्या कामात दिरंगाई करीत वेळकाढूपणा केल्यामुळे निषेध करण्यासाठी व रस्ता दुरुस्तीच्या कामास गती मिळावी तसेच एक ते दीड वर्षात अठरा जणांनी आपला जीव गमावला असून, अजून किती जणांच्या जिवांची वाट पाहत आहेत असा संतप्त सवाल व राजगड प्रतिष्ठानचे राहुल पवार, सुनील शेलार, रवि कन्नोर, भूषण बागुल आदींनी उपस्थित केला होता.ठेकेदाराने लवकरच काम सुरू करण्याचे दिले आश्वासननिवेदन देऊन पंधरा ते वीस दिवस उलटल्यानंतरही सदर रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करण्याचा निर्णय अजंग व वडेल ग्रामस्थांनी घेतला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संबधित ठेकेदाराने लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन देत लेखी पत्र देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा