शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडे पैसा आला कोठून? - निखिल वागळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:41 IST

सध्या भाजपाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जाहीरातींवर खर्च करण्यात येत आहे. हा पैसा कोठून आला याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले.

विंचूर : सध्या भाजपाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जाहीरातींवर खर्च करण्यात येत आहे. हा पैसा कोठून आला याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले.विंचूर येथे आयोजित शारदोत्सव व्याख्यानमालेत ‘प्रसारमाध्यमे स्थिती आणि वस्तुस्थिती’ या विषयावर चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैयासाहेब देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, मुधकर कड उपस्थित होते.वागळे पुढे म्हणाले, मोबाइलमुळे जगात मोठी क्रांती झाली असून, जगभरात काय सुरू आहे ते आपल्याला समजत असल्याने अवघे जग हातात आले आहे. त्यामुळे ही क्रांती आणि समाजमाध्यमे समजून घेणे गरजेचे आहे. मोबाइल वापरासाठी प्रगल्भता असावी लागते. यावेळी वागळे यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. मोदींविरोधी बोलणाऱ्या बुद्धिवादी लोकांना दहशतवादी ठरवले जाते की काय, असा प्रश्न उपस्थित करून माध्यमांनी आवाज उठविला पाहिजे मात्र तसे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सध्या माध्यमांची मूल्ये पायदळी तुडवली जात असून, त्यासाठी मीडियावर वाचक, प्रेक्षकांचा दबाव गट असणे गरजेचे आहे. जनता सार्वभौम आहे. यासाठी माध्यमे माहितीचा स्रोत बनायला हवी, असेही ते म्हणाले.भुजबळ आणि वागळे एकाच व्यापीठावर कसे ?आमदार छगन भुजबळ आणि मी एकाच व्यासपीठावर येणार हे मला व्याख्यानाच्या दिवशी सकाळी समजले असे सांगुन मी राजकीय अस्पृश्यता मानत नसल्याचे वागळे म्हणाले. उद्या भाजपवाले प्रश्न करतील वागळे भुजबळांबरोबर गेले कसे? त्यासाठी मी आधीच खुलासा करतो की, मी जर देवेंद्र फडणवीस यांसह भाजपच्या अनेक नेत्यांबरोबर व्यासपीठावर जाऊ शकतो, तर भुजबळांबरोबर का नाही. भुजबळांवर जसे आरोप आहेत तसेच अनेक भाजपाच्या मंत्र्यांवरही आरोप आहेत. मात्रअद्याप ते सिद्ध झालेले नाहीत. बहुजन नेत्यांना टार्गेट करु न तुरु ंगात टाकले जात असून, सिंचन घोटाळे करणारे अद्यापही बाहेर कसे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.राहुल गांधींचा हेतु चांगलाराहुल गांधी हा माणूस खुन्शी वाटत नाही. त्यांचा हेतू चांगला वाटतो. राजकारणात यशस्वी होईल की नाही माहित नाही, पण प्रामाणीक व्यक्ती आहे. चार वर्षात द्वेष पसरवण्याचे जे काम झालं ते राहुल गांधी यांच्याकडून होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकPoliticsराजकारणBJPभाजपा