शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अंगणवाडी सेविकांचे प्रश्न कोरोनाकाळात तरी सुटतील?

By संजय पाठक | Updated: September 25, 2020 01:46 IST

नाशिक शहरात कोरोनामुक्तीसाठी माझे कुटुूंब माझी सुरक्षा राबविण्यास सुरूवात झाली असली तरी प्रत्यक्षात घरोघर फिरणा-या अंगणवाडी सेविकांनी त्यास विरोध केला आहे. त्यांच्या अडचणी अनंत असून मुख्य प्रश्न सुरक्षीततेचा आहे त्यामुूळे आता मोहिमेत सहभागी न होण्याचा इशारा देऊन ऐन कोरोना काळात तरी त्यांचे प्रश्न सुटतील काय हा प्रश्न आहे.

 नाशिक- कोणतीही शासकिय योजना किंवा मोहिम यशस्वी करायची असेलतर त्याचे यशापयश हे वरीष्ठ पातळीपेक्षा कनिष्ठ पातळीवर अवलंबून असते.सध्या नाशिक शहरात कोरोनामुक्तीसाठी माझे कुटुूंब माझी सुरक्षाराबविण्यास सुरूवात झाली असली तरी प्रत्यक्षात घरोघर फिरणा-या अंगणवाडीसेविकांनी त्यास विरोध केला आहे. त्यांच्या अडचणी अनंत असून मुख्य प्रश्नसुरक्षीततेचा आहे त्यामुूळे आता मोहिमेत सहभागी न होण्याचा इशारा देऊन ऐनकोरोना काळात तरी त्यांचे प्रश्न सुटतील काय हा प्रश्न आहे.  नाशिक शहरात सुमारे साडे चारशे अंगणवाड्या महापालिका चालवते. त्यासाठीसाडे  सातशे अंगणवाडी सेविका आहेत. अवघ्या चार हजार रूपये मानधनावर त्याकाम करतात. अवघ्या तीन ते चार तासाचे काम दिवसभरात करणे म्हणजे कोणालाखूप सोपे काम वाटेल परंतु स्थिती तशी नाहीये. अंगणवाडीतील मुलांच्यासांभाळ आणि पोेषण आहारापालिकडे या सेविकांकडे अनेक कामांच्या जबाबदाºयाटाकल्या जातात. जनगणना, आरोग्य सर्वेक्षणापासून निवडणूकीपर्यंत अनेक कामेकरायला सांगितली जातात. ही कामे सांगताना सेविकांचे शिक्षण  आणि अन्यविषय विचारात घेतली जात नाही. शासनाची कोणतीही योजना आली की महापालिकेलासाडे सातशे कर्मचाºयांची फौज जमेची बाजू वाटते मात्र, त्यांचे प्रश्नसोडविणे किंवा लाभ देण्याची वेळ आली की प्रशासन मागे हटते.    सध्या कोरोनाचा काळ आहे आणि आता राज्य शासनाच्या संकल्पनेतून माझेकुटुूंब मोहिम राबताना घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षणाची जबाबदारी यामहिलांवर सोपविण्यात आली आहे. त्यांना  केवळ मास्क आणि कॅप तसेच हँडग्लोजएवढीच सुरक्षा साधने देण्यात आली आहेत. तसेच आॅक्सिमीटर आणि थर्मल गनसोपविण्यात आली आहे. परंतु त्यासाठीचे किमान वैद्यकिय ज्ञान देण्यातआलेले नाही. त्यातच घरोघर ंजाऊन संकलीत केलेली माहिती मोबाईल अ‍ॅपमध्येभरायची आहे,परंतु ६० टक्के सेविकांकडे अ‍ॅँड्रॉईड मोबाईल सुध्दा नाही.विशेष म्हणजे घरोघर सर्वेक्षण करताना एखादा कोरोना संसर्ग बाधीत व्यक्तीआढळला तर त्यातून या महिलांना संसर्ग होऊ शकतो. त्याची जोखीम पण आहेपरंतु या महिलांसाठी ना पीपीई कीट आहे, ना वैद्यकिय विमा! त्यातच ब-याचमहिला पन्नास वर्षांपेक्षा वयाने जास्त आहेत. काहींना मधुमेह,उच्चरक्तदाब आणि काहींना हृदय विकार देखील आहे त्यांची जबाबदारी कोणीस्विकारायची?   मध्यंतरी एका खासगी वैद्यकिय महाविद्यालयाच्या अर्सेनिक अल्बम गोळ्यावाटपाचे काम या महिलांना देण्यात आले. त्यात अनेक महिलांना संसर्ग झालापरंतु त्याची दखल प्रशासनाने कितपत घेतली? जीव धोक्यात घालण्याचे हेकामही अवघ्या चार हजार रूपयांत  करायचे आहे. महापालिकेने  खासगी कर्मचारीनेमले तर चार हजार रूपयांत ते  तरी काम करण्यास तयार होतील काय हा प्रश्नआहे.  योग्य वेळी मागण्या पुढे  रेटल्या तर त्यातून काही फलनिष्पती होईलया अपेक्षेने त्यांनी मोहिमेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे,मात्रकोरोना काळात त्यावर तोडगा निघणे जवळपास अशक्यच आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्या