शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

शिर्डी विमानतळ रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:05 IST

जागतिक कीर्तीचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी ज्या पालखी रस्त्याने साईभक्त प्रवास करतात, तो शिर्डी विमानतळ रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून पदयात्रेकरूंसाठी डोकेदुखीचा ठरत आहे. सिन्नर तालुक्यातील वावी ते शिर्डी विमानतळ या सुमारे १६ किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने या रस्त्याने पायी चालण्यासह व वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे. रस्त्याचे काम बंद असताना सार्वजनिक बांधकाम खात्याने ‘सबुरी’चे धोरण स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शैलेश कर्पे ।सिन्नर : जागतिक कीर्तीचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी ज्या पालखी रस्त्याने साईभक्त प्रवास करतात, तो शिर्डी विमानतळ रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून पदयात्रेकरूंसाठी डोकेदुखीचा ठरत आहे. सिन्नर तालुक्यातील वावी ते शिर्डी विमानतळ या सुमारे १६ किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने या रस्त्याने पायी चालण्यासह व वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे. रस्त्याचे काम बंद असताना सार्वजनिक बांधकाम खात्याने ‘सबुरी’चे धोरण स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  ओझर विमानतळ ते शिर्डी विमानतळ या सुमारे ७० किलोमीटर रस्त्याच्या कामास केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने गेल्या साडेतीन वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती. पहिल्या टप्प्यात ओझर विमानतळ ते वावी या सुमारे ५० किलोमीटर रस्त्याचे तीन वर्षांपूर्वीच काम झाले. त्यानंतर उर्वरित वावी ते शिर्डी विमानतळ (वेस) या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते गेल्या वर्षभरापूर्वीच करण्यात आला.  वावी ते सायाळे या रस्त्याचे  काम अंदाजपत्रकानुसार होत  नसल्याने सायाळे येथील  सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली होती.कार्यारंभाची तारीख तीन महिन्यांपूर्वीचवावी ते शिर्डी विमानतळ या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खासदार  हेमंत गोडसे यांच्या हस्ते सुमारे वर्षभरापूर्वी करण्यात आला होता.त्यानंतर दोन-तीन महिन्यात या रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात  आला होता. रस्त्याच्या कामाची माहिती देणारा फलक रस्त्याच्या कडेला लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे यांनी केल्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या कडेला कामाचा फलक लावण्यात आला आहे; मात्र त्यावर कामाच्या कार्यारंभ आदेशाची तारीख १७ आॅक्टोबर २०१७ दाखविण्यात आली आहे. फलक लावण्यापूर्वी दुशिंगपूर ते मलढोण फाटा या सुमारे ४ किलोमीटर रस्त्याचे काम झाले असताना कार्यरंभाची तारीख तीन महिन्यांपूर्वीची दाखविण्यात आल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले आहे.शताब्दी समाधी महोत्सवामुळे पदयात्रेकरुंची संख्या वाढली शिर्डी येथील साईबाबांच्या शताब्दी समाधी महोत्सवाचे २०१८ हे वर्ष आहे. त्यामुळे गुजरात राज्यासह मुंबई, ठाणे व उपनगरासह नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पायी दिंड्या शिर्डीला जात आहेत. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर वावी येथे आल्यानंतर दुशिंगपूर, सायाळे, जवळके, डोºहाळे मार्गे शिर्डीला जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. याच मार्गाला पालखी रस्ता म्हणून संबोधले जाऊ लागले आहे. जवळचा मार्ग असल्याने अनेक दिंड्या महामार्ग सोडून या रस्त्याने पायी शिर्डीला जात असतात. त्यामुळेच या रस्त्याला पालखी मार्ग असेही संबोधले जाऊ लागले आहे. या रस्त्यावर शिर्डी विमानतळ असल्याने या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. यावर्षी महिन्याभरात या रस्त्याने हजारो पदयात्रेकरू शिर्डीला गेले आहे; मात्र रस्त्याचे काम रखडलेले असल्याने साईभक्तांचा प्रवास खडतर झाला आहे.

टॅग्स :Airportविमानतळsaibabaसाईबाबा