शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

नाशकात स्मार्ट सिटीच्या वादाची "सायकल" सुरूच राहणार?  

By संजय पाठक | Updated: October 22, 2020 22:34 IST

नाशिक- जगातील प्रगत देशातील संकल्पना आपल्या देशात राबवण्याचा आग्रह धरणे गैर नाही, मात्र त्यासाठी स्थानिक नागरीकांची आधी मानसिकता बदलण्याची गरज आहे. मानसिकता त्या दर्जाची नसेल तर काय होऊ शकते, याचा अनुभव अलिकडेच नाशिक शहरात राबवण्यात आलेल्या बायसिकल शेअरींग प्रकल्पात आला असताना आता पुन्हा सायकल चॅलेंज नावाचे एक प्रकरण स्मार्ट  सिटीने आणले आहे. सायकलींंग हे आरोग्यासाठी उत्तम असते, त्याविषयी दुमत नाही, मात्र केवळ केंद्र शासनाकडून एक कोटी रूपये हस्तगत करण्यासाठी सध्या ज्या पध्दतीने कागदे रंगवले जात आहेत, ते तद्दन मनोरंजन ठरले आहे.त्यामुळे कंपनी मागे लागलेली वादाची सायकल थांबेल काय हा प्रश्न आहे. 

ठळक मुद्देसायकल चॅलेंज प्रकल्पएक कोटी रूपये मिळवण्यासाठी कागदी घोडे

 नाशिक- जगातील प्रगत देशातील संकल्पना आपल्या देशात राबवण्याचा आग्रह धरणे गैर नाही, मात्र त्यासाठी स्थानिक नागरीकांची आधी मानसिकता बदलण्याची गरज आहे. मानसिकता त्या दर्जाची नसेल तर काय होऊ शकते, याचा अनुभव अलिकडेच नाशिक शहरात राबवण्यात आलेल्या बायसिकल शेअरींग प्रकल्पात आला असताना आता पुन्हा सायकल चॅलेंज नावाचे एक प्रकरण स्मार्ट  सिटीने आणले आहे. सायकलींंग हे आरोग्यासाठी उत्तम असते, त्याविषयी दुमत नाही, मात्र केवळ केंद्र शासनाकडून एक कोटी रूपये हस्तगत करण्यासाठी सध्या ज्या पध्दतीने कागदे रंगवले जात आहेत, ते तद्दन मनोरंजन ठरले आहे.त्यामुळे कंपनी मागे लागलेली वादाची सायकल थांबेल काय हा प्रश्न आहे. 

शाश्वत  विकासासाठी पर्यवरण स्नेही उपक्रम राबवणे आवश्यक आहे. त्यामुळे नॉन मोटराज्ड साधनांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.  त्यामुळे सायकलींगला चालना दिली पाहिजे. परंतु त्याची व्यवहार्यता पडताळली पाहीजे. गेले वर्षभर सुरू असलेला शेअर बायसिकलींगचा प्रयोग चालू वर्षीच फसला. आणि हा पीपीपीमध्ये हा प्रकल्प राबवणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची वेळ स्मार्ट सिटी कंपनीवर आली. अर्धातास विनामुल्य वापर आणि त्यानंतर देखील माफक दर ही अत्यंत चांगली सेवा होती. शहरात शंभर ठिकाणी सायकल डॉक उभारण्यात आले होते. परंतु मुळातच डॉकचे लोकेशन चुकले आणि तेथून सायकलींची नासधुस सुरू झाली. सायकली चोरी होणे किंवा नुकसान करणे ही मानसिकता चुकीची असली तरी असे प्रकार होऊ नये यासाठी मात्र कोणतीही काळजी घेण्यात आलेली नव्हती. शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण भयंकर असताना निर्जन ठिकाणी  किंवा अन्यत्र सायकली चोरणे चोरट्यांना कठीण गेले नाही.

हा प्रकल्प सांभाळू न शकणाऱ्या स्मार्ट सिटीने आता सायकल चॅलेंजचा नवा फंडा आणला आहे. केंद्र शासनाकडून सायकल ट्रॅक आणि तत्सम सुविधांसाठी एक कोटी रूपये मिळवण्याच्या अटहासापोटी सध्या शहरात अभिनव सुरू आहे. स्मार्ट सिटी हे प्रकरणच मुळातच  विदेशी आणि कार्पोरेट कल्चरच्या धर्तीवर असल्याने वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून खूप काहीतरी केल्याचा आव आणण्याचे प्रकार सुरू आहे. सायकल चालवणे ही मुलांची पहिली धडपड असते. आणि मुले स्वत:च सायकल  शिकतात असे असताना मुलांना सायकल कशी चालवायची याचे प्रशिक्षण देण्याचा अजब प्रकार कंपनीने केला. सायकल चालवताना कुठे अडचणी येतात हे साधे डोळ्यांनी दिसत असताना त्यासाठी खास सायकल फेरी आणि ॲपचा वापर करीत अशोकस्तंभ ते सातपूर पर्यंत फेरी करण्यात आली. त्यावर कडी म्हणुून कंपनीने एक अफलातून सर्वे केला आणि सायकलस्वारांना तुम्हाला सायकल चालवताना भीती वाटते का कसली वाटते असे बालीश प्रश्न विचारण्यात आले. नागरीकांनी रस्त्यावरील खडडे, उघड्या गटारी, वाहतूक कोंडी आणि भरधाव वेगाने जाणारी वाहने यामुळे सायकल चालवताना अडथळे येतात असा निष्कर्ष प्रचंड मेहनत आणि संशोधानअंती काढला आहे.

मुळात सायकली चालवण्यात अडथळे काय याचा शोध याच स्मार्ट सिटी कंपनीने तयार केलेल्या अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या रस्त्यावर घेतला असता तरी अशा स्मार्ट संकल्पांची याच कंपनीने कशी वासलात लावली ते कळले असते. अवघ्या एक किलो मीटर रस्त्याच्या कडेला असलेल्या सायकल ट्रॅकचा तर कोणता वापर होत नाहीच उलट मोटार सायकल पार्कींग या ठिकाणी तसेच पादचारी मार्गावर होत आहे.  त्यामुळे संपुर्ण शहरात फिरून काही तरी केल्याचा आव आणण्याऐवजी एवढे केले असते तरी पुरे आहे. सायकल कॅपीटल व्हावी ही साऱ्याच नाशिककरांची इच्छा आहे. मात्र, गेल्या चार वषार्त ज्या पध्दतीने कंपनीचे काम वादाशिवाय संपत नाही ते बघता सायकल कॅपीटलचे स्वप्न अशा रीतीने कंपनी पुर्ण करू शकेल काय याविषयी शंकाच आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी