शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

पूरग्रस्तांना मदत केव्हा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 01:34 IST

नासर्डी नदीकाठी शिवाजीवाडी असून, सुमारे दीडशे झोपड्या व घरे आहेत. बहुतेक सर्वजण मोल मजुरी करून हातावर पोट भरणाऱ्यांची लोकवस्ती म्हणून शिवाजी वाडी ओळखले जाते. दरवर्षी नासर्डी नदीला पूर आला म्हणजे असलेल्या घरात पुराचे पाणी शिरते.

इंदिरानगर : नासर्डी नदीकाठी शिवाजीवाडी असून, सुमारे दीडशे झोपड्या व घरे आहेत. बहुतेक सर्वजण मोल मजुरी करून हातावर पोट भरणाऱ्यांची लोकवस्ती म्हणून शिवाजी वाडी ओळखले जाते. दरवर्षी नासर्डी नदीला पूर आला म्हणजे असलेल्या घरात पुराचे पाणी शिरते. पुराचे घरात पाणी शिरणे हे जणू काही गणित झाले आहे. यंदा तर कहर झाला महापूर आला आणि नदीकाठच्या अनेक घरांत पाणी दोन-तीन दिवस साचून राहिले. त्यामुळे काही घरांची पडझड होऊन संसारोपयोगी वस्तू वाहून गेले. त्याचप्रमाणे झोपड्यादेखील महापुरात वाहून गेल्या.नासर्डी नदीकाठी शिवाजीवाडी परिसरात पडझड झाल्यानंतर नागरिकांनीच घराची तात्पुरती डागडुजी करून घेतली आहे. परंतु अद्याप मदत मिळालेली नाही. शिवाजीवाडी पूरग्रस्तांना मदत केव्हा मिळणार नदीकाठी संरक्षण भिंत बांधणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे नासर्डी नदीस पूर येऊन नदीकाठच्या सुमारे ८० घरात पावसाचे पाणी शिरले त्यामुळे गॅस सिलिंडर, कपडेसह संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. महापालिकेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात सुमारे शंभर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. काहीजण आपल्या नातेवाइकांच्या घरी रात्र काढली घराची पडझड झाली. काही नागरिकांनी घरांची डागडुजी करून घेतली पंचनामे झाले असून, मदत या मिळणार तोपर्यंत आम्ही कसा उदरनिर्वाह करायचा? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. शिवाजीवाडी पूरग्रस्तांना प्रतिकूल परिस्थितीत रोजीरोटीसाठी व रोजगारासाठी कामावर जावे लागत आहे. पूरग्रस्तांना संसाराची शून्यातून पुन्हा सुरु वात करावी लागत आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस अडचणीला सामोरे जावे लागत आहे.पंधरा वर्षांपासून शिवाजी वाडीत राहतो नदीला आलेल्या पुरात कपडे संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. घरात दोन दिवस असलेल्या पाण्यामुळे पूर्ण ओलावा आला आहे.- पुष्पा धुळेघरात पुराचे पाणी शिरले घरातील सर्व सामान टाकून कुटुंबासह स्थलांतरित झालो. पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुन्हा घरात आलो, परंतु सगळं संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्याने होत्याचे नव्हते झाले.- राजू पालवेसकाळी ११.३० वाजेच्या सुमारास नासर्डी नदीचे पाणी घरात शिरल्याने कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी आहे त्याच परिस्थितीत घर सोडल्याने होत्याचे नव्हते झाले. संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. पुन्हा सावरण्यासाठी मदत करावी.- संगीता पोटिंदेपंचनामे झाले परंतु मदत काय मिळणार आणि आम्ही संसाराला सुरु वात कशी करणार? असा प्रश्न आमच्यापुढे आहे. शासनाने तातडीने मदत द्यावी अशी अपेक्षा आहे.- मंजुळा पालवेपुराचे पाणी शिरल्याने घरातील सर्व वस्तू वाहून गेल्या. त्यामुळे आता एक एक वस्तू जमा करावी लागत आहे. शासनाची मदत केव्हा मिळेल आणि आमची संसाराची घडी केव्हा बसेल.- सोनी गुंबाडे

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय