शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

येवल्यात टरबूज शेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 23:55 IST

पाटोदा : कोरोनामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे येवला तालुक्यातील शेकडो एकरावरील टरबूज पीक धोक्यात आले असून, लाखो रु पयांचे नुकसानीने उत्पादक हवालदिल झाले आहेत. विक्रीअभावी हजारो क्विंटल माल शेतात पडून असून, तो खराब होत आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : ग्राहक, व्यापाऱ्यांची खरेदीकडे पाठ; लाखो रु पयांचा खर्च पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : कोरोनामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे येवला तालुक्यातील शेकडो एकरावरील टरबूज पीक धोक्यात आले असून, लाखो रु पयांचे नुकसानीने उत्पादक हवालदिल झाले आहेत. विक्रीअभावी हजारो क्विंटल माल शेतात पडून असून, तो खराब होत आहे.यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने विहिरींना पाणी उपलब्ध होते. पालखेड कालव्यास शेतीसाठी दोन आवर्तन मिळाल्याने अनेक शेतकºयांनी लाखो रुपये खर्च करून टरबूजचे उत्पादन घेतले. सध्या टरबूज काढणीचा हंगाम सुरू आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी लागू असल्याने वाहतूकव्यवस्था ठप्प झाली आहे. टरबूज हा माल नाशवंत असल्यामुळे साठवून ठेवता येत नाही. येत्या आठ-दहा दिवसात टरबूज विक्र ी न झाल्यास टरबूज उत्पादक शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून, टरबूज उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामाचा ऐन हातातोंडाशी आलेला घास हिसकावून नेला. त्यामुळे शेतकºयांना कर्जबाजारी व्हावे लागले. या पावसाने कांदा रोपे सडून गेल्याने व नंतर दोन-तीन वेळेस बियाणे टाकूनही धुके, दव तसेच हवामानातील बदलामुळे रोपे खराब झाल्याने अनेक शेतकºयांनी कांदा लागवडीचा नाद सोडून पारंपरिक पिकांना फाटा देत भाजीपाला व टरबूज उत्पादन घेतले. त्यासाठी लाखो रु पयांचा खर्च केला, मात्र ऐन काढणीच्या वेळेसच कोरोना या जीवघेण्या आजाराने हाहाकार माजवल्याने सर्वत्र संचारबंदी व लॉकडाउन सुरू असल्याने दळणवळण व्यवस्था ठप्प झाली. त्यामुळे उत्पादित झालेला माल शेतात कुजून चालला असल्याने शेतकºयांना लाखोरु पयांचा फटका बसला आहे. यावर्षी आॅक्टोबर महिन्यात अवकाळी का होईना, पण समाधानकारक पाऊस झाल्याने मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतात पारंपरिक पिकांना फाटा देत सुमारे एक लाख रु पयापर्यंत खर्च करून दोन एकर टरबूज उत्पादन घेतले; मात्र सध्या लॉकडाउन व संचारबंदी असल्याने गावोगावी टरबूज विक्र ीसाठी फिरूनही खरेदीसाठी ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे.- निखिल दुघडटरबूज उत्पादक, देशमाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदी व लॉकडाउनमधून जीवनावश्यक वस्तूंना वगळले असले तरी शेतकºयांना रोज उत्पन्न मिळवून देणाºया फळे व भाजीपाला या पिकांना ग्राहकच नसल्याने शेतकºयांना आपला माल रस्त्याच्या कडेला फेकून द्यावा लागत असल्याने लाखो रु पयांचा फटका सहन करावा लागत आहे.महागड्या औषधांचाखर्च वायाटरबूज लागवडीनंतर वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला होता. दिवसभर कडक ऊन, रात्री गारवा व पहाटेच्या सुमारास थंडी, धुके व दव पडत असल्याने पिकाची वाढ खुंटली होती. अनेक शेतकºयांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने टरबूज लागवड केली. त्यामुळे रोजच्या रोज परिस्थितीनुसार पिकावर महागडी औषधांची फवारणी करावी लागल्याने हजारो रु पयांचा वाढीव खर्च करावा लागला. कोरोनाच्या संकटाने शेतकरी वर्गाने केलेला खर्च वाया गेला आहे.

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटFarmerशेतकरी