शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
3
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
5
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
6
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
7
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
8
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
9
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
10
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
11
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
12
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
13
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
14
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
15
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
16
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
17
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
18
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
19
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या शेतमालावरच तुमचा डोळा का?; संदीप जगताप यांचा केंद्र सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 15:51 IST

महागाई दर कमीच करायचा असेल तर केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव कमी करून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा द्यावा.

किशाेर बोरा

वणी (जि. नाशिक) : शेतमालाचे भाव वाढले की केंद्र सरकार हस्तक्षेप करते व भाव पाडते. महागाई दर कमीच करायचा असेल तर केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव कमी करून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा द्यावा. परंतु तिकडे लक्ष न देता केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालावर डोळा का ठेवते ? असा सवाल स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केंद्र सरकारला विचारला. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. याविरुद्ध वणी येथे शेतकऱ्यांनी सोमवारी रास्ता रोको केला. त्याप्रसंगी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप बोलत होते. आंदोलनात दिंडोरी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, संचालक गंगाधर निखाडे, स्वाभिमानी तालुका अध्यक्ष संदीप उफाडे , बाळासाहेब घडवजे , संतोष रेहरे यासह तालुक्यातील अनेक नेते पदाधिकारी सहभागी झाले होते.

वणी ता. दिंडोरी येथे स्वाभिमानीच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने सर्वपक्षीय नेते व शेतकरी यांनी एकत्र येत केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी रास्ता रोको केला.या प्रसंगी शासकीय आदेशाची होळी देखील करण्यात आली. आंदोलनात शेतकऱ्यांसोबत व्यापारी देखील सहभागी झाले. दिंडोरी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड , गंगाधर निखाडे यांनी आपल्या भाषणातून केंद्र सरकारच्या निर्णयावर तोफ डागली. आमचं पद गेले तरी चालेल आम्ही शेतकऱ्यांसोबत राहू असे प्रशांत कड यांनी सांगितले.२०२४ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार शेतमालाचे भाव पाडण्याचे धोरण राबवत आहे. एक बाजूला गव्हाचे आयात शुल्क संपूर्ण कमी केले. टोमॅटो परदेशातून आयात करण्यासाठी अनुदान दिले. दुसऱ्या बाजूला कांदा निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावले. म्हणजे फक्त शेतमालाचे भाव पाडायचे एवढेच धोरण आज केंद्र सरकारचे दिसत आहे. असे सरकारचे धोरण राहिल्यास या देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांना आत्महत्येच्या वाटेने जावे लागेल. सरकारने असे निर्णय घेणे थांबवलं पाहिजे. तुमच्या अशा धोरणांना कंटाळून जर शेतकऱ्यांनी शेती करायचं सोडून दिले तर कारखान्यांमध्ये अन्नधान्य तयार करणार का..?- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना