शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल का? नारायण राणेंनी बिनधास्तपणे सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 19:09 IST

भाजपकडे केंद्रीय यंत्रणा असतील तर आमच्याकडे राज्यातील यंत्रणा आहेत, या प्रश्नावर मोठं कोण? असा प्रतिप्रश्न राणेंनी केला.

मुंबई - शिवसेना नेते खासदार संजय राऊत पक्षाच्या हितासाठी काम करत नसून त्यांना मुख्यमंत्री पद हवे आहे. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने त्यांना या संदर्भात शब्द दिला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पद रिक्त झालं की ते या पदावर आरुढ होतील. त्यासाठीच, त्यांचा खटाटोप असल्याचा आरोप केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. राणेंनी आज नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेवर कडाडून टीका केली. तसेच, राज्यात कायदा व सुव्यवस्था उरली नसल्याचे सांगत, राज्यातील यंत्रणांपेक्षा आमच्याकडे केंद्रातील यंत्रणा असल्याचं ते म्हणाले. तसेच, राष्ट्रपती राजवटीसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं. 

भाजपकडे केंद्रीय यंत्रणा असतील तर आमच्याकडे राज्यातील यंत्रणा आहेत, या प्रश्नावर मोठं कोण? असा प्रतिप्रश्न राणेंनी केला. तसेच, सीबीआय कोणाकडे आहे, ईडी कोणाकडे आहे, खरी चौकशी कोण करू शकतं. अरे, तुमचे 56 आहेत, एवढ्याशा डबक्यात आहेत. आमचा समुद्र आहे, असे म्हणत राणेंनी शिवसेनेवर आणि शिवसेनेकडून राज्यातील यंत्रणांचा होणाऱ्या वापरावर थेट प्रहार केला. तसेच, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल का? या प्रश्नावरही त्यांनी बेधडक उत्तर दिलं. सुधीर मुनगंटीवारांनी जर हे भाकीत केलं असेल तर त्यांना त्याचा अभ्यास आहे. ते असे भविष्य सांगतात आणि ते खरेही ठरतात, ते खरे ठरावे एवढीच अपेक्षा, असे उत्तर नारायण राणेंनी दिले. 

राणेंचं तोंड कोणीही बंद करू शकत नाही

राज्यात आज कायदा आणि सुव्यवस्था नाही, लोकं त्रस्त आहेत. मुलींवर अत्याचार करुन त्यांची आत्महत्या दाखवली जाते, सुशांतच्या केसमध्येही हत्या झाली असताना आत्महत्याच. पूजा चव्हाण केसमध्येही काय झालं?. मग, सारवासारवी करण्यासाठी दबाव आणायचा, पण राणेंचं तोंड कोणीही बंद करू शकत नाही, असेही राणेंनी म्हटलं. 

मुख्यमंत्री घरी, महाराष्ट्र आजारी 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे युक्रेन येथून आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर येणे अपेक्षित होते, पण ते आले नाहीत. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री मंत्रालयात आणि कॅबिनेटच्या बैठकीत जात नाहीत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आजारी पडला आहे, अशी टीका त्यांनी केली. दिशा सालीयन हिला न्याय देण्यासाठी आम्ही लढतो आहोत त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आम्हाला साथ देणे अपेक्षित आहे. मात्र, ते जर पोलिसांत तक्रार करत असतील तर या मागे कोण आहे हे सांगायला नको असेही राणेंनी म्हटले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे MumbaiमुंबईShiv SenaशिवसेनाBJPभाजपा