शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

भाजपाकडे पैसा आला कोठून? - निखिल वागळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:41 IST

सध्या भाजपाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जाहीरातींवर खर्च करण्यात येत आहे. हा पैसा कोठून आला याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले.

विंचूर : सध्या भाजपाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जाहीरातींवर खर्च करण्यात येत आहे. हा पैसा कोठून आला याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले.विंचूर येथे आयोजित शारदोत्सव व्याख्यानमालेत ‘प्रसारमाध्यमे स्थिती आणि वस्तुस्थिती’ या विषयावर चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैयासाहेब देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, मुधकर कड उपस्थित होते.वागळे पुढे म्हणाले, मोबाइलमुळे जगात मोठी क्रांती झाली असून, जगभरात काय सुरू आहे ते आपल्याला समजत असल्याने अवघे जग हातात आले आहे. त्यामुळे ही क्रांती आणि समाजमाध्यमे समजून घेणे गरजेचे आहे. मोबाइल वापरासाठी प्रगल्भता असावी लागते. यावेळी वागळे यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. मोदींविरोधी बोलणाऱ्या बुद्धिवादी लोकांना दहशतवादी ठरवले जाते की काय, असा प्रश्न उपस्थित करून माध्यमांनी आवाज उठविला पाहिजे मात्र तसे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सध्या माध्यमांची मूल्ये पायदळी तुडवली जात असून, त्यासाठी मीडियावर वाचक, प्रेक्षकांचा दबाव गट असणे गरजेचे आहे. जनता सार्वभौम आहे. यासाठी माध्यमे माहितीचा स्रोत बनायला हवी, असेही ते म्हणाले.भुजबळ आणि वागळे एकाच व्यापीठावर कसे ?आमदार छगन भुजबळ आणि मी एकाच व्यासपीठावर येणार हे मला व्याख्यानाच्या दिवशी सकाळी समजले असे सांगुन मी राजकीय अस्पृश्यता मानत नसल्याचे वागळे म्हणाले. उद्या भाजपवाले प्रश्न करतील वागळे भुजबळांबरोबर गेले कसे? त्यासाठी मी आधीच खुलासा करतो की, मी जर देवेंद्र फडणवीस यांसह भाजपच्या अनेक नेत्यांबरोबर व्यासपीठावर जाऊ शकतो, तर भुजबळांबरोबर का नाही. भुजबळांवर जसे आरोप आहेत तसेच अनेक भाजपाच्या मंत्र्यांवरही आरोप आहेत. मात्रअद्याप ते सिद्ध झालेले नाहीत. बहुजन नेत्यांना टार्गेट करु न तुरु ंगात टाकले जात असून, सिंचन घोटाळे करणारे अद्यापही बाहेर कसे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.राहुल गांधींचा हेतु चांगलाराहुल गांधी हा माणूस खुन्शी वाटत नाही. त्यांचा हेतू चांगला वाटतो. राजकारणात यशस्वी होईल की नाही माहित नाही, पण प्रामाणीक व्यक्ती आहे. चार वर्षात द्वेष पसरवण्याचे जे काम झालं ते राहुल गांधी यांच्याकडून होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकPoliticsराजकारणBJPभाजपा