शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

भाजपाकडे पैसा आला कोठून? - निखिल वागळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:41 IST

सध्या भाजपाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जाहीरातींवर खर्च करण्यात येत आहे. हा पैसा कोठून आला याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले.

विंचूर : सध्या भाजपाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जाहीरातींवर खर्च करण्यात येत आहे. हा पैसा कोठून आला याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले.विंचूर येथे आयोजित शारदोत्सव व्याख्यानमालेत ‘प्रसारमाध्यमे स्थिती आणि वस्तुस्थिती’ या विषयावर चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैयासाहेब देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, मुधकर कड उपस्थित होते.वागळे पुढे म्हणाले, मोबाइलमुळे जगात मोठी क्रांती झाली असून, जगभरात काय सुरू आहे ते आपल्याला समजत असल्याने अवघे जग हातात आले आहे. त्यामुळे ही क्रांती आणि समाजमाध्यमे समजून घेणे गरजेचे आहे. मोबाइल वापरासाठी प्रगल्भता असावी लागते. यावेळी वागळे यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. मोदींविरोधी बोलणाऱ्या बुद्धिवादी लोकांना दहशतवादी ठरवले जाते की काय, असा प्रश्न उपस्थित करून माध्यमांनी आवाज उठविला पाहिजे मात्र तसे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सध्या माध्यमांची मूल्ये पायदळी तुडवली जात असून, त्यासाठी मीडियावर वाचक, प्रेक्षकांचा दबाव गट असणे गरजेचे आहे. जनता सार्वभौम आहे. यासाठी माध्यमे माहितीचा स्रोत बनायला हवी, असेही ते म्हणाले.भुजबळ आणि वागळे एकाच व्यापीठावर कसे ?आमदार छगन भुजबळ आणि मी एकाच व्यासपीठावर येणार हे मला व्याख्यानाच्या दिवशी सकाळी समजले असे सांगुन मी राजकीय अस्पृश्यता मानत नसल्याचे वागळे म्हणाले. उद्या भाजपवाले प्रश्न करतील वागळे भुजबळांबरोबर गेले कसे? त्यासाठी मी आधीच खुलासा करतो की, मी जर देवेंद्र फडणवीस यांसह भाजपच्या अनेक नेत्यांबरोबर व्यासपीठावर जाऊ शकतो, तर भुजबळांबरोबर का नाही. भुजबळांवर जसे आरोप आहेत तसेच अनेक भाजपाच्या मंत्र्यांवरही आरोप आहेत. मात्रअद्याप ते सिद्ध झालेले नाहीत. बहुजन नेत्यांना टार्गेट करु न तुरु ंगात टाकले जात असून, सिंचन घोटाळे करणारे अद्यापही बाहेर कसे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.राहुल गांधींचा हेतु चांगलाराहुल गांधी हा माणूस खुन्शी वाटत नाही. त्यांचा हेतू चांगला वाटतो. राजकारणात यशस्वी होईल की नाही माहित नाही, पण प्रामाणीक व्यक्ती आहे. चार वर्षात द्वेष पसरवण्याचे जे काम झालं ते राहुल गांधी यांच्याकडून होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकPoliticsराजकारणBJPभाजपा