शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

गर्दीचे रूपांतर मतपेटीत होईल?

By किरण अग्रवाल | Updated: January 20, 2019 01:43 IST

दलितांना काळाराम मंदिराची कवाडे खुली करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या नाशिकच्या भूमीत सत्याग्रह करण्याची वेळ आली, त्याच भूमीत ...

ठळक मुद्देअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबत जाहीर सभा घेऊन राजकीय पक्षांच्या छातीत भरविली धडकीगोल्फ क्लब मैदानावर सभा घेण्याचे धाडस ज्या काही मोजक्यांमध्ये आहे त्यात प्रकाश आंबेडकर आहेत.

दलितांना काळाराम मंदिराची कवाडे खुली करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या नाशिकच्या भूमीत सत्याग्रह करण्याची वेळ आली, त्याच भूमीत त्यांचे नातू अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून एमआयएमसोबत जाहीर सभा घेऊन घडविलेल्या शक्तिप्रदर्शनाने अन्य राजकीय पक्षांच्या छातीत धडकी भरणे स्वाभाविक असले तरी, ज्या सत्तेविरुद्ध प्रकाश आंबेडकर दलित-मुस्लिमांना एकत्र करून रान पेटवित आहेत, त्या दलितांना एमआयएमची कट्टर धर्मांधता मानवेल काय, हाच खरा प्रश्न आहे. एमआयएमसारख्या पक्षाला सोबत घेण्याचा आंबेडकर यांचा विचार राजकीय मैदानात दलितांना कितपत पटेल, याविषयी साशंकता आहे.

 

कोरेगाव भीमा येथील गेल्या वर्षाच्या जातीय दंगलीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी ठोस भूमिका घेत दलितांच्या बचावासाठी महाराष्टÑ बंदची हाक दिली व त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्याचा राजकीय लाभ प्रकाश आंबेडकरांनी उठविला व आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग त्यांनी एमआयएम या पक्षाला सोबत घेऊन फुंकले. परंतु हे करत असताना आंबेडकर यांनी एकीकडे काँग्रेसशी हात मिळविण्याची तयारी केली, त्याचवेळी सोबत राष्टÑवादी नको अशी अट ठेवली. राजकीय ताकदीचा विचार न करता थेट बारा जागांची मागणी करीत असताना राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन राजकीय चर्चा घडवली. त्यामुळे पाठी मोठा जनाधार आहे असे समजून अनेक खेळ्या प्रकाश आंबेडकर खेळत आहेत व त्यातूनच त्यांची नाशिकमध्ये झालेली यशस्वी सभा हेदेखील त्याचे एक कारण आहे. नाशिक येथील सभा ज्या भव्य-दिव्य व प्रचंड गर्दीने पार पडली त्याबाबत त्यांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे, कारण गोल्फ क्लब मैदानावर सभा घेण्याचे धाडस ज्या काही मोजक्याच पक्षांमध्ये आहे त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला स्थान मिळाले आहे. पण याच गोल्फ क्लबच्या मैदानावर लाखोंच्या सभा घेणाऱ्या काही राजकीय पक्षांना मात्र निवडणुकीत सभेतील गर्दीचे रूपांतर मतपेटीत कधीच करता आले नाही हादेखील इतिहास आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNashikनाशिक