शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘ड्रॅगन’विरोधात संतापाची लाट : चिनी उत्पादनांकडे ग्राहकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 21:30 IST

पावसाचे आगमन होताच शहरात रेनकोट आणि रंगीबेरंगी छत्र्यांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. परंतु टाळेबंदीमुळे तब्बल तीन महिने व्यवसाय ठप्प असल्याने बाजारात आता या वस्तूंच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा स्थितीत चिनी वस्तू काही प्रमाणात स्वस्त मिळत असल्या तरी सध्या भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी यंदा चिनी वस्तूंकडे पाठ फिरवली आहे. 

ठळक मुद्देचीन विरोधात नाशिककरांमध्ये संतापाची लाटचिनी उत्पादनांवर ग्राहकांचाही बहिष्कार

नाशिक: पावसाचे आगमन होताच शहरात रेनकोट आणि रंगीबेरंगी छत्र्यांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. परंतु टाळेबंदीमुळे तब्बल तीन महिने व्यवसाय ठप्प असल्याने बाजारात आता या वस्तूंच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा स्थितीत चिनी वस्तू काही प्रमाणात स्वस्त मिळत असल्या तरी सध्या भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी यंदा चिनी वस्तूंकडे पाठ फिरवली असून चिनी वस्तूंऐवजी ग्राहकांकडून स्वदेशी वस्तूंना मागणी होत असल्याचे दिसून येत आहे. नाशकात यंदा पावसाचे दणक्यात आगमन झाल्याने नाशिककर सुखावले आहेत. मात्र सध्या कोरोनाच्या संकाटामुळे बाजारपेठेवर गेल्या काही दिवसांपासून निर्बंध असल्याने अनेक नाशिकरांनी पावसाळ्यात लागणाऱ्या छत्री, रेनकोटसारख्या वस्तूंची खरेदी केलेली नव्हती. मात्र आता सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे बहुतांश दुकाने आता सुरू झाली असून, नोकरदार आणि सर्वच वर्गाकडून छत्री आणि रेनकोटच्या दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा छत्री व रेनकोटचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. काही दुकानदारांनी करोना काळातील दुकाने बंद असल्याचा फायदा घेत दरात वाढ केली आहे. छत्री अथवा रेनकोटवर छापलेली किंमत नसते. त्यावर केवळ किमतीचे स्टिकर लावण्यात येते. अनेक दुकानदारांनी झालेला तोटा भरून काढण्यासाठी किमती वाढवत आहेत. मार्केटमध्ये प्रिंटेड, फोल्डिंग, आर्मी सिल्वर, रेम्बो छत्री, मल्टिकलर, आर्मी सिल्व्हर, फॅमिली पॅक व गार्डन छत्री, ट्रान्सपरेंट, पॉकेट छत्री, हॅट अम्ब्रेला, मुलांसाठी कार्टून कॅरेक्टर व फ्लोरोसेंट रंगाच्या छत्र्यांचा साठा आलेला आहे. यंदाही या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर होण्याची अपेक्षा असल्याने नवीन प्रकारच्या वस्तूही दाखल झाल्या आहेत. परंतु, यातील चीन उत्पादनांकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. भारत-चीन सीमेवरील गवलान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण भारतभरातून चीनविरोधात संताप उफाळून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नाशिककरांमध्ये चीनच्या या कृत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, ग्राहकांनीही चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्याचे दिसून येत आहे. दरम्यान,  अनेक भारतीय नागरिक चिनी वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे चीनला आर्थिकबळ मिळत आहे. परंतु चीनकडून या बळाचा वापर भारताविरोधात होणार असेल तर प्रत्येक भारतीय नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालायला हवा अशी प्रतिक्रिया काही ग्राहकांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :border disputeसीमा वादNashikनाशिकMarketबाजारRainपाऊसBorderसीमारेषा