शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

याचसाठी केला होता अट्टाहास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 22:48 IST

नाशिक : मनसे स्थापन झाल्यानंतर नाशिकची ‘दोन हाती’ सूत्रे वसंत गिते आणि अतुल चांडक यांच्याकडे एकवटली होती. त्यावेळी त्यांच्या विषयीच्या बऱ्या वाईट तक्रारींची दखल घेऊन राज ठाकरे यांनी अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्याकडे सूत्रे दिली आणि सर्वाधिकार त्यांनाच देऊन टाकले. त्यामुळे गिते-चांडक पक्ष सोडून गेले आणि आता त्याच ढिकले यांनी राज यांची साथ सोडल्याने ‘याचसाठी केला होता अट्टाहास’, असे म्हणण्याची वेळ राज यांच्यावर आली आहे.

ठळक मुद्देढिकलेंची सोडचिठ्ठी । सूत्रे आता कोणाकडे?

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मनसे स्थापन झाल्यानंतर नाशिकची ‘दोन हाती’ सूत्रे वसंत गिते आणि अतुल चांडक यांच्याकडे एकवटली होती. त्यावेळी त्यांच्या विषयीच्या बऱ्या वाईट तक्रारींची दखल घेऊन राज ठाकरे यांनी अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्याकडे सूत्रे दिली आणि सर्वाधिकार त्यांनाच देऊन टाकले. त्यामुळे गिते-चांडक पक्ष सोडून गेले आणि आता त्याच ढिकले यांनी राज यांची साथ सोडल्याने ‘याचसाठी केला होता अट्टाहास’, असे म्हणण्याची वेळ राज यांच्यावर आली आहे.मनसे स्थापन झाल्यानंतर २००९ मध्ये नाशिक शहरातील चारपैकी तीन जागा मनसेला मिळाल्या. नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच चाळीस जागांचा टप्पा मनसेने पार केला; परंतु सत्ता येत असताना सर्व सूत्रे वसंत गिते आणि अतुल चांडक यांच्या हाती एकवटली होती. पण तेथूनच कुरबुरींना सुरुवात झाली. राज यांच्याकडे गिते-चांडक या जोडगोळी विषयी तक्रारींचा पाढा सुरू झाला. राज यांनी त्या तक्रारींवर विश्वास ठेवला आणि जोडगोळीचे पंख छाटले. त्यामुळे गिते यांनी पक्ष सोडला ते भाजपात गेले. त्यानंतर अतुल चांडक हे मुळातच राजकारणी नव्हते. त्यांनी त्यांच्या व्यवसायाकडे लक्ष दिले. त्यानंतर शहराध्यक्ष राहुल ढिकले यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली. मनसेची आज अवस्था बिकट आहे. त्यातच राज यांची निवडणूक लढवावी किंवा नाही अशी द्विधा मन:स्थिती असल्याचे निमित्त करून ढिकले यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे आता पक्षाची सूत्रे कोणाकडे सोपवायची असादेखील प्रश्न निर्माण झाला आहे.अनेक नेत्यांना राहुल भेटल्याने राज नाराजमनसेची सर्व सूत्रे त्यातच प्रदेशपातळीवरील पद असे सर्व काही दिले असतानाही राहुल ढिकले हे विधानसभेसाठी अगतिक झाले होते. त्यांनी राष्टÑवादीचे नेते शरद पवार, भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भेटी-गाठी घेतल्या, असे सांगितले जाते. त्यामुळे राज ठाकरे नाराज झाले.

टॅग्स :MNSमनसेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019