शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्रॅगन’विरोधात संतापाची लाट : चिनी उत्पादनांकडे ग्राहकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 21:30 IST

पावसाचे आगमन होताच शहरात रेनकोट आणि रंगीबेरंगी छत्र्यांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. परंतु टाळेबंदीमुळे तब्बल तीन महिने व्यवसाय ठप्प असल्याने बाजारात आता या वस्तूंच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा स्थितीत चिनी वस्तू काही प्रमाणात स्वस्त मिळत असल्या तरी सध्या भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी यंदा चिनी वस्तूंकडे पाठ फिरवली आहे. 

ठळक मुद्देचीन विरोधात नाशिककरांमध्ये संतापाची लाटचिनी उत्पादनांवर ग्राहकांचाही बहिष्कार

नाशिक: पावसाचे आगमन होताच शहरात रेनकोट आणि रंगीबेरंगी छत्र्यांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. परंतु टाळेबंदीमुळे तब्बल तीन महिने व्यवसाय ठप्प असल्याने बाजारात आता या वस्तूंच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा स्थितीत चिनी वस्तू काही प्रमाणात स्वस्त मिळत असल्या तरी सध्या भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी यंदा चिनी वस्तूंकडे पाठ फिरवली असून चिनी वस्तूंऐवजी ग्राहकांकडून स्वदेशी वस्तूंना मागणी होत असल्याचे दिसून येत आहे. नाशकात यंदा पावसाचे दणक्यात आगमन झाल्याने नाशिककर सुखावले आहेत. मात्र सध्या कोरोनाच्या संकाटामुळे बाजारपेठेवर गेल्या काही दिवसांपासून निर्बंध असल्याने अनेक नाशिकरांनी पावसाळ्यात लागणाऱ्या छत्री, रेनकोटसारख्या वस्तूंची खरेदी केलेली नव्हती. मात्र आता सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे बहुतांश दुकाने आता सुरू झाली असून, नोकरदार आणि सर्वच वर्गाकडून छत्री आणि रेनकोटच्या दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा छत्री व रेनकोटचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. काही दुकानदारांनी करोना काळातील दुकाने बंद असल्याचा फायदा घेत दरात वाढ केली आहे. छत्री अथवा रेनकोटवर छापलेली किंमत नसते. त्यावर केवळ किमतीचे स्टिकर लावण्यात येते. अनेक दुकानदारांनी झालेला तोटा भरून काढण्यासाठी किमती वाढवत आहेत. मार्केटमध्ये प्रिंटेड, फोल्डिंग, आर्मी सिल्वर, रेम्बो छत्री, मल्टिकलर, आर्मी सिल्व्हर, फॅमिली पॅक व गार्डन छत्री, ट्रान्सपरेंट, पॉकेट छत्री, हॅट अम्ब्रेला, मुलांसाठी कार्टून कॅरेक्टर व फ्लोरोसेंट रंगाच्या छत्र्यांचा साठा आलेला आहे. यंदाही या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर होण्याची अपेक्षा असल्याने नवीन प्रकारच्या वस्तूही दाखल झाल्या आहेत. परंतु, यातील चीन उत्पादनांकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. भारत-चीन सीमेवरील गवलान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण भारतभरातून चीनविरोधात संताप उफाळून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नाशिककरांमध्ये चीनच्या या कृत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, ग्राहकांनीही चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्याचे दिसून येत आहे. दरम्यान,  अनेक भारतीय नागरिक चिनी वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे चीनला आर्थिकबळ मिळत आहे. परंतु चीनकडून या बळाचा वापर भारताविरोधात होणार असेल तर प्रत्येक भारतीय नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालायला हवा अशी प्रतिक्रिया काही ग्राहकांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :border disputeसीमा वादNashikनाशिकMarketबाजारRainपाऊसBorderसीमारेषा