शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

मृत महिला जिवंत होते तेव्हा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 16:45 IST

चांदोरी/सायखेडा : येथील फुप्फुसाच्या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या एक महिलेला डॉक्टरांनी शनिवारी रात्री मृत घोषित केले. सकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना तिचे पार्थिव सकाळी घरी नेताना त्यांना लावलेले व्हेंटिलेटर काढताच ओठांची हालचाल जाणवली आणि महिला जिवंत असल्याचे लक्षात येताच ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय रविवारी आला.

चांदोरी/सायखेडा : येथील फुप्फुसाच्या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या एक महिलेला डॉक्टरांनी शनिवारी रात्री मृत घोषित केले. सकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना तिचे पार्थिव सकाळी घरी नेताना त्यांना लावलेले व्हेंटिलेटर काढताच ओठांची हालचाल जाणवली आणि महिला जिवंत असल्याचे लक्षात येताच ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय रविवारी आला. चांदोरी येथील जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांच्या काकू संध्या सुरेश वनारसे या फुफ्फुसाच्या व्याधीने आजारी असल्याने पंधरा दिवसांपासून नाशिकला खासगी रूग्णालयात उपचार घेत होत्या. परंतु शनिवारी (दि.१९) त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहुन डॉक्टरांनी रात्री ११.५० वाजता त्यांची प्राणज्योत माळवल्याचे जाहीर केले व वनारसे कुटुंबात शोककळा पसरली. रात्रीची वेळ असल्याने सकाळी अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले. सगळीकडे नातेवाईकांना फोन व मेसेजद्वारे अंत्यसंस्काराची वेळ कळविण्यात आली. दरम्यानच्या काळात संध्या वनारसे यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रात्रभर चांदोरी येथील वनारसे वस्तीवरील घरी जवळचे नातेवाईक जागेच होते. हॉस्पिटलमध्येही काही जण थांबले होते. सकाळी पार्थिव नेण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी चांदोरी येथे अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती.आता फक्त संध्या वनारसे यांच्या मृतदेहाची प्रतिक्षा होती.इकडे रु ग्णालयात रात्रभर जागे असणाºया नातेवाईकांनी पार्थिव ताब्यात घेण्यासाठी डॉक्टरांची परवानगी मागितली. परिचिरकेने संध्या वनारसे यांच्या नाकाला लावलेले व्हेंटिलेटर काढताच ओठांची हालचाल जाणवली व डॉक्टरांनाही ही रु ग्णाची बरीच हालचाल जाणवली व तातडीने उपचार सुरूवात करत आॅक्सिजनचा पुरवठा सुरू केला.इकडे चांदोरीत दोन ते तीन हजारांचा जमाव अंत्यसंस्कारासाठी जमा झालेला होता.त्याच दरम्यान संध्या वनारसे यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचा निरोप आला आणि शोकाकुल वातावरण क्षणात बदलून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.---------------------------गेल्या पंधरा दिवसांपासून आमच्या काकू नाशिकला खासगी रु ग्णालयात उपचार घेत होत्या.काल डॉक्टरांनी व्हेंटिलेटर काढत त्यांना घरी घेऊन जा असे सांगितले . त्यांच्या निधनाची बातमी आम्ही सर्वत्र दिली. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना काकू जिवंत असल्याचे समजले. हा चमत्कारच म्हणावा लागेल, काकूंना दिर्घोयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.--सिद्धार्थ वनारसे ,जिल्हा परिषद सदस्य,चांदोरी.

टॅग्स :Nashikनाशिक