शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

गोरेराम लेन परिसरात पाणीबाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:05 IST

गेल्या महासभेत शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर सुमारे सहा तास चर्चा झाल्यानंतरदेखील शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असून, गोरेराम लेनमध्ये तर महिनाभरापासून अनेक भागात पाणी मिळणे बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

नाशिक : गेल्या महासभेत शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर सुमारे सहा तास चर्चा झाल्यानंतरदेखील शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असून, गोरेराम लेनमध्ये तर महिनाभरापासून अनेक भागात पाणी मिळणे बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. येथील नागरिकांना सोन्या मारोती मंदिराजवळील सार्वजनिक नळावरून पाणी भरावे लागत आहे.महापालिकेने शहरात पाणीकपात केल्यानंतर त्याचे अनेक भागात नियोजन चुकले असून, पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. गेल्या १९ जुलै रोजी झालेल्या महासभेत यासंदर्भात जोरदार चर्चा झाली होती. महापालिकेचे अधिकारी आणि अभियंत्यांना महापौरांनी तंबी देऊन भल्या सकाळी फिरून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले होते.परंतु त्याचा फार फायदा झालेला नाही. शहरातील मध्यवर्ती भागातील रविवार कारंजा परिसरातील गोरेराम लेन येथे गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाई जाणवत असून, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारी करूनदेखील कार्यवाही झालेली नाही.अन्यत्र भटकंतीगेल्या महिनाभरापासून लेनमधील नागरिकांना सराफ बाजारातील सार्वजनिक नळाच्या ठिकाणी जावे लागते. तेथे सकाळी सहा ते सात या वेळात भरावे लागते. परंतु अन्य भागातील लोक त्याठिकाणीच पाणी भरण्यासाठी येत असल्याने तेथेही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यातच अनेक नागरिक कमी दाबाने पाणी येत असल्याने ते मोटारी लावून नळाचे पाणी खेचून घेतात त्यामुळे काही नागरिकांना पाणीच मिळत नाही.गेल्या महिनाभरापासून परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. महापालिकेनेही समस्या तातडीने सोडवावी. पाण्याअभावी नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते़- भारत मैड, रहिवासी, गुप्ता वाडापिण्याचे पाणी शोधावे लागत असल्याने हाल होतात. शाळा सोडून मुलांना स्टॅँडपोस्टवर पाणी भरण्यासाठी ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे आम्हाला वेळेवर शाळेत जाता येत नाही़ तसेच अभ्यासावर देखील परिणाम होत आहे़- प्रसाद भालेकर, विद्यार्थीपाणी मिळत नसल्याने महिलांना काम सोडून धावपळ करावी लागते आणि स्टॅँड पोस्टवरून पाणी आणावे लागते. महापालिकेने पाणीपुरवठा सुरळीत केला पाहिजे. पाण्याअभावी घरातील अनेक कामे पडून राहतात़- मंदा ढापसे, साळुंके वाडापरिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येते, जवळपास पाणी मिळत नसल्याने महिलांना पाण्यासाठी फिरावे लागते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा़- उषा कपिला, रहिवासी

टॅग्स :WaterपाणीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका