शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

वडाळ्यात दूषित पाणीपुरवठा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:14 IST

वडाळागाव परिसरात साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविताना आरोग्य विभागाची दमछाक होत असताना पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजी कारभार सुरूच असल्याने आता नागरिकांना दूषित पिण्याच्या पाण्यावाटे पसरणाऱ्या आजारांचा धोका उद्भवला आहे.

नाशिक : वडाळागाव परिसरात साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविताना आरोग्य विभागाची दमछाक होत असताना पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजी कारभार सुरूच असल्याने आता नागरिकांना दूषित पिण्याच्या पाण्यावाटे पसरणाऱ्या आजारांचा धोका उद्भवला आहे. पाणीपुरवठा विभागाने गलथान कारभाराचा कळस गाठला असून आठवडाभरापासून नागरिकांच्या घरात नळांवाटे पिवळसर पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.  वडाळागाव परिसरात अद्यापही काही भागांमध्ये सांधेदुखी, थंडी-ताप, विषमज्वरसारख्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. अशा परिस्थितीत वडाळागावात पाणीपुरवठा शुद्ध स्वरूपाचा होणे अपेक्षित असताना अधूनमधून नळांना पाणी गढूळ, पिवळसर येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वडाळागावात शुद्ध पाणीपुरवठा केला जावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. वडाळागाव परिसरातील नागरिकांना पोटदूखी, जुलाब, अतिसारसारख्या शारीरिक तक्रारींचाही सामना करावा लागत आहे. यामुळे दिवसेंदिवस वडाळागाव परिसरातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. वारंवार मागणी करूनदेखील वडाळागावात नियमित स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याने जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.  वडाळागावातील गढूळ पाणीपुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यास पाणीपुरवठा विभागाला अद्याप यश आलेले नाही. दोन दिवसांआड वडाळागावात अशुद्ध पाणी नळांना येत असल्याचे महिलांनी सांगितले. ही समस्या गावातील एका विशिष्ट परिसराची नसून संपूर्ण गावात पिवळसर पाणी येऊ लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा विभागाने तातडीने दखल घेऊन वडाळागावात शुद्ध स्वरुपाचा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.जलवाहिन्यांना अंतर्गत गळतीचा संशयवडाळागाव परिसरातील जलवाहिन्या जुनाट झाल्या असून, या जलवाहिन्यांपैकी काही जलवाहिन्यांना अंतर्गत गळती लागली असल्याची शक्यता नाकारता येणारी नाही. त्यामुळे जलवाहिन्या ‘वॉश आउट’ करून तपासणी करण्याची गरज आहे. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी शुद्ध करण्याबाबतची यंत्रणाही तपासण्याची आवश्यकता आहे.बोधलेनगरलाही समस्याअशोकामार्ग, बोधलेनगर, कल्पतरूनगर, फातेमानगर, खोडेनगर, अंजुम पार्क, हॅप्पीहोम कॉलनी, गणेशबाबानगर या भागांमध्येही मागील तीन ते चार दिवसांपासून मातीमिश्रित गढूळ स्वरूपाचा पाणीपुरवठा येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. प्रभाग क्रमांक २९ व ३०मध्ये पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या असून या भागातील नागरिकांनी शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater pollutionजल प्रदूषण