शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मांजरपाडा प्रकल्पाचे काम जानेवारी अखेर होणार पुर्ण

By श्याम बागुल | Updated: November 24, 2018 18:10 IST

शनिवारी छगन भुजबळ यांनी मांजरपाडा प्रकल्पाच्या अधिका-यांसमवेत दिंडोरी तालुक्यातील देवसाने व सुरगाणा तालुक्यातील मांजरपाडा येथील बोगद्याची व धरणाची प्रत्यक्ष पाहणी करून जलसंपदा विभागाच्या अधिका-यांसोबत चर्चा केली. सदर प्रकल्पाच्या ८.९६ किमी लांबीच्या बोगद्यापैकी १२० मीटर काम अपूर्ण आहे.

ठळक मुद्देभुजबळ यांच्याकडून पाहणी : धरणाचे काम एप्रिल पर्यंत

नाशिक : मांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्याचे केवळ १२० मीटर काम बाकी असून दररोज १.८ मीटर बोगद्याचे काम केले जात असल्याने ३१ जानेवारीपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होईल त्याचबरोबर धरणाचे अपूर्ण काम एप्रिल २०१९ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष पाहणी करतांना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.शनिवारी छगन भुजबळ यांनी मांजरपाडा प्रकल्पाच्या अधिका-यांसमवेत दिंडोरी तालुक्यातील देवसाने व सुरगाणा तालुक्यातील मांजरपाडा येथील बोगद्याची व धरणाची प्रत्यक्ष पाहणी करून जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांसोबत चर्चा केली. सदर प्रकल्पाच्या ८.९६ किमी लांबीच्या बोगद्यापैकी १२० मीटर काम अपूर्ण आहे. तर ३.२० किमी लांबीच्या उघड्या चराचे पूर्ण काम झाले तसेच धरण आणि सांडव्याचे सुमारे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण करण्यात आलेले आहे. मांजरपाडा या महत्वकांक्षी वळण योजनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील पश्चिमवाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी या प्रकल्पाद्वारे अडवून ८४५ दलघफु पाणी बोगद्याद्वारे गोदावरी खोºयात वळवले जाणार आहे. यातील १०० दलघफु पाणी स्थानिक वापरसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. सिंचन विषयक चौकशी समितीच्या अहवालानुसार राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितिकडून तपासणी करण्याच्या यादीमध्ये या प्रकल्पाचा समावेश केल्यामुळे सुधारित प्रशासकीय मान्यतेवाचून हे काम आॅक्टो २०१४ पासून बंद पडले होते. विशेष म्हणजे सन २०१४-१५ मध्ये छगन भुजबळ यांनी या प्रकल्पसाठी ७० कोटी निधी उपलब्ध करून दिलेला होता मात्र सत्तापरिवर्तनंमुळे हे काम रखडले होते.या प्रकल्पाचे रखडलेले काम सुरु करण्यासाठी भुजबळांनी विधिमंडळात तसेच कारागृहातून सतत पाठपुरावा केला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतल्याने २००९ साली नाशिक येथे राज्य मंत्रीमंडळाची बैठक संपन्न होऊन सदर बैठकीमध्ये या वळण योजनांना मंजुरी देण्यात आलेली होती. त्यानुसार पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते वळण योजनांद्वारे पूर्व वाहिनी खोºयांमध्ये वळविण्यासाठी जलसंपदा विभागाने महत्वकांक्षी योजना हाती घेतलेल्या आहेत. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, राजेंद्र जाधव, दिलीप खैरे, अ‍ॅड. रवींद्र पगार, जयवंतराव जाधव, डॉ.भारती पवार, राधाकिसन सोनवणे, संजय बनकर, महेंद्र काले, प्रकाश वडजे, अरुण थोरात यांच्यासह कार्यकारी अभियंता गिरीश संघांनी, उपकार्यकारी अभियंता विश्वास दराडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक