शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
3
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
6
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
7
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
8
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
9
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
10
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
11
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
12
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
13
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
14
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
15
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
16
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
17
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
18
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
19
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
20
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
Daily Top 2Weekly Top 5

भगूरची पोलीस चौकी महिन्यातून पंधरा दिवस  बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:39 IST

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याअंतर्गत असलेली भगूर पोलीस चौकी महिन्यातून पंधरा दिवस बंद राहत असून, ती कायमस्वरूपी २४ तास उघडी ठेवून सर्व प्रकारच्या तक्रारींची दखल घ्यावी, अशी मागणी भगूर, राहुरी, दोनवाडे, लहवित, वंजारवाडी, शेणीत येथील ग्रामस्थांनी केली आहे.

भगूर : देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याअंतर्गत असलेली भगूर पोलीस चौकी महिन्यातून पंधरा दिवस बंद राहत असून, ती कायमस्वरूपी २४ तास उघडी ठेवून सर्व प्रकारच्या तक्रारींची दखल घ्यावी, अशी मागणी भगूर, राहुरी, दोनवाडे, लहवित, वंजारवाडी, शेणीत येथील ग्रामस्थांनी केली आहे.  १६ वर्षांपूर्वी भगूर परिसरासाठी देवळाली पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस औटपोस्ट होते. ते २४ तास उघडे राहून त्यासाठी एक पोलीस उपनिरीक्षक, एक हवालदार व तीन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. तक्रार नोंदणीसाठी स्वतंत्र स्टेशनडायरी ठेवण्यात आली होती. या तक्रारी नोंदवून पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात वर्ग केली जात होती किंवा तक्रारीचे स्वरूप पाहून औटपोस्टमध्येच त्याचे निराकरण करण्यात येत होते. मात्र २४ तास पोलिसांकडून भगूर व परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली जात होती. या औटपोस्टमध्ये भगूरसह राहुरी, दोनवाडे, वडगाव पिंगळा, नानेगाव, लहवित, वंजारवाडी या गावांचा समावेश होता. नाशिक पोलीस आयुक्तालयाची निर्मितीनंतर भगूर औटपोस्ट बंद करण्यात येऊन भगूर पोलीस चौकी स्थापन झाली व तक्रार स्टेशन डायरी बंद होऊन भगूरसह परिसरातील नागरिकांना तक्रारी व अर्जफाटे देण्यासाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ आली. भगूर शहरात १५ ते २० हजार लोकवस्ती असून, अनेक खेड्ड्यातील नागरिकांचे मुख्य बाजारपेठ दळणवळण संपर्क ठिकाण आहे येथे देवळाली कॅम्प ठाणेअंतर्गत भगूर पोलीस चौकी आहे ती महिन्यात साधारण १५ दिवस फक्त ३ ते ४ तास उघडी राहते. परिणामी भगूरसह पोलीस ठाण्याअंतर्गत गावातील गोरगरीब नागरिकांना बस, रिक्षा, टॅक्सीचा खर्च करून ५ ते ६ किलोमीटर देवळाली कॅम्पला जावे लागते. त्यामुळे भगूर पोलीस चौकी कायमस्वरूपी उघडी ठेवून येथेच तक्रारीची दखल घ्यावी आणि गंभीर गुन्हाची कारवाई देवळाली पोलीस ठाण्यात वर्ग करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.भगूर पोलीस चौकी बंद राहत असल्याने परिसरात चोºयांचे प्रकार वाढले आहे तरी भगूरला स्वतंत्र पोलीस ठाणे करावे यासाठी मी मागील वर्षी निवेदन दिले तरीही दखल घेतली नाही, निदान पोलीस चौकी तरी नेहमी उघडी ठेवून नागरिकांच्या तक्रारी येथेच सोडवाव्या. - प्रेरणा बलकवडे,  जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेसकाही महिन्यांपूर्वी मी कार्यकर्त्यांसह पोलीस अधिकाºयांना भेटून भगूर पोलीस चौकी कायम बंद राहत असल्याबाबत तक्रार केली. तेव्हा भगुरात एक सहायक पोलीस निरीक्षक, हवालदार, पोलीस कर्मचाºयांची नेमणूक करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. पण ते पाळले गेले नाही.  -मोहन करंजकर, नगरसेवक

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणे