शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘यांच्या’ व्यथा जाणिल्या कुणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:55 IST

नाशिक : घंटागाडी थोडी उशिरा आली की, कामगारांच्या नावाने बोटे मोडायला आपण मोकळे होतो. परंतु, आयुष्यभर घाण-कचºयातच काम करणाºया या कामगारांच्या व्यथा-वेदना जाणल्या आहेत कुणी?

ठळक मुद्देकर्करोगासारख्या दुर्धर आजारानेही पछाडलेकेवळ कागदावरच पुरविल्या जाणाºया या सोयी-सुविधा

नाशिक : घंटागाडी थोडी उशिरा आली की, कामगारांच्या नावाने बोटे मोडायला आपण मोकळे होतो. परंतु, आयुष्यभर घाण-कचºयातच काम करणाºया या कामगारांच्या व्यथा-वेदना जाणल्या आहेत कुणी? महापालिकेकडून ठेकेदारांमार्फत शहरात चालविल्या जाणाºया घंटागाड्यांमध्ये जवळपास आठशेच्या आसपास कामगार काम करतात. मात्र, या कामगारांना कोणतीही संरक्षक साधने पुरविली जात नसल्याचे भीषण वास्तव आहे. त्यातूनच अनेक कामगारांच्या आरोग्य समस्या वाढीस लागून त्यांना श्वसनाचे, पोटाचे तसेच कर्करोगासारख्या दुर्धर आजारानेही पछाडले आहे. महापालिकेने ठेकेदारांशी केलेल्या करारनाम्यात अटी-शर्तींनुसार, कामगारांना गणवेश, गमबूट, हॅण्डग्लोज, मास्क पुरविणे बंधनकारक आहे. परंतु, केवळ कागदावरच पुरविल्या जाणाºया या सोयी-सुविधा कामगारांना प्रत्यक्ष मिळतात की नाही, याबाबत महापालिकेचे मुखंड उदासीन आहेत. शहरातील सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड, पूर्व आणि पश्चिम या सहा विभागांमध्ये महापालिकेने डिसेंबर २०१६ मध्ये ठेकेदारांना घंटागाडीचा ठेका दिलेला आहे. पाच वर्षांसाठी हा ठेका देताना त्याचा करारनामा करण्यात आलेला आहे. या करारनाम्यात कामगारांना आवश्यक ती संरक्षक साधने पुरविणे हे बंधनकारक आहे. परंतु, ‘लोकमत’ने वस्तुस्थिती जाणून घेतली असता, कामगारांच्या हातात ना ग्लोज आढळले, ना त्यांच्या पायात गमबूट. चेहºयाच्या मास्कची तर बाबच दूर. हाताने घाण-कचरा स्वीकारत, गाडीतच ओला-सुका कचºयाचे विलगीकरण करत शहरातून जमा झालेला कचरा खतप्रकल्पावर नेऊन टाकण्याचे काम सुरू आहे. वास्तविक घंटागाडीवर काम करणाºया कामगारांची दर सहा महिन्यांनी एकदा आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. परंतु, आरोग्य तपासणीबाबत महापालिका उदासीन आहे. त्याचे ठेकेदारांनाही सोयरसुतक नाही. दैनंदिन कामात तर कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कामगारांतील अनेक जण कुटुंबप्रमुख आहेत. परंतु, त्यांना कामाच्या मोबदल्यासाठीही झगडावे लागते. कामगार संघटनांमार्फत त्यांच्या समस्यांसाठी वेळोवेळी आंदोलने केली जातात. परंतु, उपेक्षित असलेल्या या घटकाकडे नेहमीच दुर्लक्ष होत आलेले आहे. जो शहराचा कचरा नित्यनेमाने उचलतो त्याच कामगाराची कचºयासारखी स्थिती बनलेली आहे. त्याच्या मागे समर्थ, ताकदवार असा ‘आवाज’ नाही, हे त्याचे मोठे दुर्दैव आहे. महापालिकेशी झालेल्या करारनाम्यानुसार, घंटागाडीवर तीन कामगार, त्यात एक बदली कामगार