शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

भगूरची पोलीस चौकी महिन्यातून पंधरा दिवस  बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:39 IST

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याअंतर्गत असलेली भगूर पोलीस चौकी महिन्यातून पंधरा दिवस बंद राहत असून, ती कायमस्वरूपी २४ तास उघडी ठेवून सर्व प्रकारच्या तक्रारींची दखल घ्यावी, अशी मागणी भगूर, राहुरी, दोनवाडे, लहवित, वंजारवाडी, शेणीत येथील ग्रामस्थांनी केली आहे.

भगूर : देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याअंतर्गत असलेली भगूर पोलीस चौकी महिन्यातून पंधरा दिवस बंद राहत असून, ती कायमस्वरूपी २४ तास उघडी ठेवून सर्व प्रकारच्या तक्रारींची दखल घ्यावी, अशी मागणी भगूर, राहुरी, दोनवाडे, लहवित, वंजारवाडी, शेणीत येथील ग्रामस्थांनी केली आहे.  १६ वर्षांपूर्वी भगूर परिसरासाठी देवळाली पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस औटपोस्ट होते. ते २४ तास उघडे राहून त्यासाठी एक पोलीस उपनिरीक्षक, एक हवालदार व तीन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. तक्रार नोंदणीसाठी स्वतंत्र स्टेशनडायरी ठेवण्यात आली होती. या तक्रारी नोंदवून पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात वर्ग केली जात होती किंवा तक्रारीचे स्वरूप पाहून औटपोस्टमध्येच त्याचे निराकरण करण्यात येत होते. मात्र २४ तास पोलिसांकडून भगूर व परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली जात होती. या औटपोस्टमध्ये भगूरसह राहुरी, दोनवाडे, वडगाव पिंगळा, नानेगाव, लहवित, वंजारवाडी या गावांचा समावेश होता. नाशिक पोलीस आयुक्तालयाची निर्मितीनंतर भगूर औटपोस्ट बंद करण्यात येऊन भगूर पोलीस चौकी स्थापन झाली व तक्रार स्टेशन डायरी बंद होऊन भगूरसह परिसरातील नागरिकांना तक्रारी व अर्जफाटे देण्यासाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ आली. भगूर शहरात १५ ते २० हजार लोकवस्ती असून, अनेक खेड्ड्यातील नागरिकांचे मुख्य बाजारपेठ दळणवळण संपर्क ठिकाण आहे येथे देवळाली कॅम्प ठाणेअंतर्गत भगूर पोलीस चौकी आहे ती महिन्यात साधारण १५ दिवस फक्त ३ ते ४ तास उघडी राहते. परिणामी भगूरसह पोलीस ठाण्याअंतर्गत गावातील गोरगरीब नागरिकांना बस, रिक्षा, टॅक्सीचा खर्च करून ५ ते ६ किलोमीटर देवळाली कॅम्पला जावे लागते. त्यामुळे भगूर पोलीस चौकी कायमस्वरूपी उघडी ठेवून येथेच तक्रारीची दखल घ्यावी आणि गंभीर गुन्हाची कारवाई देवळाली पोलीस ठाण्यात वर्ग करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.भगूर पोलीस चौकी बंद राहत असल्याने परिसरात चोºयांचे प्रकार वाढले आहे तरी भगूरला स्वतंत्र पोलीस ठाणे करावे यासाठी मी मागील वर्षी निवेदन दिले तरीही दखल घेतली नाही, निदान पोलीस चौकी तरी नेहमी उघडी ठेवून नागरिकांच्या तक्रारी येथेच सोडवाव्या. - प्रेरणा बलकवडे,  जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेसकाही महिन्यांपूर्वी मी कार्यकर्त्यांसह पोलीस अधिकाºयांना भेटून भगूर पोलीस चौकी कायम बंद राहत असल्याबाबत तक्रार केली. तेव्हा भगुरात एक सहायक पोलीस निरीक्षक, हवालदार, पोलीस कर्मचाºयांची नेमणूक करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. पण ते पाळले गेले नाही.  -मोहन करंजकर, नगरसेवक

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणे