शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

वडाळ्यात दूषित पाणीपुरवठा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:14 IST

वडाळागाव परिसरात साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविताना आरोग्य विभागाची दमछाक होत असताना पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजी कारभार सुरूच असल्याने आता नागरिकांना दूषित पिण्याच्या पाण्यावाटे पसरणाऱ्या आजारांचा धोका उद्भवला आहे.

नाशिक : वडाळागाव परिसरात साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविताना आरोग्य विभागाची दमछाक होत असताना पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजी कारभार सुरूच असल्याने आता नागरिकांना दूषित पिण्याच्या पाण्यावाटे पसरणाऱ्या आजारांचा धोका उद्भवला आहे. पाणीपुरवठा विभागाने गलथान कारभाराचा कळस गाठला असून आठवडाभरापासून नागरिकांच्या घरात नळांवाटे पिवळसर पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.  वडाळागाव परिसरात अद्यापही काही भागांमध्ये सांधेदुखी, थंडी-ताप, विषमज्वरसारख्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. अशा परिस्थितीत वडाळागावात पाणीपुरवठा शुद्ध स्वरूपाचा होणे अपेक्षित असताना अधूनमधून नळांना पाणी गढूळ, पिवळसर येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वडाळागावात शुद्ध पाणीपुरवठा केला जावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. वडाळागाव परिसरातील नागरिकांना पोटदूखी, जुलाब, अतिसारसारख्या शारीरिक तक्रारींचाही सामना करावा लागत आहे. यामुळे दिवसेंदिवस वडाळागाव परिसरातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. वारंवार मागणी करूनदेखील वडाळागावात नियमित स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याने जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.  वडाळागावातील गढूळ पाणीपुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यास पाणीपुरवठा विभागाला अद्याप यश आलेले नाही. दोन दिवसांआड वडाळागावात अशुद्ध पाणी नळांना येत असल्याचे महिलांनी सांगितले. ही समस्या गावातील एका विशिष्ट परिसराची नसून संपूर्ण गावात पिवळसर पाणी येऊ लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा विभागाने तातडीने दखल घेऊन वडाळागावात शुद्ध स्वरुपाचा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.जलवाहिन्यांना अंतर्गत गळतीचा संशयवडाळागाव परिसरातील जलवाहिन्या जुनाट झाल्या असून, या जलवाहिन्यांपैकी काही जलवाहिन्यांना अंतर्गत गळती लागली असल्याची शक्यता नाकारता येणारी नाही. त्यामुळे जलवाहिन्या ‘वॉश आउट’ करून तपासणी करण्याची गरज आहे. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी शुद्ध करण्याबाबतची यंत्रणाही तपासण्याची आवश्यकता आहे.बोधलेनगरलाही समस्याअशोकामार्ग, बोधलेनगर, कल्पतरूनगर, फातेमानगर, खोडेनगर, अंजुम पार्क, हॅप्पीहोम कॉलनी, गणेशबाबानगर या भागांमध्येही मागील तीन ते चार दिवसांपासून मातीमिश्रित गढूळ स्वरूपाचा पाणीपुरवठा येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. प्रभाग क्रमांक २९ व ३०मध्ये पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या असून या भागातील नागरिकांनी शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater pollutionजल प्रदूषण