शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

मूलभूत सुविधा नसताना स्मार्ट सिटी कशाला

By admin | Updated: January 24, 2016 00:10 IST

धनंजय मुंडे : कृषी महोत्सवात चर्चासत्र

नाशिक : एकवेळ पंतप्रधानपद टिकविणे सोपे, पण गावचे सरपंचपद टिकविणे सर्वांत अवघड गोष्ट आहे. एकीकडे गावात मूलभूत सुविधा उपलब्ध नसताना दुसरीकडे आधीच आखीव-रेखीव असलेल्या नवी मुंबई-नागपूरसारख्या शहरांना केंद्र सरकार स्मार्ट सिटी करण्यासाठी निघाले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी केला.डोंगरे वसतिगृहावर सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवात शनिवारी (दि.२३) ‘सरपंच-ग्रामसेवक मांदियाळी’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार मुंडे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे, आमदार जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष कैलास वाक््चौरे, विभागीय अध्यक्ष बापू अहिरे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे, आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील, केदा बापू काकुस्ते, तुकाराम सांगळे, शंकरराव खेमकर, यतिन कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, छबू नागरे, अर्जुन टिळे आदि उपस्थित होते. आमदार धनंजय मुंडे पुढे म्हणाले, गावकीचे राजकारण आणि निवडणुका या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपेक्षा वेगळ्या निवडणुका असतात. राज्यात किंवा केंद्रात एखादा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम एखाद-दोन वर्षात दिसतात. मात्र सरपंचाने एखादा निर्णय घेतला तर त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी लगेचच उमटतात. आज ग्रामपंचायतीला सार्वभौम दर्जा मिळाला असून, गावचा विकास करण्याचा निर्णय गावकरी घेऊ शकतात. (प्रतिनिधी)