आणि सुटीच्या दिवसाचा कामगार पुरविणे ठेकेदारांना बंधनकारक आहे. परंतु, या अटी-शर्तीचे पालन होताना दिसून येत नाही. बºयाच घंटागाड्यांवर दोनच कर्मचारी कामकरताना दिसून येतात. एक वाहनचालक आणि दुसरा कचरा संकलक. बºयाचदा वाहनचालकालाही कचरा संकलकाची भूमिका निभवावी लागते. घंटागाडीवर सध्या सेवाज्येष्ठतेनुसार ४५० कामगार कार्यरत आहेत. महापालिकेने नवीन घंटागाड्या वाढविल्याने सुमारे ३५० ते ४०० कामगार नव्याने दाखल झाले आहेत. त्यामुळे, सुमारे ८००च्या आसपास कामगार काम करत असल्याचे दाखविले जात असले तरी, सुमारे २०० घंटागाड्यांचा विचार करता प्रत्यक्षात दोन किंवा तीनच कामगार एका घंटागाडीवर दिसून येतात. घंटागाडी कामगारांची संख्या पुरेशी नसल्याने बºयाचदा अनेक कामगारांना दोन-तीन पाळ्यांमध्ये काम करावे लागत असल्याची संघटनेची तक्रार आहे. घंटागाडी कामगार हे सतत घाण-कचºयात काम करत असतात. कचºयाच्या दुर्गंधीतही त्यांना त्यांच्या कामाची क्षमता टिकवून ठेवावी लागत असते. कामगारांना तोंडाला लावण्यासाठी मास्क देणे बंधनकारक आहे. त्याचा पुरवठा ठेकेदाराने करणे अनिवार्य आहे. परंतु, आजमितीला एकही घंटागाडी कामगार मास्क घालून काम करताना दिसून येत नाही. त्याऐवजी, अनेक कामगार तोंडाला हातरुमाल बांधून त्याचाच मास्क म्हणून उपयोग करतात. वास्तविक दर आठवड्याला घंटागाडी कामगारांना दर्जेदार मास्क पुरविणे गरजेचे आहे. त्याचे रेकॉर्डही ठेकेदाराने ठेवले पाहिजे आणि ते महापालिकेला सादर केले पाहिजे. परंतु, ठेकेदाराकडून असे रेकॉर्ड ठेवले जात असले तरी त्याच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह आहे आणि महापालिकेच्या आरोग्य विभागालाही त्याबाबत वास्तव जाणून घेणे गरजेचे वाटत नाही. मास्कचा पुरवठा होत नाही तसेच गमबूटही दिले जात नाहीत. घाण-कचºयात पाय रोवून काम करणाºया कामगारांना त्यामुळे पायांना अनेक जखमा झाल्याचे दिसून येते. बºयाचदा कचºयात काचा, जैविक कचºयातील इंजेक्शने यांसारखे प्रकार टाकून दिलेले असतात. ते संरक्षक साधने नसलेल्या कामगारांच्या जिवाशी खेळण्यासारखेच आहे. याबाबत महापालिकेचा आरोग्य विभाग पूर्णपणे उदासीन आहे.करारनाम्यानुसार, प्रत्येक घंटागाडी कामगाराला हॅण्डग्लोज पुरविणे बंधनकारक आहे. परंतु, प्रत्यक्षात कामगारांच्या हातात कुठेही ग्लोज दिसून आले नाही. कामगारांकडून ग्लोजविनाच कचºयाचे संकलन केले जात आहे. त्यातून नखांमध्ये जीवजंतू जाऊन कामगारांना रोगाला निमंत्रण मिळते आहे. काही नागरिक हे घातक कचराही घंटागाडीत टाकून देतात. त्याचे विलगीकरण करतानाही कामगारांना जखमा होतात. कामगारांना हात धुण्यासाठी तसेच पिण्यासाठी वाहनाच्या पार्किंगच्या ठिकाणी तसेच खतप्रकल्पावर पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु, तशी सुविधाही उपलब्ध करून देण्यास महापालिका असमर्थ ठरलेली आहे. वास्तविक हात धुण्यासाठी कामगारांना साबणही उपलब्ध करून द्यायला हवा. परंतु, पाणीच मिळत नसेल तर साबणाची सुविधा दूरच आहे.