शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

विजेच्या झटक्याने वायरमन मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:39 IST

नांदगाव : लाइन जोडण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या रोहित्रावर (डीपी) चढलेला वायरमन विजेचा झटका लागून खाली पडून मृत्युमुखी पडल्याची घटना बुधवारी (दि.२४) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ढेकू येथे घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने जातेगाव वीज उपकेंद्रावर हल्ला करून कार्यालयात तोडफोड केली. सोपान चव्हाण असे या वायरमनचे नाव आहे.

ठळक मुद्देढेकूची घटना : जातेगाव उपकेंद्रावर जमावाचा हल्ला

नांदगाव : लाइन जोडण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या रोहित्रावर (डीपी) चढलेला वायरमन विजेचा झटका लागून खाली पडून मृत्युमुखी पडल्याची घटना बुधवारी (दि.२४) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ढेकू येथे घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने जातेगाव वीज उपकेंद्रावर हल्ला करून कार्यालयात तोडफोड केली. सोपान चव्हाण असे या वायरमनचे नाव आहे.खांबावर चढलेला सोपान अकस्मात विजेच्या तारेला चिकटला आणि बघता बघता खाली फेकला गेला. उपचारासाठी त्याला नेण्यात येत असतानाच त्याचा मृत्यू झाला. तो मयत झाल्याच्या वृत्ताने ढेकू गावात हलकल्लोळ उडाला. तरुण मयत सोपान चव्हाण (२५, रा. ढेकू) हा ह्यझिरो वायरमनह्ण होता. झिरो वायरमन ही अनधिकृत संकल्पना असून, ग्रामीण भागात विजेच्या खांबावर चढून काम करण्यासाठी अनेक वायरमन, स्थानिक तरुणांकडून अल्प आर्थिक मोबदल्यात काम करून घेत असतात. सध्या वीज वितरण कंपनीची वीजबिल वसुली मोहीम सुरू असून, मुख्य तारांमधील वीजप्रवाह बंद करून, बिलांच्या वसुलीसाठी दबाव आणला जातो असे म्हटले जाते. मयत सोपान हा नेमका दुरुस्तीसाठी चढला होता की कशासाठी याचा खुलासा होऊ शकलेला नाही.खांबावर चढताना ह्यपरमिटह्ण घेऊन वीज बंद केली जाते. चढलेली व्यक्ती सुरक्षित खाली उतरल्यावरच विजेचा प्रवाह सुरू केला जातो. प्रस्तुत घटनेत लाइनमन हरिश्चंद्र चव्हाण याने वीजप्रवाह बंद केल्याची खात्री करून वायरमन गणेश आहेर यांना कळविले व त्यानंतर सोपान खांबावर चढला होता, अशी माहिती मिळाली. अशावेळी त्याला विजेचा धक्का कसा बसला. यावर तर्कवितर्क सुरू असून, यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यासाठी जातेगाव येथे ग्रामस्थांनी तीन तास रस्त्यावर ठिय्या देऊन रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याबाबत वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता वाटपाडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.अन‌् तणाव निवळलाया घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले होते. पोलीस निरीक्षक अनिल कातकडे यांनी सुचवलेली मध्यस्थी ग्रामस्थ व मयताचे नातेवाईक ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी आमदार सुहास कांदे यांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला व सांयकाळी उशिरा मृतदेह नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. सोपानची आर्थिक स्थिती हलाखीची होती. त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू