शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

सायाळे येथे युवा मित्र संस्थेचे जलसाक्षरता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 17:16 IST

सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावात जलसाक्षरता अभियानाद्वारे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न युवा मित्र या संस्थेकडून केला जात आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी येथील युवा मित्र या संस्थेच्या वतीने सायाळे येथे शेतकऱ्यांचे जलसाक्षरता अभियान राबविण्यात आले.

युवा मित्र संस्थेचे अध्यक्ष सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाने युवा मित्र संस्थेचे तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी ग्रामस्थांना जलसमृद्धी प्रकल्पाद्वारे गावचा विकास कसा करता येईल याबाबत माहिती दिली. गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार या योजनेअंतर्गत गावातील नदी-नाले व पाझर तलाव यातील गाळ काढण्याची मोहीम राबवून भूजलपातळीत वाढ करण्यावर भर दिला जाणार आहे. गावातील शेतक-यांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत मशीन मागणी अर्ज सादर करावयाचा आहे. सदरचा प्रकल्प युवा मित्र महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार आहे. यासाठी संस्थेकडून यंत्रसामुग्री सरकारकडून इंधन खर्च दिला जाणार आहे. उपसलेला गाळ शेतक-यांना मोफत मिळणार असून तो त्यांनी स्वत:च्या वाहनाने त्यांच्या शेतात न्यावयाचा आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत नदी-नाले व पाझर तलाव खोली करणामुळे जलसाठ्यात वाढ होईल. तसेच युवा मित्र संस्थेचे गाळ काढणे हा काही व्यवसाय नाही तर या काढलेल्या जलस्रोतांचे नाला बंधारा यावर पुढे पाणी वापर संस्था स्थापन करणे व त्याचे नियोजन व व्यवस्थापन गावक-यांकडून करून घेणे हा मुख्य उद्देश असल्याचे तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी सांगितले. जलसाक्षरता अभियानामध्ये युवा मित्र संस्थेचे फील्ड कॉर्डिनेटर समाधान कासार, रोशन घुगे यांच्या सोबत सरपंच शिवाजी शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित हाते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSocialसामाजिक