शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

महसुलातील उंदरांचे काय?

By किरण अग्रवाल | Published: March 25, 2018 1:45 AM

मंत्रालयातील व पंचवटी एक्स्प्रेसमधील उंदीर एकीकडे चर्चेत येऊन गेले असताना व्यवस्था अगर यंत्रणा कुरतडणाऱ्या उंदरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरावे, कारण वास्तवातील उंदीर करणार नाहीत तितके वा त्यापेक्षाही अधिकचे नुकसान या मानवी उंदरांकडून होत आहे. महसूल विभागांतर्गतच्या गौणखनिज चोरी प्रकरणातही याच उंदरांची बाधा झाल्याचे स्पष्ट होणारे व स्वच्छपणे दिसून येणारे आहे.

मंत्रालयातील व पंचवटी एक्स्प्रेसमधील उंदीर एकीकडे चर्चेत येऊन गेले असताना व्यवस्था अगर यंत्रणा कुरतडणाऱ्या उंदरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरावे, कारण वास्तवातील उंदीर करणार नाहीत तितके वा त्यापेक्षाही अधिकचे नुकसान या मानवी उंदरांकडून होत आहे. महसूल विभागांतर्गतच्या गौणखनिज चोरी प्रकरणातही याच उंदरांची बाधा झाल्याचे स्पष्ट होणारे व स्वच्छपणे दिसून येणारे आहे.  उंदीर दगडाचा असला तर श्री गणेशाचे वाहन म्हणून लोक त्याला फुले वाहतात, पण तो प्रत्यक्षातला असला की त्याचा जीव घ्यायला सरसावतात; असे का? याची विचारणा करणारा संदेश सोशल माध्यमांतून प्रसारित झालेला अनेकांनी वाचला असेलच. त्याचे उत्तर दुसºया कुणाकडून अपेक्षित करण्याची गरज नाही. कारण वास्तवातील असो की यंत्रणेतले; उंदरांचे कुरतडणे प्रत्येकानेच अनुभवलेले असते. यातील दुसया प्रवर्गातील कुरतड तर पदोपदी दिसून येणारी आहे. नाशिक जिल्ह्यात पकडली गेलेली वाळूची वाहने तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याचा अलीकडचा प्रकारही याच प्रवर्गातील ठरावा. तसेही, नदीतील वाळूचा उपसा करणे व डोंगर फोडून गिट्टी काढणे ही बाब पोखरण्याशी वा कुरतडण्याशीच नाते सांगणारी आहे. यात फरक एवढाच की, ही पोखरण चतुष्पादांऐवजी द्विपादांकडून घडून येते आहे आणि वैध मार्गाऐवजी अवैध प्रकारांना त्यात ऊत आलेला दिसत आहे. गौणखनिजातील वाळू तस्करीत मालेगावची ख्याती तशीही मोठी आहे. तेथे नेहमीच अशी विनापरवाना वाळूने भरलेली वाहने पकडली जातात. यंदा मात्र अपर जिल्हाधिकाºयांनी स्थानिक मालेगावच्या तहसीलदारांऐवजी देवळा येथील तहसीलदारांची मदत घेत मालेगाव हद्दीतील अशी वाहने पकडल्याने यातील कुरतड किती खोलवर पोहोचली असावी, याचा संशय बळकट व्हावा. विशेष म्हणजे, अशी पकडलेली तब्बल दहा वाहने मालेगाव तहसील आवारातून पळविली गेली. त्यामुळे जमा केलेल्या वाहनाच्या चाव्या संबंधितांच्या हाती लागल्या कशा, हादेखील प्रश्नच ठरावा. यातील काही वाहने पुन्हा जप्त केली गेल्याने कारवाईचे सोपस्कार पार पाडण्याऐवजी आता या प्रश्नाचे उत्तर शोधले जावयास हवे. तसे केल्यासच यंत्रणेतील ‘उंदीर’ हाती लागू शकतील. मागे नाशिकमधूनही अशा जप्त केलेल्या वाळूच्या गाड्या पळविल्या गेल्या होत्या. राजरोसची ही पळवा-पळवी कुणाच्या आशीर्वादाने शक्य होते, हे तपासायला हवे. नांदगाव तालुक्यातही अशी वाहने पकडली गेली, पण संबंधितांच्या परस्परातील स्पर्धा व वैमनस्यातून माहिती मिळाल्याने ते शक्य झाले. याचा अर्थ द्विपाद उंदीर प्रत्येकच ठिकाणी आहेत. तेव्हा अशा उंदरांचे मांजरीची साक्ष न घेता निर्मूलन करणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय