शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

शाळेच्या पहिल्या दिवशी दिंडी, मिरवणूकीद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 17:23 IST

कळवण : उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यांनंतर सोमवारी शाळा सुरू झाली. विद्यार्थ्यांचा पहिला दिवस छान जावा, सुरूवात गोड व्हावी आणि मुलांना शाळेत यायची गोडी लागावी यासाठी कळवण शहर व तालुक्यातील २४६ प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मुलांना फुले आणि चॉकलेट, नवीन शालेय पुस्तके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. वाद्याच्या तालावर प्रभातफेरी, दिंडी तसेच ट्रॅक्टर व बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आल्याने कळवण शहर व तालुक्यात शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा झाला.

नवीन वह्या व पुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी देखील शाळेच्या पहिल्या दिवसासाठी सज्ज झाले होते. कळवण शहर व तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २०३ व खासगी अनुदानित ४३ अशा एकूण २४६ शाळांमधील पहिली ते आठवीमधील 26983 विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तके वाटप करण्यात आली. कळवण शहरासह तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक मराठी माध्यमाच्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. त्यासाठी रविवारपासून तालुक्यातील शाळांमध्ये नियोजन करण्यात येऊन शिक्षक व शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती.आर के एम माध्यमिक शाळेत मुले येताच त्यांचे अनोख्या उत्साहात स्वागत करण्यात आले तसेच पहिल्याच दिवशी कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड शशिकांत पवार, सरचिटणीस बेबीलाल संचेती, मुख्याध्यापक एल. डी. पगार, पर्यवेक्षक एन. डी. देवरे, जे. आर. जाधव यांच्या हस्ते शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांंना मिष्टान्न भोजन देण्यात आले . पहिल्याच दिवशी शालेय गणवेशात न येता पारंपरिक वेशभूषा करु न आलेल्या ६ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना कळवण शिक्षण संस्था व आर के एम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नावाचा बॅज देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.सोमवारपासून शाळा उघडणार म्हणून शनिवार व रविवारी शहरातील स्टेशनरी दुकानावर शालेय साहित्य खरेदीसाठी पालक व विद्यार्थी यांनी गर्दी केल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना पसंत पडणाऱ्या स्कूल बॅग, वॉटर बॅग, शूज, वह्या खरेदी करण्यास पालकांनी प्राधान्य दिल्याचे विक्र ेते किशोर कोठावदे व अनिल मालपुरे यांनी सांगितले . शिक्षण विभागाने शाळांना सूचना दिल्याप्रमाणे पहिल्या दिवशी सकाळी ८ ते ९ या वेळेत शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात येऊन ग्रामीण व आदिवासी भागात सकाळी ७ ते ७.३० या वेळेत गावात प्रभात फेरी काढण्यात आली . त्यानंतर विद्यार्थ्यांंना पाठ्यपुस्तके आणि फुल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सकाळी १० वाजता परिपाठ घेण्यात येऊन त्यानंतर अध्यापनास सुरु वात करण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांना दिल्या होत्या.

टॅग्स :Schoolशाळा