शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

रामपाल बाबाला ‘नाम’ कोण देणार?

By admin | Updated: November 23, 2014 23:49 IST

कळीचा प्रश्न : भक्तांवर दैनंदिन जीवनात लादले होते अनेक निर्बंध

नाशिक : तुम्ही चित्रपट पाहू नका, माझ्याशिवाय इतरांची पूजा करू नका, डोक्याला काळे लावू नका, अवैध धंदे करू नका, जर असे काही (चुकून) घडल्यास आश्रमात या, मी तुम्हाला माफी (आश्रमाच्या भाषेत नाम) देतो म्हणजे तुम्ही पापमुक्त (?) व्हाल, असा संदेश भक्तांना देणाऱ्या रामपाल बाबावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता रामपाल बाबाला त्यापासून कोण वाचविणार अर्थात ‘नाम’ कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.नाशिकमध्ये रामपाल बाबाचे शेकडो भक्त आहेत. त्यात तरुणांचे प्रमाणही लक्षवेधी आहे. अशा भगतजींच्या घरी अथवा दुकानात गेल्यास केवळ रामपाल बाबाचे भलेमोठे चित्र लावलेले दिसायचे आणि रामपाल यांनी तयार केलेली आरती रोज सायंकाळी ७ वाजता ध्वनिफितीद्वारे वाजविली जायची. सर्व देवांचा देव असणाऱ्या कुबेराचाच मी भक्त असल्याने केवळ माझीच पूजा करा, असे सांगणाऱ्या रामपाल बाबाने भक्तांवर अनेक निर्बंध लादले होते. त्यात खोटे बोलू नये असेही सांगण्यात आले होते. या निर्बंधांपैकी कोणत्याही नियमाचा भंग झाल्यास त्याची माफी मागण्यासाठी आश्रमात जावे लागत होते. आश्रमात गेल्यानंतर काही सेवा (प्रार्थना, जप) केल्यानंतर रामपाल बाबा भक्तांना जप करण्यासाठी मंत्र अर्थात नाम द्यायचे. त्यामुळे मागील घटना विसरायची आणि नव्याने सेवेकडे वळायचे असा त्याचा अर्थ घेतला जात होता. आश्रमाबाहेर पोलिसांनी सलग तीन दिवस बाबाला पकडण्यासाठी तळ ठोकला असताना बाबा आश्रमात नाहीत असे पोलिसांना सांगणाऱ्या भक्तांनी आणि स्वत: रामपाल बाबानेही खोटे बोलून स्वत:च्याच शिकवणीचा एकप्रकारे भंगच केला. त्यामुळे आता त्यांचे तपोबल एकप्रकारे स्पष्टच झाले आहे. त्यामुळे या भक्तांना आता नाम कोण देणार आणि खुद्द रामपाल बाबाच आश्रमातून पोलिसांना मिळून आल्याने त्याला तरी नाम कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)