शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

गोरेराम लेन परिसरात पाणीबाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:05 IST

गेल्या महासभेत शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर सुमारे सहा तास चर्चा झाल्यानंतरदेखील शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असून, गोरेराम लेनमध्ये तर महिनाभरापासून अनेक भागात पाणी मिळणे बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

नाशिक : गेल्या महासभेत शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर सुमारे सहा तास चर्चा झाल्यानंतरदेखील शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असून, गोरेराम लेनमध्ये तर महिनाभरापासून अनेक भागात पाणी मिळणे बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. येथील नागरिकांना सोन्या मारोती मंदिराजवळील सार्वजनिक नळावरून पाणी भरावे लागत आहे.महापालिकेने शहरात पाणीकपात केल्यानंतर त्याचे अनेक भागात नियोजन चुकले असून, पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. गेल्या १९ जुलै रोजी झालेल्या महासभेत यासंदर्भात जोरदार चर्चा झाली होती. महापालिकेचे अधिकारी आणि अभियंत्यांना महापौरांनी तंबी देऊन भल्या सकाळी फिरून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले होते.परंतु त्याचा फार फायदा झालेला नाही. शहरातील मध्यवर्ती भागातील रविवार कारंजा परिसरातील गोरेराम लेन येथे गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाई जाणवत असून, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारी करूनदेखील कार्यवाही झालेली नाही.अन्यत्र भटकंतीगेल्या महिनाभरापासून लेनमधील नागरिकांना सराफ बाजारातील सार्वजनिक नळाच्या ठिकाणी जावे लागते. तेथे सकाळी सहा ते सात या वेळात भरावे लागते. परंतु अन्य भागातील लोक त्याठिकाणीच पाणी भरण्यासाठी येत असल्याने तेथेही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यातच अनेक नागरिक कमी दाबाने पाणी येत असल्याने ते मोटारी लावून नळाचे पाणी खेचून घेतात त्यामुळे काही नागरिकांना पाणीच मिळत नाही.गेल्या महिनाभरापासून परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. महापालिकेनेही समस्या तातडीने सोडवावी. पाण्याअभावी नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते़- भारत मैड, रहिवासी, गुप्ता वाडापिण्याचे पाणी शोधावे लागत असल्याने हाल होतात. शाळा सोडून मुलांना स्टॅँडपोस्टवर पाणी भरण्यासाठी ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे आम्हाला वेळेवर शाळेत जाता येत नाही़ तसेच अभ्यासावर देखील परिणाम होत आहे़- प्रसाद भालेकर, विद्यार्थीपाणी मिळत नसल्याने महिलांना काम सोडून धावपळ करावी लागते आणि स्टॅँड पोस्टवरून पाणी आणावे लागते. महापालिकेने पाणीपुरवठा सुरळीत केला पाहिजे. पाण्याअभावी घरातील अनेक कामे पडून राहतात़- मंदा ढापसे, साळुंके वाडापरिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येते, जवळपास पाणी मिळत नसल्याने महिलांना पाण्यासाठी फिरावे लागते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा़- उषा कपिला, रहिवासी

टॅग्स :WaterपाणीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका