शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

विजेचे जीर्ण खांब बदलणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:12 IST

विविध भागातील विजेचे खांब जीर्ण झाले असून, पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यापासून ग्रामस्थांच्या जिवाला धोका असल्याने दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते मनोज भावसार यांच्यासह येथील दुकानदार व रहिवाशांनी केली आहे.

ठळक मुद्देलासलगाव : ग्रामस्थांचा सवाल; महावितरण विभागाचे दुर्लक्ष

लासलगाव : येथील झेंडा चौक, बाजारपेठ, शनिमंदिर यासह विविध भागातील विजेचे खांब जीर्ण झाले असून, पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यापासून ग्रामस्थांच्या जिवाला धोका असल्याने दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते मनोज भावसार यांच्यासह येथील दुकानदार व रहिवाशांनी केली आहे.परिसरात जेव्हा वीजवाहिनीमध्ये बिघाड होतो तेव्हा महावितरणचे कर्मचारीसुद्धा खांबवर चढण्यास घाबरतात. हे जीर्ण खांब बदलणे किंवा वीजवाहिनी भूमिगत करण्याची मागणी नागरिकांनी केलीआहे. गणपती विसर्जन मिरवणूक व धार्मिक उत्सव मिरवणूक मार्गावरील खांब गंजले आहेत. तसेच घरांजवळून सदर खांबांवरील वीजवाहिनी जाते. जीर्ण खांबांमुळे जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.दुर्घटना होण्यापूर्वी वितरण विभागाने खांब बदलावे किंवा वीजवाहिनी भूमिगत करावी, अशी मागणी राहिवाशांनी केली आहे.काही ठिकाणी गंजलेले विद्युतखांब तशाच स्थितीत उभे असताना वाहिन्यांवर झेपावलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याच्या कामाकडेही महावितरण दुर्लक्ष करत आहे. या जीर्ण खांबांवर लगतच्या झाडांच्या फांद्यांनी अतिक्रमण केले आहे. बाजारपेठेतील गजबजलेल्या ठिकाणची ही स्थिती आहे. जीर्ण विजेचे खांब बदलणार कधी, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Governmentसरकार