शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

सीईओंच्या बदलीमुळे आता नाशिक स्मार्ट होईल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:10 IST

अर्थात, कंपनीकरण हेच खरे तर वादाचे मूळ ठरले आहे. महापालिकेचे कायदे आणि कार्यपद्धती तसेच स्मार्ट सिटी कंपनीचे कायदे आणि ...

अर्थात, कंपनीकरण हेच खरे तर वादाचे मूळ ठरले आहे. महापालिकेचे कायदे आणि कार्यपद्धती तसेच स्मार्ट सिटी कंपनीचे कायदे आणि कार्यपद्धती अत्यंत भिन्न आहे. महापालिकेत नगरसेवक कामे सुचवतात. ते इस्टीमेट तयार करण्यापासून ते टेंडर मंजूर होईपर्यंत सर्व काही प्रक्रिया नगरसेवकांच्या समक्ष होत असते, परंतु कंपनीत मात्र असते नसतेच. त्यामुळेच खऱ्या गोंधळाला सुरुवात झाली. महापालिकेप्रमाणे कंपनीकडून काहीच माहिती मिळत नाही म्हणजे विश्वासात घेतले जात नाही असा आरोप होऊ लागला. कंपनीचे परस्पर होणारे निर्णय आणि ज्यादा दराच्या निविदा या सर्व प्रकारांतच सर्वाधिक भर पडली ती सीईओ प्रकाश थवील यांच्या स्वभावाची! उपजिल्हाधिकारी संवर्गातून आलेल्या या अधिकाऱ्याने आपण कंपनीचे सीईओपद हे महापालिकेसारख्या अंगीकृत संस्थेचे आणि ते तात्पुरते आहे, याची जाणिव राहिल्याचे त्यांच्या वर्तनातून दिसले नाही. स्वभावात लवचिकता नसल्याने त्यांचे संचालकांबरोबर खटके उडणे स्वाभाविक होते. कंपनी ॲक्टच्या नावाखाली त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वादाला कारणीभूत ठरले. स्मार्ट रोडच्या ठेकेदाराला दिलेल्या दंडमाफीपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेले जलमापक म्हणजेच स्काडा मीटर बसवण्याच्या अडीशचे कोटींच्या निविदेतील परस्पर केलेले बदल वादात सापडल्यानंतर त्यांनी हे सर्व बदल कंपनीचे अध्यक्ष आणि सध्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या सांगण्यावरून केल्याचे सांगितले आणि वादाला वेगळे वळण मिळाले. कुंटे यांच्यावर संशयाची सुई गेल्यानंतरही त्यांनी ज्या पद्धतीने थवील यांच्यावर पांघरूण घातले, ते बघता कुंटे हेच त्यांचे तारणहार असे आरोप होत राहिले. अगदी गेल्यावर्षी थवील यांची बदली होऊनही ते याच कंपनीत राहिल्यामुळे त्यांच्यावर कोणाचातरी वरदहस्त आहे, हे उघड झाले.

ज्या पक्षाच्या शीर्ष नेत्याने ही याेजना आखली त्याच पक्षाचे महापौर आणि पदाधिकारी केवळ एका अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे संपूर्ण योजनाच गुंडाळण्याची भाषा करण्याची बाब करत असतील तर ही बाब गंभीर होती. राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असतानाही त्यावर तोडगा काढणे या संचालकांना पाच वर्षांत शक्य नसेल तर त्याचा दोष कोणाला द्यायचा? स्मार्ट सिटीची आजची ‌स्थिती अत्यंत वेगळी आहे. ४९४ कोटी रुपयांचा निधी हाती पडूनही केवळ १५३ कोटी रुपयेच खर्च झाले आहेत. तर ४४५ कोटी रुपयांना अजून हातही लागलेला नाही. जी कामे पूर्ण झाली ती मुळात वादग्रस्त आहेत, जी कामे कार्यवाहीत आहेत, तीही निर्धोकपणे चालू आहेत,असे नाही. सर्व कामांना याच संचालकांनी मंजुरी देऊनही प्रत्येक काम वादग्रस्त झाले आणि त्याचे खापरही सीईओंवर फोडून झाले. आता त्यांच्या बदलीनंतर खऱ्या अर्थाने सर्व कामांतील दोष सुधारून नाशिक स्मार्ट होणार असेल तर याही निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे.

- संजय पाठक