शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

‘जलयुक्त’ गावांमध्ये पाणी कुठे मुरले?

By admin | Updated: May 1, 2017 01:10 IST

जलयुक्तची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेली असताना संबंधीत गावांमध्येच टॅँकर सुरू करण्याची वेळ आल्याने त्यावरील २०० कोटींच्या खर्चाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

 श्याम बागुल  नाशिकराज्य शासनाने राबविलेल्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेली असताना संबंधीत गावांमध्येच पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर टॅँकर सुरू करण्याची वेळ आल्याने ही कामे व त्यावरील सुमारे २०० कोटींच्या खर्चाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे जलयुक्त शिवार योजनेमुळे भुगर्भातील पाण्याची पातळी वाढली असे एकीकडे छातीठोकपणे सांगितले जात असताना प्रत्यक्षात त्याही बाबतीतली बनवेगिरी शासकीय आकडेवारीनेच उघड झाली आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेबाबत जिल्हा प्रशासनाने केलेले दावे किती आभासी आहेत, याचा प्रत्यय येऊन गेला आहे. ‘पावसाचे पाणीच जमिनीत मुरते’ हे भूजलतज्ज्ञांचे सर्वमान्य शास्त्र असताना सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २२९ गावांमध्ये करण्यात आलेल्या ८१०० विविध कामांमुळेच पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचा दावा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केला आहे. परंतु काही ‘जलयुक्त’ गावांमध्येच चक्क टॅँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याने या योजनेवरील सुमारे २०० कोटी रुपयांच्या खर्चाबाबत नेमके पाणी कुठे मुरले, हा संशोधनाचा भाग बनला आहे. गेल्या वर्षी जुन ते सप्टेंबर या तीन महिन्यांत जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०२ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर भूजल पातळीत सरासरी पाच ते सहा फुटांपर्यंत वाढ अपेक्षितच धरली जात असल्याचे भुजल सर्व्हेक्षण विभागाचे म्हणणे आहे. यात जलयुक्तची भर पडत्यामुळे भुगर्भातील पाणी साठ्यात वाढ होऊन संबंधित गावांतील पाणीटंचाई कमी झाल्याच्या तसेच शेती शिवार फुलल्याच्या यशोगाथा कानी पडायला हव्यात. परंतु, १४ गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामे होऊनही प्रशासनावर तेथे टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली आहे. मालेगाव तालुक्यात एक मिली मीटरही विहिरींच्या पाणी साठ्यात वाढ झाली नसल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातील २२९ गावांमध्ये करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील ८१०० विविध प्रकारच्या कामांवर विविध यंत्रणांनी एकाच वर्षात तब्बल १८० कोटी ७० लाख रुपये खर्च केले आहेत. पण टँकरमुक्ती होऊ शकली नाही़एप्रिलअखेर जिल्ह्यात काही गावांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वाढता उष्मा आणि धरणातील कमी होत चाललेला पाणीसाठा पाहता मे आणि जून महिन्यांत परिस्थितीत आणखी बदल होऊन टॅँकरची संख्या वाढू शकते. कदाचित जलयुक्त गावांनाही टॅँकरने पाणीपुरवठ्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे यंदा जलयुक्त गावांमध्ये एकही टॅँकर सुरू होऊ शकला नसल्याचा दावा तकलादू आणि शासनाचीच दिशाभूल करणारा ठरला आहे़प्रशासनाची ‘अशीही’ बनवाबनवीजिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१६-१७ मध्ये २१८ गावांमध्ये ४३३३ इतकी कामे करण्यात येणार असून, त्यापैकी ३३२७ इतकी कामे पुर्ण झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे. विशेष म्हणजे जलयुक्त शिवार योजनेची कामे केलेल्या गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा न करण्याची भूमिका घेणाऱ्या प्रशासनाने जलयुक्तची कामे झालेल्या गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी यंदा कोट्यवधीची तरतूद कायम ठेवली आहे तसेच टंचाई आराखड्यात जलयुक्तची कामे झालेल्या गावांचाही समावेश करण्याची बनवेगिरीही केली आहे.