शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

१४ तास चार भिंतीच्या आत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 23:56 IST

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी (दि. २२) देशभर जनता कर्फ्यू पाळला जाणार असल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहार सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत १४ तास थांबणार आहेत. या जनता कर्फ्यूमध्ये पोलिसांकडून कोणत्याही बळाचा वापर केला जाणार नाही; परंतु कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता स्वत:बरोबरच दुसऱ्यांनाही जपण्यासाठी स्वयंस्फूर्तीने नागरिकांना १४ तासांसाठी कोंडून घ्यावे लागणार आहे. दरम्यान, जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती तर आपल्या गावाकडे परतण्यासाठी परप्रांतीयांनी रेल्वेस्थानकांचा परिसर फुलून गेलेला होता.

ठळक मुद्देआज जनता कर्फ्यू : स्वत:बरोबरच दुसऱ्यांनाही जपा, कोरोना हटवा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी (दि. २२) देशभर जनता कर्फ्यू पाळला जाणार असल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहार सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत १४ तास थांबणार आहेत. या जनता कर्फ्यूमध्ये पोलिसांकडून कोणत्याही बळाचा वापर केला जाणार नाही; परंतु कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता स्वत:बरोबरच दुसऱ्यांनाही जपण्यासाठी स्वयंस्फूर्तीने नागरिकांना १४ तासांसाठी कोंडून घ्यावे लागणार आहे. दरम्यान, जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती तर आपल्या गावाकडे परतण्यासाठी परप्रांतीयांनी रेल्वेस्थानकांचा परिसर फुलून गेलेला होता.कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभर दहशतीचे वातावरण असताना भारतात त्याला प्रतिबंध करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सार्वजनिक ठिकाणी लोकांनी एकत्र जमू नये यासाठी विविध उपाययोजनांबरोबरच बंदी आदेशही लागू करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे रविवारी (दि. २२) शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना १४ तास घराच्या चार भिंतीतच व्यतित करावे लागणार आहेत. जनता कर्फ्यूमुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार थंडावणार आहेत.देश आणि माणूस वाचविण्यासाठीच... एरव्ही कर्फ्यू हा शब्द ऐकला की, संचारबंदीसह पोलिसांकडून मिळणाºया दंडुक्यांचा मार याचे स्मरण होते. परंतु, रविवारी पाळण्यात येणाºया जनता कर्फ्यूत पोलिसी बळाचा वापर होणार नाही, की कुठेही संचारबंदी लागू केली जाणार नाही. जनतेने आपला स्वत:चा जीव जपण्याबरोबरच इतरांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:च्या विवेकबुद्धीने पाळलेले आत्मसंयम आहे. या कर्फ्यूमुळे माणूस आणि पर्यायाने देश वाचणार असल्यासंबंधी जागृती केली जात आहे. त्यासाठी काही स्वयंसेवी संस्थाही पुढे सरसावल्या आहेत. परप्रांतीयांची धावपळ : कोरोनामुळे देशभर सर्वत्र प्रतिबंधात्मक उपाय योजले जात आहेत. शहर व जिल्ह्यात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणावर रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या परप्रांतीयांच्या हाताला काम उरलेले नाही. त्यामुळे परप्रांतीयांनी आपल्या गावाची वाट धरली असून, जिल्ह्यातील नाशिकरोडसह मनमाड, लासलगाव, इगतपुरी, देवळाली कॅम्प या रेल्वेस्थानकांवर गर्दी दिसून आली. जीवनावश्यक वस्तूवगळता अन्य सर्व बाजारपेठांना कुलूप लागणार असून, रस्त्यावरील रहदारीलाही ब्रेक लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बव्हंशी आस्थापना, व्यापारी संघटनांनी शनिवारी व रविवारी आपले व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे शनिवारीच जिल्ह्यात ठिकठिकाणी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट बघायला मिळाला. मात्र, जनता कर्फ्यूमुळे रविवारी बाजारपेठा बंद राहाणार आहेत. अफवांमुळे नागरिकांनी शनिवारी भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी केली होती. जनता कर्फ्यू हा कोणीही लादलेला कर्फ्यू नसून जनतेने जनतेच्याच सुरक्षिततेसाठी केलेला एक प्रयोग असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता १४ तास घरांमध्येच थांबून कोरोनाला थोपविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक