शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

शिक्षणेतर कामकाजातून शिक्षकांची सुटका केव्हा होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST

नशिक : शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कामकाजच करून घ्यायला हवे, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने हा ...

नशिक : शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कामकाजच करून घ्यायला हवे, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने हा निकाल देताना शिक्षण अधिकार अधिनियम २७चा हवाला दिला आहे. अशाप्रकारे शिक्षणेतर कामकाजापासून शिक्षकांची मुक्तता होण्यासाठी महाराष्ट्रातील विविध शिक्षण संघटनांनी वारंवार आंदोलने करून पाठपुरावाही केला आहे. परंतु त्यांना अद्यापही यश आलेले नाही. उलट दिवसेंदिवस शिक्षकांवरील शिक्षणेतर कामकाजाचा ताण वाढतच आहे.

शिक्षकांना यापूर्वी लोकसंख्या सर्वेक्षण, निवडणुकांसंबधी कामकाज तसेच विविध प्रकारचे गाव सर्वेक्षणाचे अहवाल तयार करण्याचे काम करावे लागत होते. त्यातच काही ठिकाणी शिक्षकांना पोषण आहार तयार करून विद्यार्थ्यांना वाटपही करावे लागत आहे. पूर्वी हे काम बचतगटांना देण्यात आले होते. मात्र, बचतगटांनीही पुरेशा मानधनाअभावी हे काम बंद केले आहे. त्यामुळे पोषण आहारातील खिचडी शिजविण्यापासून तिचे विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे काम शिक्षकांनाच करावे लागत आहे. सद्यस्थितीत कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी पोषण आहाराचा निधी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याचे कामही शिक्षकांनाच करावे लागत आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा - ३२६६

एकूण शिक्षक - १२९१७

शिक्षकांची कामे

- खिचडी शिजवून घेणे व मुलांना वाटप करणे

- विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार करणे

- शाळेची डागडुजी, रंगकाम करणे

- विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे

- मतदार नोंदणी व यादी पडताळणी

- आरोग्य सर्वेक्षण व जनगणना करणे

शिक्षण सोडून इतर कामांसाठीच प्रत्येक शाळेत किमान एक शिक्षक

प्राथमिक शाळेत कारकून अथवा शिपाई पद उपलब्ध नाही. त्यामुळे शिक्षकांना इतर कामांसह वेगवेगळे अहवाल भरण्याचेही काम करावे लागते. शिक्षणेतर कामकाज करण्यात गुरफटलेल्या शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नसताना अशा अहवालांची पूर्तता करण्यासाठीच प्रत्येक शाळेत एक शिक्षक नियमित कार्यरत राहतो.

एक शिक्षकी शाळेचे हाल

एक शिक्षकी शाळेत शिकविण्यासह सर्वकामे एकाच शिक्षकाला करावी लागतात. शक्यतो वस्तिशाळांमध्ये अशाप्रकारे एकच शिक्षक कार्यरत असतो. त्याला संबंधित वस्तीच्या विविध सर्वेक्षणांसह मुलांना शिकविण्याचेही काम करावे लागते. त्यामुळे अशा शाळांचे आणखीनच हाल होताना दिसून येत आहेेत.

शिक्षक काय म्हणतात?

शिक्षकांना शिक्षणेतर कामकाज दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा विपरीत रिणाम होतो. त्यामुळे शिक्षकांना केवळ शिकविण्याचे काम दिले पाहिजे. पोषण आहार, विविध सर्व्हे, बँक खाते उघडणे यासारख्या कामकाजासाठी शासनाने स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे.

- सुभाष अहिरे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ,

--

शिक्षकांचे प्रमुख काम अध्यापनाचे आहे. परंतु, शिक्षकांवर अतिरिक्त कामकाजाच्या बोजामुळे अध्यापनाकडे शिक्षक लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. अशा कामकाजासाठी शासनाने स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.

- प्रवीण कांबळे, शिक्षक

शिक्षणेतर कामाचा ताण कमी व्हावा

शिक्षकांवरील शिक्षणेतर कामकाजाचा ताण कमी झाला तर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक अधिक कार्यक्षमतेने अध्यापन करू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीलाही मदत होईल. परंतु शासनाकडून वारंवार होणाऱ्या सूचनांमुळे शिक्षकांना गाव सर्वेक्षण, आरोग्यविषयक तसेच निवडणुकांविषयी वेगवेगळी कामे शिक्षकांनाही करावी लागतात. त्याला अधिकारी इच्छा असूनही थांबवू शकत नसल्याचे मत शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.