शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

महसुलातील उंदरांचे काय?

By किरण अग्रवाल | Updated: March 25, 2018 01:45 IST

मंत्रालयातील व पंचवटी एक्स्प्रेसमधील उंदीर एकीकडे चर्चेत येऊन गेले असताना व्यवस्था अगर यंत्रणा कुरतडणाऱ्या उंदरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरावे, कारण वास्तवातील उंदीर करणार नाहीत तितके वा त्यापेक्षाही अधिकचे नुकसान या मानवी उंदरांकडून होत आहे. महसूल विभागांतर्गतच्या गौणखनिज चोरी प्रकरणातही याच उंदरांची बाधा झाल्याचे स्पष्ट होणारे व स्वच्छपणे दिसून येणारे आहे.

मंत्रालयातील व पंचवटी एक्स्प्रेसमधील उंदीर एकीकडे चर्चेत येऊन गेले असताना व्यवस्था अगर यंत्रणा कुरतडणाऱ्या उंदरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरावे, कारण वास्तवातील उंदीर करणार नाहीत तितके वा त्यापेक्षाही अधिकचे नुकसान या मानवी उंदरांकडून होत आहे. महसूल विभागांतर्गतच्या गौणखनिज चोरी प्रकरणातही याच उंदरांची बाधा झाल्याचे स्पष्ट होणारे व स्वच्छपणे दिसून येणारे आहे.  उंदीर दगडाचा असला तर श्री गणेशाचे वाहन म्हणून लोक त्याला फुले वाहतात, पण तो प्रत्यक्षातला असला की त्याचा जीव घ्यायला सरसावतात; असे का? याची विचारणा करणारा संदेश सोशल माध्यमांतून प्रसारित झालेला अनेकांनी वाचला असेलच. त्याचे उत्तर दुसºया कुणाकडून अपेक्षित करण्याची गरज नाही. कारण वास्तवातील असो की यंत्रणेतले; उंदरांचे कुरतडणे प्रत्येकानेच अनुभवलेले असते. यातील दुसया प्रवर्गातील कुरतड तर पदोपदी दिसून येणारी आहे. नाशिक जिल्ह्यात पकडली गेलेली वाळूची वाहने तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याचा अलीकडचा प्रकारही याच प्रवर्गातील ठरावा. तसेही, नदीतील वाळूचा उपसा करणे व डोंगर फोडून गिट्टी काढणे ही बाब पोखरण्याशी वा कुरतडण्याशीच नाते सांगणारी आहे. यात फरक एवढाच की, ही पोखरण चतुष्पादांऐवजी द्विपादांकडून घडून येते आहे आणि वैध मार्गाऐवजी अवैध प्रकारांना त्यात ऊत आलेला दिसत आहे. गौणखनिजातील वाळू तस्करीत मालेगावची ख्याती तशीही मोठी आहे. तेथे नेहमीच अशी विनापरवाना वाळूने भरलेली वाहने पकडली जातात. यंदा मात्र अपर जिल्हाधिकाºयांनी स्थानिक मालेगावच्या तहसीलदारांऐवजी देवळा येथील तहसीलदारांची मदत घेत मालेगाव हद्दीतील अशी वाहने पकडल्याने यातील कुरतड किती खोलवर पोहोचली असावी, याचा संशय बळकट व्हावा. विशेष म्हणजे, अशी पकडलेली तब्बल दहा वाहने मालेगाव तहसील आवारातून पळविली गेली. त्यामुळे जमा केलेल्या वाहनाच्या चाव्या संबंधितांच्या हाती लागल्या कशा, हादेखील प्रश्नच ठरावा. यातील काही वाहने पुन्हा जप्त केली गेल्याने कारवाईचे सोपस्कार पार पाडण्याऐवजी आता या प्रश्नाचे उत्तर शोधले जावयास हवे. तसे केल्यासच यंत्रणेतील ‘उंदीर’ हाती लागू शकतील. मागे नाशिकमधूनही अशा जप्त केलेल्या वाळूच्या गाड्या पळविल्या गेल्या होत्या. राजरोसची ही पळवा-पळवी कुणाच्या आशीर्वादाने शक्य होते, हे तपासायला हवे. नांदगाव तालुक्यातही अशी वाहने पकडली गेली, पण संबंधितांच्या परस्परातील स्पर्धा व वैमनस्यातून माहिती मिळाल्याने ते शक्य झाले. याचा अर्थ द्विपाद उंदीर प्रत्येकच ठिकाणी आहेत. तेव्हा अशा उंदरांचे मांजरीची साक्ष न घेता निर्मूलन करणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय