शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

महसुलातील उंदरांचे काय?

By किरण अग्रवाल | Updated: March 25, 2018 01:45 IST

मंत्रालयातील व पंचवटी एक्स्प्रेसमधील उंदीर एकीकडे चर्चेत येऊन गेले असताना व्यवस्था अगर यंत्रणा कुरतडणाऱ्या उंदरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरावे, कारण वास्तवातील उंदीर करणार नाहीत तितके वा त्यापेक्षाही अधिकचे नुकसान या मानवी उंदरांकडून होत आहे. महसूल विभागांतर्गतच्या गौणखनिज चोरी प्रकरणातही याच उंदरांची बाधा झाल्याचे स्पष्ट होणारे व स्वच्छपणे दिसून येणारे आहे.

मंत्रालयातील व पंचवटी एक्स्प्रेसमधील उंदीर एकीकडे चर्चेत येऊन गेले असताना व्यवस्था अगर यंत्रणा कुरतडणाऱ्या उंदरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरावे, कारण वास्तवातील उंदीर करणार नाहीत तितके वा त्यापेक्षाही अधिकचे नुकसान या मानवी उंदरांकडून होत आहे. महसूल विभागांतर्गतच्या गौणखनिज चोरी प्रकरणातही याच उंदरांची बाधा झाल्याचे स्पष्ट होणारे व स्वच्छपणे दिसून येणारे आहे.  उंदीर दगडाचा असला तर श्री गणेशाचे वाहन म्हणून लोक त्याला फुले वाहतात, पण तो प्रत्यक्षातला असला की त्याचा जीव घ्यायला सरसावतात; असे का? याची विचारणा करणारा संदेश सोशल माध्यमांतून प्रसारित झालेला अनेकांनी वाचला असेलच. त्याचे उत्तर दुसºया कुणाकडून अपेक्षित करण्याची गरज नाही. कारण वास्तवातील असो की यंत्रणेतले; उंदरांचे कुरतडणे प्रत्येकानेच अनुभवलेले असते. यातील दुसया प्रवर्गातील कुरतड तर पदोपदी दिसून येणारी आहे. नाशिक जिल्ह्यात पकडली गेलेली वाळूची वाहने तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याचा अलीकडचा प्रकारही याच प्रवर्गातील ठरावा. तसेही, नदीतील वाळूचा उपसा करणे व डोंगर फोडून गिट्टी काढणे ही बाब पोखरण्याशी वा कुरतडण्याशीच नाते सांगणारी आहे. यात फरक एवढाच की, ही पोखरण चतुष्पादांऐवजी द्विपादांकडून घडून येते आहे आणि वैध मार्गाऐवजी अवैध प्रकारांना त्यात ऊत आलेला दिसत आहे. गौणखनिजातील वाळू तस्करीत मालेगावची ख्याती तशीही मोठी आहे. तेथे नेहमीच अशी विनापरवाना वाळूने भरलेली वाहने पकडली जातात. यंदा मात्र अपर जिल्हाधिकाºयांनी स्थानिक मालेगावच्या तहसीलदारांऐवजी देवळा येथील तहसीलदारांची मदत घेत मालेगाव हद्दीतील अशी वाहने पकडल्याने यातील कुरतड किती खोलवर पोहोचली असावी, याचा संशय बळकट व्हावा. विशेष म्हणजे, अशी पकडलेली तब्बल दहा वाहने मालेगाव तहसील आवारातून पळविली गेली. त्यामुळे जमा केलेल्या वाहनाच्या चाव्या संबंधितांच्या हाती लागल्या कशा, हादेखील प्रश्नच ठरावा. यातील काही वाहने पुन्हा जप्त केली गेल्याने कारवाईचे सोपस्कार पार पाडण्याऐवजी आता या प्रश्नाचे उत्तर शोधले जावयास हवे. तसे केल्यासच यंत्रणेतील ‘उंदीर’ हाती लागू शकतील. मागे नाशिकमधूनही अशा जप्त केलेल्या वाळूच्या गाड्या पळविल्या गेल्या होत्या. राजरोसची ही पळवा-पळवी कुणाच्या आशीर्वादाने शक्य होते, हे तपासायला हवे. नांदगाव तालुक्यातही अशी वाहने पकडली गेली, पण संबंधितांच्या परस्परातील स्पर्धा व वैमनस्यातून माहिती मिळाल्याने ते शक्य झाले. याचा अर्थ द्विपाद उंदीर प्रत्येकच ठिकाणी आहेत. तेव्हा अशा उंदरांचे मांजरीची साक्ष न घेता निर्मूलन करणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय