शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

रिक्षाचालकाने जवळचे भाडे नाकारले तर काय कराल?; शेअर रिक्षाही ठरतेय डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 16:21 IST

नाशिक : कोणत्याही शहराच्या प्रगतीत तेथील वाहतूक व्यवस्थेचे मोठे योगदान असते. मग ही व्यवस्था शहर बस, रिक्षा किंवा खासगी ...

नाशिक : कोणत्याही शहराच्या प्रगतीत तेथील वाहतूक व्यवस्थेचे मोठे योगदान असते. मग ही व्यवस्था शहर बस, रिक्षा किंवा खासगी स्वरूपाची असू शकते. मात्र, शहरातील प्रत्येक गल्लीबोळात शहर बसेस पोहोचणे शक्य नसल्याने सहाजिक रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. मात्र, बऱ्याच वेळा भाडे दरावरून प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये वादविवाद हाेतात. अनेक रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे न आकारता मनमानी पद्धतीने भाडे ठरवतात. मीटर केवळ नावालाच लावलेले असते. जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांच्या खिशाचा अंदाज घेऊन भाडेदर ठरविणे, यांसह विविध अनुभव प्रवाशांना येतात. मात्र, वाढत्या इंधन दरामुळे स्वत:चे खासगी वाहन चालविणे परवडत नसल्याने नाइलाजाने रिक्षाचाच पर्याय निवडावा लागतो.

तोंड पाहून भाडे

प्रवासी बाहेरगावाहून आलाय की शहरातील आहे, यांचा अंदाज घेऊन काही रिक्षाचालकांकडून भाडे आकारले जाते. प्रवासी बाहेरून आला असल्यास त्यांच्या अज्ञानाचा फायदा आणि खिशाचा अंदाज घेऊनदेखील भाडे ठरविले जात असल्याचा अनेकांचा अनुभव आहे.

रिक्षामीटर शोभेलाच

शहरातील अनेक रिक्षांमध्ये मीटर लावलेले दिसून येतात. मात्र, प्रत्यक्षात त्याचा वापर केला जात नसल्याने हे मीटर केवळ शोभेसाठीच आहे की काय? असा प्रश्न पडतो. बहुतांश रिक्षांतील मीटर बंद पडलेले आढळते.

शेअर रिक्षा डोकेदुखी

वाढत्या महागाईमुळे अनेक प्रवाशांना स्वतंत्रपणे रिक्षा परवडत नाही. त्यामुळे बहुतांश वेळा शेअर रिक्षाला प्राधान्य देतात. मात्र, रिक्षाचालक प्रत्येक प्रवाशाकडून स्वतंत्ररीत्या भाडे आकारणी करतात.

वाढत्या महागाईचे कारण देत काही रिक्षाचालकांकडून परस्पर दरवाढ केली जाते. मात्र, शहरातील अनेक भागांतून शहर बससेवा नसल्याने आणि स्वत:चे खासगी वाहन परवडत नसल्याने नागरिकांना नाइलाजाने रिक्षाचाच पर्याय निवडावा लागतो.

- प्रशांत देसाई, नागरिक

शहराच्या प्रगतीत वाहतूक व्यवस्थेचे महत्त्वाचे स्थान असते. त्यात रिक्षाचालकांचादेखील मोठा वाटा असतो. त्यामुळे रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करून व्यवसाय करायला हवा. काही मूठभर चालकांमुळे सर्वांकडे पाहण्याची दृष्टी बदलते.

- प्रफुल्ल बिरारी, नागरिक

एखाद्या रिक्षाचालकाने भाडेदरावरून त्रास दिला, किंवा वाढीवर भाडे आकारल्यास प्रवाशाने सदर रिक्षाचा क्रमांक, वेळ, ठिकाण आदींबाबत आरटीओकडे लेखी, फोनवरून किंवा मेलद्वारे तक्रार करावी. विभागाकडून त्याची निश्चितपणे दखल घेतली जाईल.

- प्रदीप शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी)

 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा