शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

अजंग रस्त्याचे काम काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:49 IST

गेल्या दीड वर्षभरात अठरा जणांच्या निष्पाप वाहनचालकांचा बळी घेणारा अजंग- मालेगाव रस्त्याची सुधारणा कधी होईल असा प्रश्न विचारला जात होता. अजंग ते मालेगाव रस्त्याचा प्रवास जीवघेणा ठरत अनेक लहान-मोठ्या अपघातांना दररोज निमंत्रण मिळत होते. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत होता.

ठळक मुद्देप्रशासनास आली जाग : राजगड प्रतिष्ठानच्या आंदोलनाचा परिणाम

वडनेर : गेल्या दीड वर्षभरात अठरा जणांच्या निष्पाप वाहनचालकांचा बळी घेणारा अजंग- मालेगाव रस्त्याची सुधारणा कधी होईल असा प्रश्न विचारला जात होता. अजंग ते मालेगाव रस्त्याचा प्रवास जीवघेणा ठरत अनेक लहान-मोठ्या अपघातांना दररोज निमंत्रण मिळत होते. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत होता.या रस्त्यासाठी राजगड प्रतिष्ठानच्या आंदोलनास यश मिळाले असून रस्त्याचे काम अखेर सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ‘लोकमत’ने याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून रस्त्याची दुरवस्था मांडली होती. अजंग ते मालेगाव या राज्यमार्गाच्या रखडलेल्या कामासाठी अजंग येथे प्रशांतनगर बायपास जवळ, राजगड प्रतिष्ठाण, मातोश्री रिक्षा चालक-मालक संघटना व ग्रामस्थांमार्फत दीड महिन्यापूर्वी आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. अजंग ते मालेगाव या रस्त्याच्या रूंदीकरणाच्या नावाखाली दहा ते अकरा महिन्यांपासून रस्ता दोन्ही बाजूंना खोदून ठेवला आहे. अरूंद रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याने वापरण्यात येणारा रस्ताही खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हाच प्रश्न निर्माण झाला असून, या रस्त्याच्या कामाबाबत यापूर्वीही अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आली आहेत.यानंतर थातुरमातुर डागडुजी करीत कामाला सुरुवात करण्यात आली व लगेचच काम पुन्हा बंद झाले. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे यापूर्वीही अनेकदा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शिवाय अनेक लोक जखमीही झाले आहेत, मात्र तरीही संबंधित खात्याने अजंग-मालेगाव रस्ता रुंदीकरणाच्या कामात दिरंगाई करीत वेळकाढूपणा केल्यामुळे निषेध करण्यासाठी व रस्ता दुरुस्तीच्या कामास गती मिळावी तसेच एक ते दीड वर्षात अठरा जणांनी आपला जीव गमावला असून, अजून किती जणांच्या जिवांची वाट पाहत आहेत असा संतप्त सवाल व राजगड प्रतिष्ठानचे राहुल पवार, सुनील शेलार, रवि कन्नोर, भूषण बागुल आदींनी उपस्थित केला होता.ठेकेदाराने लवकरच काम सुरू करण्याचे दिले आश्वासननिवेदन देऊन पंधरा ते वीस दिवस उलटल्यानंतरही सदर रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करण्याचा निर्णय अजंग व वडेल ग्रामस्थांनी घेतला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संबधित ठेकेदाराने लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन देत लेखी पत्र देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा