शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात टरबूज शेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 23:55 IST

पाटोदा : कोरोनामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे येवला तालुक्यातील शेकडो एकरावरील टरबूज पीक धोक्यात आले असून, लाखो रु पयांचे नुकसानीने उत्पादक हवालदिल झाले आहेत. विक्रीअभावी हजारो क्विंटल माल शेतात पडून असून, तो खराब होत आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : ग्राहक, व्यापाऱ्यांची खरेदीकडे पाठ; लाखो रु पयांचा खर्च पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : कोरोनामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे येवला तालुक्यातील शेकडो एकरावरील टरबूज पीक धोक्यात आले असून, लाखो रु पयांचे नुकसानीने उत्पादक हवालदिल झाले आहेत. विक्रीअभावी हजारो क्विंटल माल शेतात पडून असून, तो खराब होत आहे.यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने विहिरींना पाणी उपलब्ध होते. पालखेड कालव्यास शेतीसाठी दोन आवर्तन मिळाल्याने अनेक शेतकºयांनी लाखो रुपये खर्च करून टरबूजचे उत्पादन घेतले. सध्या टरबूज काढणीचा हंगाम सुरू आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी लागू असल्याने वाहतूकव्यवस्था ठप्प झाली आहे. टरबूज हा माल नाशवंत असल्यामुळे साठवून ठेवता येत नाही. येत्या आठ-दहा दिवसात टरबूज विक्र ी न झाल्यास टरबूज उत्पादक शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून, टरबूज उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामाचा ऐन हातातोंडाशी आलेला घास हिसकावून नेला. त्यामुळे शेतकºयांना कर्जबाजारी व्हावे लागले. या पावसाने कांदा रोपे सडून गेल्याने व नंतर दोन-तीन वेळेस बियाणे टाकूनही धुके, दव तसेच हवामानातील बदलामुळे रोपे खराब झाल्याने अनेक शेतकºयांनी कांदा लागवडीचा नाद सोडून पारंपरिक पिकांना फाटा देत भाजीपाला व टरबूज उत्पादन घेतले. त्यासाठी लाखो रु पयांचा खर्च केला, मात्र ऐन काढणीच्या वेळेसच कोरोना या जीवघेण्या आजाराने हाहाकार माजवल्याने सर्वत्र संचारबंदी व लॉकडाउन सुरू असल्याने दळणवळण व्यवस्था ठप्प झाली. त्यामुळे उत्पादित झालेला माल शेतात कुजून चालला असल्याने शेतकºयांना लाखोरु पयांचा फटका बसला आहे. यावर्षी आॅक्टोबर महिन्यात अवकाळी का होईना, पण समाधानकारक पाऊस झाल्याने मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतात पारंपरिक पिकांना फाटा देत सुमारे एक लाख रु पयापर्यंत खर्च करून दोन एकर टरबूज उत्पादन घेतले; मात्र सध्या लॉकडाउन व संचारबंदी असल्याने गावोगावी टरबूज विक्र ीसाठी फिरूनही खरेदीसाठी ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे.- निखिल दुघडटरबूज उत्पादक, देशमाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदी व लॉकडाउनमधून जीवनावश्यक वस्तूंना वगळले असले तरी शेतकºयांना रोज उत्पन्न मिळवून देणाºया फळे व भाजीपाला या पिकांना ग्राहकच नसल्याने शेतकºयांना आपला माल रस्त्याच्या कडेला फेकून द्यावा लागत असल्याने लाखो रु पयांचा फटका सहन करावा लागत आहे.महागड्या औषधांचाखर्च वायाटरबूज लागवडीनंतर वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला होता. दिवसभर कडक ऊन, रात्री गारवा व पहाटेच्या सुमारास थंडी, धुके व दव पडत असल्याने पिकाची वाढ खुंटली होती. अनेक शेतकºयांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने टरबूज लागवड केली. त्यामुळे रोजच्या रोज परिस्थितीनुसार पिकावर महागडी औषधांची फवारणी करावी लागल्याने हजारो रु पयांचा वाढीव खर्च करावा लागला. कोरोनाच्या संकटाने शेतकरी वर्गाने केलेला खर्च वाया गेला आहे.

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटFarmerशेतकरी