शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात स्मार्ट सिटीच्या वादाची "सायकल" सुरूच राहणार?  

By संजय पाठक | Updated: October 22, 2020 22:34 IST

नाशिक- जगातील प्रगत देशातील संकल्पना आपल्या देशात राबवण्याचा आग्रह धरणे गैर नाही, मात्र त्यासाठी स्थानिक नागरीकांची आधी मानसिकता बदलण्याची गरज आहे. मानसिकता त्या दर्जाची नसेल तर काय होऊ शकते, याचा अनुभव अलिकडेच नाशिक शहरात राबवण्यात आलेल्या बायसिकल शेअरींग प्रकल्पात आला असताना आता पुन्हा सायकल चॅलेंज नावाचे एक प्रकरण स्मार्ट  सिटीने आणले आहे. सायकलींंग हे आरोग्यासाठी उत्तम असते, त्याविषयी दुमत नाही, मात्र केवळ केंद्र शासनाकडून एक कोटी रूपये हस्तगत करण्यासाठी सध्या ज्या पध्दतीने कागदे रंगवले जात आहेत, ते तद्दन मनोरंजन ठरले आहे.त्यामुळे कंपनी मागे लागलेली वादाची सायकल थांबेल काय हा प्रश्न आहे. 

ठळक मुद्देसायकल चॅलेंज प्रकल्पएक कोटी रूपये मिळवण्यासाठी कागदी घोडे

 नाशिक- जगातील प्रगत देशातील संकल्पना आपल्या देशात राबवण्याचा आग्रह धरणे गैर नाही, मात्र त्यासाठी स्थानिक नागरीकांची आधी मानसिकता बदलण्याची गरज आहे. मानसिकता त्या दर्जाची नसेल तर काय होऊ शकते, याचा अनुभव अलिकडेच नाशिक शहरात राबवण्यात आलेल्या बायसिकल शेअरींग प्रकल्पात आला असताना आता पुन्हा सायकल चॅलेंज नावाचे एक प्रकरण स्मार्ट  सिटीने आणले आहे. सायकलींंग हे आरोग्यासाठी उत्तम असते, त्याविषयी दुमत नाही, मात्र केवळ केंद्र शासनाकडून एक कोटी रूपये हस्तगत करण्यासाठी सध्या ज्या पध्दतीने कागदे रंगवले जात आहेत, ते तद्दन मनोरंजन ठरले आहे.त्यामुळे कंपनी मागे लागलेली वादाची सायकल थांबेल काय हा प्रश्न आहे. 

शाश्वत  विकासासाठी पर्यवरण स्नेही उपक्रम राबवणे आवश्यक आहे. त्यामुळे नॉन मोटराज्ड साधनांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.  त्यामुळे सायकलींगला चालना दिली पाहिजे. परंतु त्याची व्यवहार्यता पडताळली पाहीजे. गेले वर्षभर सुरू असलेला शेअर बायसिकलींगचा प्रयोग चालू वर्षीच फसला. आणि हा पीपीपीमध्ये हा प्रकल्प राबवणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची वेळ स्मार्ट सिटी कंपनीवर आली. अर्धातास विनामुल्य वापर आणि त्यानंतर देखील माफक दर ही अत्यंत चांगली सेवा होती. शहरात शंभर ठिकाणी सायकल डॉक उभारण्यात आले होते. परंतु मुळातच डॉकचे लोकेशन चुकले आणि तेथून सायकलींची नासधुस सुरू झाली. सायकली चोरी होणे किंवा नुकसान करणे ही मानसिकता चुकीची असली तरी असे प्रकार होऊ नये यासाठी मात्र कोणतीही काळजी घेण्यात आलेली नव्हती. शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण भयंकर असताना निर्जन ठिकाणी  किंवा अन्यत्र सायकली चोरणे चोरट्यांना कठीण गेले नाही.

हा प्रकल्प सांभाळू न शकणाऱ्या स्मार्ट सिटीने आता सायकल चॅलेंजचा नवा फंडा आणला आहे. केंद्र शासनाकडून सायकल ट्रॅक आणि तत्सम सुविधांसाठी एक कोटी रूपये मिळवण्याच्या अटहासापोटी सध्या शहरात अभिनव सुरू आहे. स्मार्ट सिटी हे प्रकरणच मुळातच  विदेशी आणि कार्पोरेट कल्चरच्या धर्तीवर असल्याने वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून खूप काहीतरी केल्याचा आव आणण्याचे प्रकार सुरू आहे. सायकल चालवणे ही मुलांची पहिली धडपड असते. आणि मुले स्वत:च सायकल  शिकतात असे असताना मुलांना सायकल कशी चालवायची याचे प्रशिक्षण देण्याचा अजब प्रकार कंपनीने केला. सायकल चालवताना कुठे अडचणी येतात हे साधे डोळ्यांनी दिसत असताना त्यासाठी खास सायकल फेरी आणि ॲपचा वापर करीत अशोकस्तंभ ते सातपूर पर्यंत फेरी करण्यात आली. त्यावर कडी म्हणुून कंपनीने एक अफलातून सर्वे केला आणि सायकलस्वारांना तुम्हाला सायकल चालवताना भीती वाटते का कसली वाटते असे बालीश प्रश्न विचारण्यात आले. नागरीकांनी रस्त्यावरील खडडे, उघड्या गटारी, वाहतूक कोंडी आणि भरधाव वेगाने जाणारी वाहने यामुळे सायकल चालवताना अडथळे येतात असा निष्कर्ष प्रचंड मेहनत आणि संशोधानअंती काढला आहे.

मुळात सायकली चालवण्यात अडथळे काय याचा शोध याच स्मार्ट सिटी कंपनीने तयार केलेल्या अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या रस्त्यावर घेतला असता तरी अशा स्मार्ट संकल्पांची याच कंपनीने कशी वासलात लावली ते कळले असते. अवघ्या एक किलो मीटर रस्त्याच्या कडेला असलेल्या सायकल ट्रॅकचा तर कोणता वापर होत नाहीच उलट मोटार सायकल पार्कींग या ठिकाणी तसेच पादचारी मार्गावर होत आहे.  त्यामुळे संपुर्ण शहरात फिरून काही तरी केल्याचा आव आणण्याऐवजी एवढे केले असते तरी पुरे आहे. सायकल कॅपीटल व्हावी ही साऱ्याच नाशिककरांची इच्छा आहे. मात्र, गेल्या चार वषार्त ज्या पध्दतीने कंपनीचे काम वादाशिवाय संपत नाही ते बघता सायकल कॅपीटलचे स्वप्न अशा रीतीने कंपनी पुर्ण करू शकेल काय याविषयी शंकाच आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी