शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

भातोड्याचा लौकीक इतिहासजमा होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 16:24 IST

भातक्षेत्रात घट : काही शेतकरी कुटुंबाकडून वारसा जतन

ठळक मुद्देपरिसरातील सुमारे ५०० एकर शेतीक्षेत्रात कमोद गरीकोळपी, काळकुडी पेर अशा जातीच्या भाताचे उत्पादन घेण्यात येत असे

प्रवीण दोशीवणी : एकेकाळी शंभर टक्के भात उत्पादनामुळे ‘भातोडा’ हे नाव धारण करणाऱ्या भातोडा गावाचा लौकीक आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. कमी लागवड क्षेत्र आणि नगदी पिके घेण्याचा कल यामुळे भातोड्यातील भात उत्पादनात घट झाली आहे. क्षेत्रात घट झाली असली तरी काही शेतकरी कुटुंबाकडून मात्र भात उत्पादनाचा पारंपारिक वारसा जपला जाताना दिसून येत आहे.सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बहुल भातोडा गावाची लोकसंख्या अवघी २१०० आहे. भाताची शेती हा येथील परंपरागत व्यवसाय. परिसरातील सुमारे ५०० एकर शेतीक्षेत्रात कमोद गरीकोळपी, काळकुडी पेर अशा जातीच्या भाताचे उत्पादन घेण्यात येत असे. त्यावेळी नदीवर तात्पुरत्या स्वरूपाचे बंधारे बांधून, विहिरीतील पाणी मोटेद्वारे काढुन तर ब-याच अंशी पावसाच्या पाण्यावर भातशेती अवलंबून असे. संपूर्णत: नैसर्गिक पदध्तीने शेणखत टाकुन भात उत्पादित केला जायचा. लावणी, निंदणी, कापणी, मळणी, पात धरणे, पेंढ्या बांधून झटकणे, रचणे व वाळविणे अशा प्रक्रियेत १२० दिवसांचा कालावधी जायचा. त्यावेळी कुटुंबातील महिलावर्ग पुरुषांच्या बरोबरीने करून भात उत्पादन वाढविण्यासाठी अग्रभागी राहायचा. भातवाळवणीनंतर बैलगाडयांमधून वाहतुक करून गरजेनुसार हॉलर मिलमधून भात काढुन तांदुळ विक्र ीतून उदरिनर्वाह व्हायचा. विशेष म्हणजे भातोड्याचा तांदुळ पंचक्र ोशीत प्रसिद्ध असल्याने बाहेरगावचे ग्राहक खास भातोडा येथे खरेदीसाठी यायचे. मात्र, कालौघात १९९५ च्या नंतर शेतकरी द्राक्ष, टमाटा, भाजीपाला या नगदी पिकांसह दुग्ध व्यवसायाकडे वळाले. हळूहळू क्षेत्र कमी होऊन भाताच्या उत्पादनात घट होत गेली. मात्र, भातोडे गावाचा भात उत्पादनाचा हा वारसा आजही काही कुटुंब जोपासताना दिसून येतात. सध्यस्थितीत १०० एकर क्षेत्रात इंद्रायणी दप्तरी, कोळपी, बासमती, आर 24, पार्वती, रत्नागिरी, पेरभात अशा जातीच्या भाताचे उत्पादन घेण्यात असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली.या वर्षी मोठ्या प्रमाणावर पिक भातोडागावात भातक्षेत्र घटले असले तरी दर्जेदार भात उत्पादनाचा नावलौकीक कायम आहे. दरम्यान या वर्षी भात पिकाची पश्चिम पट्यात उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. अतिवृष्टीचा फटका इतर पिकांच्या तुलनेत भाताला कमी बसला तसेच भरपूर पाणी मिळाल्याने भाताचे पिक या वर्षी मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे.- नीलेश गायकवाड, शेतकरी, करंजाळी

टॅग्स :Nashikनाशिक