शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
2
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
3
जितेंद्र यांनी प्रॉपर्टी मार्केटमध्ये उडवली खळबळ; जपानी कंपनीसोबत ५५९.२५ कोटी रुपयांचा करार, नक्की प्रकरण काय?
4
राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 
5
प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
6
ट्रम्प यांचा नवा 'रिअल इस्टेट' प्लॅन फसला! ग्रीनलँड विकत घेण्याच्या ऑफरला पंतप्रधानांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
7
पगारदारांनो लक्ष द्या! तुमच्या पीएफ खात्यावर मिळतोय ७ लाखांचा मोफत विमा; असा करा क्लेम
8
नोकरी सोडून शेतीची धरली कास! १३ लाखांच्या कर्जात बुडलेला तरुण आता कमावतोय वार्षिक २ कोटी
9
राधिका आपटेने बंडच पुकारलं! कामाच्या तासांवरुन निर्मात्यांसमोर ठेवल्या अटी, म्हणाली...
10
अत्यंत हलाखीची परिस्थिती, पत्र्याचं घर अन् गंभीर आजाराचा सामना; जालन्याचा काळू डॉन म्हणाला- "दर महिन्याला रक्त बदलावं लागतं..."
11
मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास...
12
आता चांदी ₹3 लाखच्या जवळ...! MCX वर 10800 रुपयांनी वधारला भाव; गुंतवणूकदारांना करतेय मालामाल
13
वंदे भारत, तेजस, शताब्दी की गतिमान; तिकीट दर वाढल्यावर कोणत्या ट्रेनचा प्रवास स्वस्त?
14
Thailand Train Accident: थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
15
८० वर्षांच्या डॉक्टरची १५ कोटींची फसवणूक! १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट', ७०० बँक खात्यांत पैसा
16
भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानाला आग, अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
17
एका शेअरवर ५७ रुपयांचा डिविडंड देणार TATA समूहाची 'ही' कंपनी; रेकॉर्ड डेट जवळ, तुमच्याकडे आहे का?
18
नातूच झाला काळ! स्वतःच्या हाताने संपवलं आजी-आजोबांचं आयुष्य; आजीच्या एका खुणेने पकडला गेला
19
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत सुविधा नसताना स्मार्ट सिटी कशाला

By admin | Updated: January 24, 2016 00:10 IST

धनंजय मुंडे : कृषी महोत्सवात चर्चासत्र

नाशिक : एकवेळ पंतप्रधानपद टिकविणे सोपे, पण गावचे सरपंचपद टिकविणे सर्वांत अवघड गोष्ट आहे. एकीकडे गावात मूलभूत सुविधा उपलब्ध नसताना दुसरीकडे आधीच आखीव-रेखीव असलेल्या नवी मुंबई-नागपूरसारख्या शहरांना केंद्र सरकार स्मार्ट सिटी करण्यासाठी निघाले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी केला.डोंगरे वसतिगृहावर सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवात शनिवारी (दि.२३) ‘सरपंच-ग्रामसेवक मांदियाळी’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार मुंडे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे, आमदार जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष कैलास वाक््चौरे, विभागीय अध्यक्ष बापू अहिरे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे, आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील, केदा बापू काकुस्ते, तुकाराम सांगळे, शंकरराव खेमकर, यतिन कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, छबू नागरे, अर्जुन टिळे आदि उपस्थित होते. आमदार धनंजय मुंडे पुढे म्हणाले, गावकीचे राजकारण आणि निवडणुका या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपेक्षा वेगळ्या निवडणुका असतात. राज्यात किंवा केंद्रात एखादा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम एखाद-दोन वर्षात दिसतात. मात्र सरपंचाने एखादा निर्णय घेतला तर त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी लगेचच उमटतात. आज ग्रामपंचायतीला सार्वभौम दर्जा मिळाला असून, गावचा विकास करण्याचा निर्णय गावकरी घेऊ शकतात. (प्रतिनिधी)