शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

महसुलातील उंदरांचे काय?

By किरण अग्रवाल | Updated: March 25, 2018 01:45 IST

मंत्रालयातील व पंचवटी एक्स्प्रेसमधील उंदीर एकीकडे चर्चेत येऊन गेले असताना व्यवस्था अगर यंत्रणा कुरतडणाऱ्या उंदरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरावे, कारण वास्तवातील उंदीर करणार नाहीत तितके वा त्यापेक्षाही अधिकचे नुकसान या मानवी उंदरांकडून होत आहे. महसूल विभागांतर्गतच्या गौणखनिज चोरी प्रकरणातही याच उंदरांची बाधा झाल्याचे स्पष्ट होणारे व स्वच्छपणे दिसून येणारे आहे.

मंत्रालयातील व पंचवटी एक्स्प्रेसमधील उंदीर एकीकडे चर्चेत येऊन गेले असताना व्यवस्था अगर यंत्रणा कुरतडणाऱ्या उंदरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरावे, कारण वास्तवातील उंदीर करणार नाहीत तितके वा त्यापेक्षाही अधिकचे नुकसान या मानवी उंदरांकडून होत आहे. महसूल विभागांतर्गतच्या गौणखनिज चोरी प्रकरणातही याच उंदरांची बाधा झाल्याचे स्पष्ट होणारे व स्वच्छपणे दिसून येणारे आहे.  उंदीर दगडाचा असला तर श्री गणेशाचे वाहन म्हणून लोक त्याला फुले वाहतात, पण तो प्रत्यक्षातला असला की त्याचा जीव घ्यायला सरसावतात; असे का? याची विचारणा करणारा संदेश सोशल माध्यमांतून प्रसारित झालेला अनेकांनी वाचला असेलच. त्याचे उत्तर दुसºया कुणाकडून अपेक्षित करण्याची गरज नाही. कारण वास्तवातील असो की यंत्रणेतले; उंदरांचे कुरतडणे प्रत्येकानेच अनुभवलेले असते. यातील दुसया प्रवर्गातील कुरतड तर पदोपदी दिसून येणारी आहे. नाशिक जिल्ह्यात पकडली गेलेली वाळूची वाहने तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याचा अलीकडचा प्रकारही याच प्रवर्गातील ठरावा. तसेही, नदीतील वाळूचा उपसा करणे व डोंगर फोडून गिट्टी काढणे ही बाब पोखरण्याशी वा कुरतडण्याशीच नाते सांगणारी आहे. यात फरक एवढाच की, ही पोखरण चतुष्पादांऐवजी द्विपादांकडून घडून येते आहे आणि वैध मार्गाऐवजी अवैध प्रकारांना त्यात ऊत आलेला दिसत आहे. गौणखनिजातील वाळू तस्करीत मालेगावची ख्याती तशीही मोठी आहे. तेथे नेहमीच अशी विनापरवाना वाळूने भरलेली वाहने पकडली जातात. यंदा मात्र अपर जिल्हाधिकाºयांनी स्थानिक मालेगावच्या तहसीलदारांऐवजी देवळा येथील तहसीलदारांची मदत घेत मालेगाव हद्दीतील अशी वाहने पकडल्याने यातील कुरतड किती खोलवर पोहोचली असावी, याचा संशय बळकट व्हावा. विशेष म्हणजे, अशी पकडलेली तब्बल दहा वाहने मालेगाव तहसील आवारातून पळविली गेली. त्यामुळे जमा केलेल्या वाहनाच्या चाव्या संबंधितांच्या हाती लागल्या कशा, हादेखील प्रश्नच ठरावा. यातील काही वाहने पुन्हा जप्त केली गेल्याने कारवाईचे सोपस्कार पार पाडण्याऐवजी आता या प्रश्नाचे उत्तर शोधले जावयास हवे. तसे केल्यासच यंत्रणेतील ‘उंदीर’ हाती लागू शकतील. मागे नाशिकमधूनही अशा जप्त केलेल्या वाळूच्या गाड्या पळविल्या गेल्या होत्या. राजरोसची ही पळवा-पळवी कुणाच्या आशीर्वादाने शक्य होते, हे तपासायला हवे. नांदगाव तालुक्यातही अशी वाहने पकडली गेली, पण संबंधितांच्या परस्परातील स्पर्धा व वैमनस्यातून माहिती मिळाल्याने ते शक्य झाले. याचा अर्थ द्विपाद उंदीर प्रत्येकच ठिकाणी आहेत. तेव्हा अशा उंदरांचे मांजरीची साक्ष न घेता निर्मूलन करणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय