शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आयटीआयला सहसंचालकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:36 IST

सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सहा वर्षांपासून पूर्णवेळ प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य नसल्याने शासनाने संस्था वाऱ्यावर सोडली की काय याबाबतचे वृत्त सोमवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी यांनी आयटीआयला भेट देत सद्यस्थिती जाणून घेतली.

सातपूर : सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सहा वर्षांपासून पूर्णवेळ प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य नसल्याने शासनाने संस्था वाऱ्यावर सोडली की काय याबाबतचे वृत्त सोमवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी यांनी आयटीआयला भेट देत सद्यस्थिती जाणून घेतली. संस्थेला पूर्णवेळ प्राचार्य मिळावेत यासाठी मुख्यालयालाकडे लेखी अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.  सातपूर येथे जिल्हास्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) असून संस्थेत विविध प्रकारचे २७ व्यवसाय अभ्यासक्रमासाठी अडीच हजार प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. ५० च्या आसपास निदेशक असून शिक्षकेतर कर्मचारीही आहेत. या संस्थेसाठी एक प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य यांची शासन नियमाप्रमाणे नियुक्ती आहे. जवळपास २०१२ पासून या संस्थेला पूर्णवेळ प्राचार्य उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. तर दोन उपप्राचार्यदेखील पूर्णवेळ दिलेले नाहीत. त्यामुळे संस्थेत वरिष्ठ अधिकारीच नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. संस्थेत एक प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य पदांची नेमणूक असली तरी सद्यस्थितीत कळवण आयटीआयचे प्राचार्य सुभाष कदम यांचेकडे सातपूर आयटीआयचा प्रभारी प्राचार्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या शासकीय संस्थेला पूर्णवेळ प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य मिळू नयेत याबाबत सोमवारी ‘लोकमत’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची तातडीने दखल घेऊन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी यांनी आयटीआयला भेट देऊन दप्तर तपासणी केली. शिक्षकांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या आणि वर्गावर तसेच वर्कशॉपला भेट देऊन विद्यार्थ्यांच्याही अडचणी ऐकून घेतल्या.मुख्यालयाला  अहवाल पाठवूसंस्थेत आर. एफ. पाटील यांची प्राचार्य म्हणून पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु संचालकांनी पाटील यांना प्रतिनियुक्तीवर मुख्यालयात (मुंबईला) बोलावून घेतलेले आहे. प्राचार्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार मला नाहीत. परंतु पर्यायी व्यवस्था म्हणून कळवण आयटीआयचे प्राचार्य सुभाष कदम यांची प्रभारी म्हणून मी नेमणूक केली आहे. संस्थेला भेट देऊन स्टाफची माहिती घेतली आहे. लवकरच पूर्णवेळ प्राचार्यांची नियुक्ती करावी असा लेखी अहवाल आणि लोकमतमधील बातमी मुख्यालयाला पाठविणार आहे.  - एस. आर. सूर्यवंशी, सहसंचालक

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक