शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

गावचा विकास करणे हे सरपंचाचे काम - भास्करराव पेरे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 17:59 IST

गावचा विकास करणे हे सरपंचाचे काम आहे यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असायला हवी असे प्रतिपादन स्मार्ट व्हिलेजचे प्रणेते व आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.

निफाड : गावचा विकास करणे हे सरपंचाचे काम आहे यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असायला हवी असे प्रतिपादन स्मार्ट व्हिलेजचे प्रणेते व आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.  शारदीय व्याख्यानमाला कार्यकारी समितीच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने निफाड येथे रविराज मंगल कार्यालयात आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे तीसरे पुष्प भास्करराव पेरे पाटील यांनी ‘स्मार्ट व्हिलेज काळाची गरज’ या विषयावर गुंफले. व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पाचे प्रायोजक अनिल कुंदे , मनोज आहेरराव होते.यावेळी भास्करराव पेरे म्हणाले, प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज करायचे असेल तर यासाठी गावातील नागरीकांचे सहकार्य अपेक्षीत असते , मात्र नागरीकांना प्रेमाने हाताळणारे सत्ताधारी सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात. सरपंचांनी आमदार , खासदार यांच्या भरवशावर न बसता स्वत: गावच्या विकासासाठी प्रामाणीकपणे झटल्यास त्यांचे गाव स्मार्ट व्हिलेज झाल्याशिवाय राहणार नाही. गावातील सत्ताधाºयांनी जनतेशी चांगले संबध ठेऊन काम करावे . त्यामुळे गावच्या विकासासाठी जनताही सहकार्य करते. जर गावागावात शौचालय, गटारी , पिण्याचे पाणी , वृक्षारोपण , या सुविधा उपलब्ध झाल्या तर ते गाव नक्कीच विकास करू शकते. प्रत्येक नागरिकाने गावच्या व स्वत:च्या स्वच्छतेची काळजी घेतल्यास देशाच्या बाबतीत ही बाब प्रगतीची ठरेल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने घराजवळ झाडे लावली पाहीजे. महिलांना सन्मानाची वागणुक द्या महिला जे कष्ट करतात त्याची जाणीव ठेवा असेही त्यांनी सांगितले. प्रास्तविक शिवाजी ढेपले यांनी केले.  आभार प्रदर्शन अनिल कुंदे यांनी केले . सूत्रसंचलन सुनील कुमावत यांनी केले. 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचSmart Cityस्मार्ट सिटी