शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

किमान हजार किन्नरांचे पुनर्वसन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:18 IST

निसर्गाने ज्यांच्यावर अन्याय केला, अशा तृतीयपंथीयांना आपण माणुसपणाची वागणूक देऊन साथ दिली पाहिजे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रयास करणे आवश्यक आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत मुंबईत किन्नरांचा महामेळावा घेण्याबरोबरच किमान १००० किन्नरांचे आर्थिकदृष्ट्या पुनर्वसन करणार असल्याचा निर्धार उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील व सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. बी. के. बर्वे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देबर्वे । मुंबईत तृतीयपंथीयांचा महामेळावा घेण्याचा निर्धार

नाशिक : निसर्गाने ज्यांच्यावर अन्याय केला, अशा तृतीयपंथीयांना आपण माणुसपणाची वागणूक देऊन साथ दिली पाहिजे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रयास करणे आवश्यक आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत मुंबईत किन्नरांचा महामेळावा घेण्याबरोबरच किमान १००० किन्नरांचे आर्थिकदृष्ट्या पुनर्वसन करणार असल्याचा निर्धार उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील व सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. बी. के. बर्वे यांनी व्यक्त केला.मंगलमुखी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने आयोजित आदर्श समाजसेवा पुरस्कार आणि मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल, तहसीलदार राजश्री अहिरराव, अनिता डांगळे, अतुल निकुंभ आणि संस्थेच्या अध्यक्ष पायलगुरू गवारे उपस्थित होते. यावेळी बोलताना बर्वे यांनी डॉ. आंबेडकर यांनी गावकुसाबाहेर राहणाऱ्यांना माणूस बनवून मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. तसेच तृतीयपंथीयांनादेखील मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असल्याचे अ‍ॅड. बर्वे यांनी नमूद केले. यावेळी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी पायलगुरू यांच्या संकल्पनेनुसार नाशिकमध्ये किन्नरांसाठी आश्रम आणि वृद्धाश्रम स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक आयोगाने तृतीयपंथीयांची मतदार म्हणून नोंदणी करणे तसेच तृतीयपंथीयांनादेखील निराधार योजनेत पेन्शन सुरू करण्याचे पाऊल उचलून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने पावले टाकली असल्याचे नमूद केले. यावेळी राजेंद्र कलाल यांच्या हस्ते आदर्श समाजसेवा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पायलगुरू गवारे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले....तर तुम्ही देशद्रोहीजन्मत:च निसर्गाने त्यांच्यावर अन्याय केला आहे. निसर्गाने तुम्हाला पुरुष किंवा स्त्री बनवून न्याय केला म्हणून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांना तुम्ही लांब करणार असाल तर तुम्ही समाजद्रोही आणि देशद्रोही आहात. कारण किन्नरदेखील या समाजाचेच आणि देशाचेच घटक असल्याचेही अ‍ॅड. बर्वे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकLGBTएलजीबीटी