शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

पूरग्रस्तांना मदत केव्हा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 01:34 IST

नासर्डी नदीकाठी शिवाजीवाडी असून, सुमारे दीडशे झोपड्या व घरे आहेत. बहुतेक सर्वजण मोल मजुरी करून हातावर पोट भरणाऱ्यांची लोकवस्ती म्हणून शिवाजी वाडी ओळखले जाते. दरवर्षी नासर्डी नदीला पूर आला म्हणजे असलेल्या घरात पुराचे पाणी शिरते.

इंदिरानगर : नासर्डी नदीकाठी शिवाजीवाडी असून, सुमारे दीडशे झोपड्या व घरे आहेत. बहुतेक सर्वजण मोल मजुरी करून हातावर पोट भरणाऱ्यांची लोकवस्ती म्हणून शिवाजी वाडी ओळखले जाते. दरवर्षी नासर्डी नदीला पूर आला म्हणजे असलेल्या घरात पुराचे पाणी शिरते. पुराचे घरात पाणी शिरणे हे जणू काही गणित झाले आहे. यंदा तर कहर झाला महापूर आला आणि नदीकाठच्या अनेक घरांत पाणी दोन-तीन दिवस साचून राहिले. त्यामुळे काही घरांची पडझड होऊन संसारोपयोगी वस्तू वाहून गेले. त्याचप्रमाणे झोपड्यादेखील महापुरात वाहून गेल्या.नासर्डी नदीकाठी शिवाजीवाडी परिसरात पडझड झाल्यानंतर नागरिकांनीच घराची तात्पुरती डागडुजी करून घेतली आहे. परंतु अद्याप मदत मिळालेली नाही. शिवाजीवाडी पूरग्रस्तांना मदत केव्हा मिळणार नदीकाठी संरक्षण भिंत बांधणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे नासर्डी नदीस पूर येऊन नदीकाठच्या सुमारे ८० घरात पावसाचे पाणी शिरले त्यामुळे गॅस सिलिंडर, कपडेसह संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. महापालिकेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात सुमारे शंभर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. काहीजण आपल्या नातेवाइकांच्या घरी रात्र काढली घराची पडझड झाली. काही नागरिकांनी घरांची डागडुजी करून घेतली पंचनामे झाले असून, मदत या मिळणार तोपर्यंत आम्ही कसा उदरनिर्वाह करायचा? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. शिवाजीवाडी पूरग्रस्तांना प्रतिकूल परिस्थितीत रोजीरोटीसाठी व रोजगारासाठी कामावर जावे लागत आहे. पूरग्रस्तांना संसाराची शून्यातून पुन्हा सुरु वात करावी लागत आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस अडचणीला सामोरे जावे लागत आहे.पंधरा वर्षांपासून शिवाजी वाडीत राहतो नदीला आलेल्या पुरात कपडे संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. घरात दोन दिवस असलेल्या पाण्यामुळे पूर्ण ओलावा आला आहे.- पुष्पा धुळेघरात पुराचे पाणी शिरले घरातील सर्व सामान टाकून कुटुंबासह स्थलांतरित झालो. पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुन्हा घरात आलो, परंतु सगळं संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्याने होत्याचे नव्हते झाले.- राजू पालवेसकाळी ११.३० वाजेच्या सुमारास नासर्डी नदीचे पाणी घरात शिरल्याने कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी आहे त्याच परिस्थितीत घर सोडल्याने होत्याचे नव्हते झाले. संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. पुन्हा सावरण्यासाठी मदत करावी.- संगीता पोटिंदेपंचनामे झाले परंतु मदत काय मिळणार आणि आम्ही संसाराला सुरु वात कशी करणार? असा प्रश्न आमच्यापुढे आहे. शासनाने तातडीने मदत द्यावी अशी अपेक्षा आहे.- मंजुळा पालवेपुराचे पाणी शिरल्याने घरातील सर्व वस्तू वाहून गेल्या. त्यामुळे आता एक एक वस्तू जमा करावी लागत आहे. शासनाची मदत केव्हा मिळेल आणि आमची संसाराची घडी केव्हा बसेल.- सोनी गुंबाडे

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय