शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

शेतकऱ्यांच्या शेतमालावरच तुमचा डोळा का?; संदीप जगताप यांचा केंद्र सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 15:51 IST

महागाई दर कमीच करायचा असेल तर केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव कमी करून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा द्यावा.

किशाेर बोरा

वणी (जि. नाशिक) : शेतमालाचे भाव वाढले की केंद्र सरकार हस्तक्षेप करते व भाव पाडते. महागाई दर कमीच करायचा असेल तर केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव कमी करून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा द्यावा. परंतु तिकडे लक्ष न देता केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालावर डोळा का ठेवते ? असा सवाल स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केंद्र सरकारला विचारला. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. याविरुद्ध वणी येथे शेतकऱ्यांनी सोमवारी रास्ता रोको केला. त्याप्रसंगी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप बोलत होते. आंदोलनात दिंडोरी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, संचालक गंगाधर निखाडे, स्वाभिमानी तालुका अध्यक्ष संदीप उफाडे , बाळासाहेब घडवजे , संतोष रेहरे यासह तालुक्यातील अनेक नेते पदाधिकारी सहभागी झाले होते.

वणी ता. दिंडोरी येथे स्वाभिमानीच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने सर्वपक्षीय नेते व शेतकरी यांनी एकत्र येत केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी रास्ता रोको केला.या प्रसंगी शासकीय आदेशाची होळी देखील करण्यात आली. आंदोलनात शेतकऱ्यांसोबत व्यापारी देखील सहभागी झाले. दिंडोरी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड , गंगाधर निखाडे यांनी आपल्या भाषणातून केंद्र सरकारच्या निर्णयावर तोफ डागली. आमचं पद गेले तरी चालेल आम्ही शेतकऱ्यांसोबत राहू असे प्रशांत कड यांनी सांगितले.२०२४ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार शेतमालाचे भाव पाडण्याचे धोरण राबवत आहे. एक बाजूला गव्हाचे आयात शुल्क संपूर्ण कमी केले. टोमॅटो परदेशातून आयात करण्यासाठी अनुदान दिले. दुसऱ्या बाजूला कांदा निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावले. म्हणजे फक्त शेतमालाचे भाव पाडायचे एवढेच धोरण आज केंद्र सरकारचे दिसत आहे. असे सरकारचे धोरण राहिल्यास या देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांना आत्महत्येच्या वाटेने जावे लागेल. सरकारने असे निर्णय घेणे थांबवलं पाहिजे. तुमच्या अशा धोरणांना कंटाळून जर शेतकऱ्यांनी शेती करायचं सोडून दिले तर कारखान्यांमध्ये अन्नधान्य तयार करणार का..?- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना