शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
4
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
5
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
6
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
7
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
8
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
10
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
11
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
12
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
13
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
14
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
15
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
16
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
17
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
18
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
19
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
20
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

किमान हजार किन्नरांचे पुनर्वसन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:18 IST

निसर्गाने ज्यांच्यावर अन्याय केला, अशा तृतीयपंथीयांना आपण माणुसपणाची वागणूक देऊन साथ दिली पाहिजे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रयास करणे आवश्यक आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत मुंबईत किन्नरांचा महामेळावा घेण्याबरोबरच किमान १००० किन्नरांचे आर्थिकदृष्ट्या पुनर्वसन करणार असल्याचा निर्धार उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील व सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. बी. के. बर्वे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देबर्वे । मुंबईत तृतीयपंथीयांचा महामेळावा घेण्याचा निर्धार

नाशिक : निसर्गाने ज्यांच्यावर अन्याय केला, अशा तृतीयपंथीयांना आपण माणुसपणाची वागणूक देऊन साथ दिली पाहिजे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रयास करणे आवश्यक आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत मुंबईत किन्नरांचा महामेळावा घेण्याबरोबरच किमान १००० किन्नरांचे आर्थिकदृष्ट्या पुनर्वसन करणार असल्याचा निर्धार उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील व सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. बी. के. बर्वे यांनी व्यक्त केला.मंगलमुखी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने आयोजित आदर्श समाजसेवा पुरस्कार आणि मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल, तहसीलदार राजश्री अहिरराव, अनिता डांगळे, अतुल निकुंभ आणि संस्थेच्या अध्यक्ष पायलगुरू गवारे उपस्थित होते. यावेळी बोलताना बर्वे यांनी डॉ. आंबेडकर यांनी गावकुसाबाहेर राहणाऱ्यांना माणूस बनवून मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. तसेच तृतीयपंथीयांनादेखील मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असल्याचे अ‍ॅड. बर्वे यांनी नमूद केले. यावेळी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी पायलगुरू यांच्या संकल्पनेनुसार नाशिकमध्ये किन्नरांसाठी आश्रम आणि वृद्धाश्रम स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक आयोगाने तृतीयपंथीयांची मतदार म्हणून नोंदणी करणे तसेच तृतीयपंथीयांनादेखील निराधार योजनेत पेन्शन सुरू करण्याचे पाऊल उचलून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने पावले टाकली असल्याचे नमूद केले. यावेळी राजेंद्र कलाल यांच्या हस्ते आदर्श समाजसेवा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पायलगुरू गवारे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले....तर तुम्ही देशद्रोहीजन्मत:च निसर्गाने त्यांच्यावर अन्याय केला आहे. निसर्गाने तुम्हाला पुरुष किंवा स्त्री बनवून न्याय केला म्हणून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांना तुम्ही लांब करणार असाल तर तुम्ही समाजद्रोही आणि देशद्रोही आहात. कारण किन्नरदेखील या समाजाचेच आणि देशाचेच घटक असल्याचेही अ‍ॅड. बर्वे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकLGBTएलजीबीटी