शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

'फिल्ड में जायेंगे तो समझेंगे'; पुराच्या पाण्यात उतरुन मदत करणाऱ्या आसामच्या उपायुक्तांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 06:51 IST

भारतीय प्रशासकीय सेवेतील कीर्ती जल्ली आसामच्या कचर जिल्ह्याच्या उपायुक्त.

- मेघना ढोके

नाशिक : ‘पुरात अडकलेल्या लोकांना मदतीचा हात देणे ही एकमेव गोष्ट डोळ्यांसमोर ठेवून मी कामाला लागले. पाणी कुठे जास्त भरले आहे याचा अंदाज घेतला. पुरामुळे जमीनच वाहून गेल्याने तेथील माणसांना बाहेर काढणे मोठे आव्हान होते. फिल्ड में जायेंगे तो समझेंगे... एवढंच मनाशी पक्के करून मी कामाला लागले..’ कीर्ती जल्ली सांगत असतात. 

भारतीय प्रशासकीय सेवेतील कीर्ती जल्ली आसामच्या कचर जिल्ह्याच्या उपायुक्त. आसामचे जनजीवन अक्षरश: उद्ध्वस्त करणाऱ्या पुराच्या पाण्यात उतरून, प्रसंगी चिखलात अनवाणी चालत, तर कधी बोटीतून जात आपद्ग्रस्तांना मदतीचा हात पोहोचविणाऱ्या कीर्ती जल्ली यांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली. 

त्यांच्याशी ‘लोकमत’ने दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तेथील परिस्थिती जाणून घेतली. कीर्ती पुढे म्हणाल्या, ‘पुरात अडकलेल्या माणसांचे जीव वाचवण्यापेक्षा दुसरे काय महत्त्वाचे आहे? पुरामुळे आसामात हाहाकार उडाला आहे. सर्वाधिक फटका कचर जिल्ह्याला बसला आहे.’राजधानी गुवाहाटीशीच नाही तर शेजारी मेघालयाशीही संपर्क तुटलेला असताना कीर्ती यांनी अत्यंत हिमतीने आपत्ती व्यवस्थापन केले. 

मदतीमुळे ग्रामस्थ भारावले-

कचर जिल्ह्यात बराक नदी उधाणलेली असताना कीर्ती यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने ३५० हून जास्त मदत छावण्या आणि ६०० हून अधिक मदत वाटप केंद्रे सुरू केली. चैत्रा या गावी त्या गेलेल्या असतानाच कीर्ती यांची छायाचित्रे व्हायरल झाली. ज्या गावांनी कधी एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचा चेहरा पाहिला नव्हता, त्या गावात कीर्ती प्रत्यक्ष पोहोचल्याने ग्रामस्थ भारावून गेले. 

मराठी सासर... 

कीर्ती यांचा विवाह कोरोनाकाळात झाला. सार्वजनिक सुटीच्या दिवशी छोटेखानी समारंभात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांचे सासरचे आडनाव जगताप आहे. मूळचे सासवडचे असलेले जगताप कुटुंबीय सध्या पुण्यात स्थायिक आहेत. कीर्ती यांच्या विवाहसोहळ्याला त्यांचे आई-वडील हैदराबादहून येऊ शकले नाहीत. कुटुंबाची साथ आहे, माझी माणसे माझ्या पाठीशी आहेत म्हणून जमते. माणसांचा जीव वाचवण्यासाठी यंत्रणा उभारणे हे माझे काम होते, तेच मी तेव्हाही केले आणि आताही करत आहे, असे कीर्ती जल्ली नमूद करतात.

टॅग्स :floodपूरNashikनाशिक