शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

भातोड्याचा लौकीक इतिहासजमा होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 16:24 IST

भातक्षेत्रात घट : काही शेतकरी कुटुंबाकडून वारसा जतन

ठळक मुद्देपरिसरातील सुमारे ५०० एकर शेतीक्षेत्रात कमोद गरीकोळपी, काळकुडी पेर अशा जातीच्या भाताचे उत्पादन घेण्यात येत असे

प्रवीण दोशीवणी : एकेकाळी शंभर टक्के भात उत्पादनामुळे ‘भातोडा’ हे नाव धारण करणाऱ्या भातोडा गावाचा लौकीक आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. कमी लागवड क्षेत्र आणि नगदी पिके घेण्याचा कल यामुळे भातोड्यातील भात उत्पादनात घट झाली आहे. क्षेत्रात घट झाली असली तरी काही शेतकरी कुटुंबाकडून मात्र भात उत्पादनाचा पारंपारिक वारसा जपला जाताना दिसून येत आहे.सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बहुल भातोडा गावाची लोकसंख्या अवघी २१०० आहे. भाताची शेती हा येथील परंपरागत व्यवसाय. परिसरातील सुमारे ५०० एकर शेतीक्षेत्रात कमोद गरीकोळपी, काळकुडी पेर अशा जातीच्या भाताचे उत्पादन घेण्यात येत असे. त्यावेळी नदीवर तात्पुरत्या स्वरूपाचे बंधारे बांधून, विहिरीतील पाणी मोटेद्वारे काढुन तर ब-याच अंशी पावसाच्या पाण्यावर भातशेती अवलंबून असे. संपूर्णत: नैसर्गिक पदध्तीने शेणखत टाकुन भात उत्पादित केला जायचा. लावणी, निंदणी, कापणी, मळणी, पात धरणे, पेंढ्या बांधून झटकणे, रचणे व वाळविणे अशा प्रक्रियेत १२० दिवसांचा कालावधी जायचा. त्यावेळी कुटुंबातील महिलावर्ग पुरुषांच्या बरोबरीने करून भात उत्पादन वाढविण्यासाठी अग्रभागी राहायचा. भातवाळवणीनंतर बैलगाडयांमधून वाहतुक करून गरजेनुसार हॉलर मिलमधून भात काढुन तांदुळ विक्र ीतून उदरिनर्वाह व्हायचा. विशेष म्हणजे भातोड्याचा तांदुळ पंचक्र ोशीत प्रसिद्ध असल्याने बाहेरगावचे ग्राहक खास भातोडा येथे खरेदीसाठी यायचे. मात्र, कालौघात १९९५ च्या नंतर शेतकरी द्राक्ष, टमाटा, भाजीपाला या नगदी पिकांसह दुग्ध व्यवसायाकडे वळाले. हळूहळू क्षेत्र कमी होऊन भाताच्या उत्पादनात घट होत गेली. मात्र, भातोडे गावाचा भात उत्पादनाचा हा वारसा आजही काही कुटुंब जोपासताना दिसून येतात. सध्यस्थितीत १०० एकर क्षेत्रात इंद्रायणी दप्तरी, कोळपी, बासमती, आर 24, पार्वती, रत्नागिरी, पेरभात अशा जातीच्या भाताचे उत्पादन घेण्यात असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली.या वर्षी मोठ्या प्रमाणावर पिक भातोडागावात भातक्षेत्र घटले असले तरी दर्जेदार भात उत्पादनाचा नावलौकीक कायम आहे. दरम्यान या वर्षी भात पिकाची पश्चिम पट्यात उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. अतिवृष्टीचा फटका इतर पिकांच्या तुलनेत भाताला कमी बसला तसेच भरपूर पाणी मिळाल्याने भाताचे पिक या वर्षी मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे.- नीलेश गायकवाड, शेतकरी, करंजाळी

टॅग्स :Nashikनाशिक