शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

प्रशासकीय यंत्रणा पोखरणाऱ्या भूमाफियांना संरक्षण कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 23:49 IST

नाशिकसारख्या नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या जिल्ह्याला अलीकडे भूमाफियांचा विळखा पडतोय की काय, अशी शंका घेणाऱ्या घटना घडत आहेत. आनंदवल्लीतील वृद्ध भूधारक रमेश मंडलिक यांचा अशाच षडयंत्रातून खून झाला. या खुनातील सूत्रधार रम्मी आणि जिम्मी राजपूत बंधू तब्बल आठ महिने फरार होते. त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा कथित साथीदार संजय पुनमियाने शेतकरी असल्याचा बनावट पुरावा जोडत सिन्नरमध्ये कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्र्यंबकेश्वरमध्ये डोंगरांचे उत्खनन करीत रिसॉर्ट उभारण्याचे उद्योग सुरू आहेत. तर, इगतपुरीत वैतरणा जलविद्युत प्रकल्पासाठी घेतलेली परंतु वापराविना पडलेली ६२३ हेक्टर जमीन मूळ मालक असलेल्या आदिवासींना परत करण्याऐवजी त्याचा लिलाव करण्याचा निर्णय हा बिल्डरधार्जिणा असल्याची टीका होऊ लागली आहे. कुठेतरी प्रशासकीय यंत्रणेचे संरक्षण व राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय असे करण्याचे माफियांचे धाडस होणार नाही. राजकारणातून अर्थकारणाचा हा घातक पायंडा घातला जात आहे.

ठळक मुद्देराजकारणासाठी अर्थकारणाचा घातक पायंडा; मुस्कटदाबी सहन करणाऱ्या दुर्बलांना मदतीचा हात द्या

मिलिंद कुलकर्णीयंत्र, मंत्र नगरी असलेल्या नाशिककडे लगतच्या जिल्ह्यातील नागरिकांचा ओढा आहे. मुबलक रोजगार, चांगले शिक्षण, आरोग्यदायी हवामान अशी गुणवैशिष्ट्ये असल्याने नाशिकला मुंबई, पुणेकरदेखील ह्यसेकंड होमह्णसाठी प्राधान्य देत आहेत. बांधकाम व्यवसायाला देदीप्यमान परंपरा आहे. मात्र, मोजक्या लोकांमुळे या व्यवसायाला गालबोट लागते. रमेश मंडलिक यांच्या खुनाने भूमाफियांचे विश्व नाशिककरांसमोर आले. रम्मी आणि जिम्मी राजपूत बंधूंची टोळी हे उद्योग करीत होती. दोघांनाही राजकीय संरक्षण होते, हे उघड झाले. त्यांच्या टोळीतील बहुसंख्य गुंडांवर मोक्कांतर्गत कारवाई झाली. तरीही हे दोघे बंधू तब्बल आठ महिने पोलिसांना गुंगारा देत होते. फरार घोषित करून त्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याची कार्यवाही सुरू झाली आणि दोघे उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात गवसले. आठ महिने फरार राहण्यासाठी कोणाचे सहकार्य लाभले, या काळात ते कुणाच्या संपर्कात होते, हे पोलिसांनी शोधले तर त्यांचे गॉडफादर आणि या क्षेत्रातील आणखी काळी कृत्ये समोर येतील.बनावट दाखला मिळतोच कसा?प्रशासकीय यंत्रणेचे दशावतार सध्या जनता पाहत आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून काम केलेले परमबीर सिंह फरार आहेत. त्यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यातील सहआरोपी संजय मिश्रीलाल पुनमिया याने सिन्नर येथे कोट्यवधींची जमीन खरेदी केली. ही जमीन खरेदी करताना ठाणे जिल्ह्यातील शेतकरी असल्याचा बनावट दाखला त्याने दुय्यम निबंधक कार्यालयात दाखल केला. हे षड्यंत्र आता उघडकीस आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही जमीन परमबीर सिंह यांची असून, त्यांनी पुनमियाच्या नावाने खरेदी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करायला हवा. मात्र, बनावट दाखला मिळणे, खातरजमा न करता खरेदीखत होणे या बाबी संशय वाढविणाऱ्या आहेत. सामान्य माणसाला हजार चकरा मारल्यावरदेखील कामे होत नाहीत, असा अनुभव असताना बड्यांची कामे कशी बिनबोभाट होतात, हे अशा प्रकरणांमधून समोर येते. इतिवृत्तांत बदल कोणी केला? त्र्यंबकेश्वर परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. त्याठिकाणी पर्यटन उद्योग वाढीस लागायला हवा; पण याचा अर्थ डोंगरांचे उत्खनन करून, वन विभागाच्या जमिनी बळकावून रिसॉर्ट उभारणे अपेक्षित नाही. राज्यातील इतर पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जशी काँक्रीटची जंगले उभी राहिली, तसे त्र्यंबकेश्वरचे होऊ द्यायचे नसेल तर प्रशासकीय यंत्रणेने कठोर भूमिका घ्यायला हवी; पण सध्या भलतेच घडतेय. पर्यावरण राज्यमंत्र्यांसोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत ठरले वेगळेच आणि इतिवृत्तात नोंदविले गेले वेगळेच, असा आरोप पर्यावरणवादी संघटनांनी केला आहे. शासन आणि प्रशासन पाठराखण कोणाची करीत आहे, हे नेमके स्पष्ट तरी करा.लिलावात आदिवासी टिकतील काय?इगतपुरीत शासनाच्या एकाच विभागातील दोन कार्यालयांची विसंगत भूमिका संशय निर्माण करणारी आहे. वैतरणा जलविद्युत प्रकल्पासाठी घेतलेली ६२३ हेक्टर जमीन वापराविना पडून आहे. ही जमीन मूळ मालकांना म्हणजे आदिवासींना परत करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. मात्र, ही जमीन जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करून तिचा लिलाव करण्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने ना-हरकत दाखला देऊन टाकला. प्रकल्पासाठी जमीन देणारे आदिवासी बांधव लिलावात बिल्डर लॉबीच्या तुलनेत टिकतील काय, याचा विचार कुणी करणार आहे काय? पुन्हा तेच ते सुरू आहे.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण