शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

रिक्षाचालकाने जवळचे भाडे नाकारले तर काय कराल?; शेअर रिक्षाही ठरतेय डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 16:21 IST

नाशिक : कोणत्याही शहराच्या प्रगतीत तेथील वाहतूक व्यवस्थेचे मोठे योगदान असते. मग ही व्यवस्था शहर बस, रिक्षा किंवा खासगी ...

नाशिक : कोणत्याही शहराच्या प्रगतीत तेथील वाहतूक व्यवस्थेचे मोठे योगदान असते. मग ही व्यवस्था शहर बस, रिक्षा किंवा खासगी स्वरूपाची असू शकते. मात्र, शहरातील प्रत्येक गल्लीबोळात शहर बसेस पोहोचणे शक्य नसल्याने सहाजिक रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. मात्र, बऱ्याच वेळा भाडे दरावरून प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये वादविवाद हाेतात. अनेक रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे न आकारता मनमानी पद्धतीने भाडे ठरवतात. मीटर केवळ नावालाच लावलेले असते. जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांच्या खिशाचा अंदाज घेऊन भाडेदर ठरविणे, यांसह विविध अनुभव प्रवाशांना येतात. मात्र, वाढत्या इंधन दरामुळे स्वत:चे खासगी वाहन चालविणे परवडत नसल्याने नाइलाजाने रिक्षाचाच पर्याय निवडावा लागतो.

तोंड पाहून भाडे

प्रवासी बाहेरगावाहून आलाय की शहरातील आहे, यांचा अंदाज घेऊन काही रिक्षाचालकांकडून भाडे आकारले जाते. प्रवासी बाहेरून आला असल्यास त्यांच्या अज्ञानाचा फायदा आणि खिशाचा अंदाज घेऊनदेखील भाडे ठरविले जात असल्याचा अनेकांचा अनुभव आहे.

रिक्षामीटर शोभेलाच

शहरातील अनेक रिक्षांमध्ये मीटर लावलेले दिसून येतात. मात्र, प्रत्यक्षात त्याचा वापर केला जात नसल्याने हे मीटर केवळ शोभेसाठीच आहे की काय? असा प्रश्न पडतो. बहुतांश रिक्षांतील मीटर बंद पडलेले आढळते.

शेअर रिक्षा डोकेदुखी

वाढत्या महागाईमुळे अनेक प्रवाशांना स्वतंत्रपणे रिक्षा परवडत नाही. त्यामुळे बहुतांश वेळा शेअर रिक्षाला प्राधान्य देतात. मात्र, रिक्षाचालक प्रत्येक प्रवाशाकडून स्वतंत्ररीत्या भाडे आकारणी करतात.

वाढत्या महागाईचे कारण देत काही रिक्षाचालकांकडून परस्पर दरवाढ केली जाते. मात्र, शहरातील अनेक भागांतून शहर बससेवा नसल्याने आणि स्वत:चे खासगी वाहन परवडत नसल्याने नागरिकांना नाइलाजाने रिक्षाचाच पर्याय निवडावा लागतो.

- प्रशांत देसाई, नागरिक

शहराच्या प्रगतीत वाहतूक व्यवस्थेचे महत्त्वाचे स्थान असते. त्यात रिक्षाचालकांचादेखील मोठा वाटा असतो. त्यामुळे रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करून व्यवसाय करायला हवा. काही मूठभर चालकांमुळे सर्वांकडे पाहण्याची दृष्टी बदलते.

- प्रफुल्ल बिरारी, नागरिक

एखाद्या रिक्षाचालकाने भाडेदरावरून त्रास दिला, किंवा वाढीवर भाडे आकारल्यास प्रवाशाने सदर रिक्षाचा क्रमांक, वेळ, ठिकाण आदींबाबत आरटीओकडे लेखी, फोनवरून किंवा मेलद्वारे तक्रार करावी. विभागाकडून त्याची निश्चितपणे दखल घेतली जाईल.

- प्रदीप शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी)

 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा