शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आयटीआयला सहसंचालकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:36 IST

सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सहा वर्षांपासून पूर्णवेळ प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य नसल्याने शासनाने संस्था वाऱ्यावर सोडली की काय याबाबतचे वृत्त सोमवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी यांनी आयटीआयला भेट देत सद्यस्थिती जाणून घेतली.

सातपूर : सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सहा वर्षांपासून पूर्णवेळ प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य नसल्याने शासनाने संस्था वाऱ्यावर सोडली की काय याबाबतचे वृत्त सोमवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी यांनी आयटीआयला भेट देत सद्यस्थिती जाणून घेतली. संस्थेला पूर्णवेळ प्राचार्य मिळावेत यासाठी मुख्यालयालाकडे लेखी अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.  सातपूर येथे जिल्हास्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) असून संस्थेत विविध प्रकारचे २७ व्यवसाय अभ्यासक्रमासाठी अडीच हजार प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. ५० च्या आसपास निदेशक असून शिक्षकेतर कर्मचारीही आहेत. या संस्थेसाठी एक प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य यांची शासन नियमाप्रमाणे नियुक्ती आहे. जवळपास २०१२ पासून या संस्थेला पूर्णवेळ प्राचार्य उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. तर दोन उपप्राचार्यदेखील पूर्णवेळ दिलेले नाहीत. त्यामुळे संस्थेत वरिष्ठ अधिकारीच नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. संस्थेत एक प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य पदांची नेमणूक असली तरी सद्यस्थितीत कळवण आयटीआयचे प्राचार्य सुभाष कदम यांचेकडे सातपूर आयटीआयचा प्रभारी प्राचार्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या शासकीय संस्थेला पूर्णवेळ प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य मिळू नयेत याबाबत सोमवारी ‘लोकमत’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची तातडीने दखल घेऊन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी यांनी आयटीआयला भेट देऊन दप्तर तपासणी केली. शिक्षकांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या आणि वर्गावर तसेच वर्कशॉपला भेट देऊन विद्यार्थ्यांच्याही अडचणी ऐकून घेतल्या.मुख्यालयाला  अहवाल पाठवूसंस्थेत आर. एफ. पाटील यांची प्राचार्य म्हणून पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु संचालकांनी पाटील यांना प्रतिनियुक्तीवर मुख्यालयात (मुंबईला) बोलावून घेतलेले आहे. प्राचार्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार मला नाहीत. परंतु पर्यायी व्यवस्था म्हणून कळवण आयटीआयचे प्राचार्य सुभाष कदम यांची प्रभारी म्हणून मी नेमणूक केली आहे. संस्थेला भेट देऊन स्टाफची माहिती घेतली आहे. लवकरच पूर्णवेळ प्राचार्यांची नियुक्ती करावी असा लेखी अहवाल आणि लोकमतमधील बातमी मुख्यालयाला पाठविणार आहे.  - एस. आर. सूर्यवंशी, सहसंचालक

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक