शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा-डीजीपीनगर रस्त्यावर पांढरे पट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:42 IST

वाहतुकीसाठी असुरक्षित बनत चाललेल्या वडाळा-डीजीपीनगरमार्गे पुणे-मुंबई महामार्गांना जोडणाऱ्या संत सावता माळी कॅनॉल रस्त्यावर ठिकठिकाणी पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी अजूनही पांढºया पट्ट्यांची प्रतीक्षा आहे.

नाशिक : वाहतुकीसाठी असुरक्षित बनत चाललेल्या वडाळा-डीजीपीनगरमार्गे पुणे-मुंबई महामार्गांना जोडणाऱ्या संत सावता माळी कॅनॉल रस्त्यावर ठिकठिकाणी पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी अजूनही पांढºया पट्ट्यांची प्रतीक्षा आहे. वडाळा-डीजीपीनगर रस्ता हा वर्दळीचा आहे. या रस्त्यावर नेहमीच अपघात घडतात. रस्त्याला ठिकठिकाणी धोकादायक अपघाती वळणं आहेत. यामुळे या वळणांवरून मार्गस्थ होताना वाहने समोरासमोर येऊन अपघात घडतो. या रस्त्याला उपनगरांमधील जोड रस्तेदेखील येऊन मिळतात. त्यामुळेही या रस्त्यावरील वाहतूक असुरक्षित होते. वडाळा चौफुली, रहेमतनगर येथे पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. मात्र येथून पुढे खोडेनगर, पांडुरंग चौक, म्हसोबा चौक, गणेशनगर जोड रस्ता या ठिकाणी पांढरे पट्टे मारण्याची गरज आहे.तसेच रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी पांढरा पट्टा मारला जावा, अशी मागणी होत आहे. तसेच दुभाजकाजवळ व रस्त्याच्या कडेला धोकादायक वळणांवर रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.या रस्त्यावरील रविशंकर मार्गाच्या टी-पॉइंटवरील वाहतूक बेटापासून पुढे डीजीपीनगर, विघ्नहरण गणेश मंदिरापर्यंतचे पथदीप बंद असल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य कायम आहे. या मार्गावरील बंद पथदीप त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.पथदीपांची मागणीनव्या वाहतूक बेटामध्ये नव्याने पथदीप बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत महापालिका, शहर वाहतूक नियंत्रण शाखेने संयुक्तरीत्या प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashikनाशिक