शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अजंग रस्त्याचे काम काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:49 IST

गेल्या दीड वर्षभरात अठरा जणांच्या निष्पाप वाहनचालकांचा बळी घेणारा अजंग- मालेगाव रस्त्याची सुधारणा कधी होईल असा प्रश्न विचारला जात होता. अजंग ते मालेगाव रस्त्याचा प्रवास जीवघेणा ठरत अनेक लहान-मोठ्या अपघातांना दररोज निमंत्रण मिळत होते. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत होता.

ठळक मुद्देप्रशासनास आली जाग : राजगड प्रतिष्ठानच्या आंदोलनाचा परिणाम

वडनेर : गेल्या दीड वर्षभरात अठरा जणांच्या निष्पाप वाहनचालकांचा बळी घेणारा अजंग- मालेगाव रस्त्याची सुधारणा कधी होईल असा प्रश्न विचारला जात होता. अजंग ते मालेगाव रस्त्याचा प्रवास जीवघेणा ठरत अनेक लहान-मोठ्या अपघातांना दररोज निमंत्रण मिळत होते. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत होता.या रस्त्यासाठी राजगड प्रतिष्ठानच्या आंदोलनास यश मिळाले असून रस्त्याचे काम अखेर सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ‘लोकमत’ने याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून रस्त्याची दुरवस्था मांडली होती. अजंग ते मालेगाव या राज्यमार्गाच्या रखडलेल्या कामासाठी अजंग येथे प्रशांतनगर बायपास जवळ, राजगड प्रतिष्ठाण, मातोश्री रिक्षा चालक-मालक संघटना व ग्रामस्थांमार्फत दीड महिन्यापूर्वी आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. अजंग ते मालेगाव या रस्त्याच्या रूंदीकरणाच्या नावाखाली दहा ते अकरा महिन्यांपासून रस्ता दोन्ही बाजूंना खोदून ठेवला आहे. अरूंद रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याने वापरण्यात येणारा रस्ताही खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हाच प्रश्न निर्माण झाला असून, या रस्त्याच्या कामाबाबत यापूर्वीही अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आली आहेत.यानंतर थातुरमातुर डागडुजी करीत कामाला सुरुवात करण्यात आली व लगेचच काम पुन्हा बंद झाले. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे यापूर्वीही अनेकदा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शिवाय अनेक लोक जखमीही झाले आहेत, मात्र तरीही संबंधित खात्याने अजंग-मालेगाव रस्ता रुंदीकरणाच्या कामात दिरंगाई करीत वेळकाढूपणा केल्यामुळे निषेध करण्यासाठी व रस्ता दुरुस्तीच्या कामास गती मिळावी तसेच एक ते दीड वर्षात अठरा जणांनी आपला जीव गमावला असून, अजून किती जणांच्या जिवांची वाट पाहत आहेत असा संतप्त सवाल व राजगड प्रतिष्ठानचे राहुल पवार, सुनील शेलार, रवि कन्नोर, भूषण बागुल आदींनी उपस्थित केला होता.ठेकेदाराने लवकरच काम सुरू करण्याचे दिले आश्वासननिवेदन देऊन पंधरा ते वीस दिवस उलटल्यानंतरही सदर रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करण्याचा निर्णय अजंग व वडेल ग्रामस्थांनी घेतला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संबधित ठेकेदाराने लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन देत लेखी पत्र देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा