शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मेहबूबनगर येथे टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:41 IST

वडाळागावातील मेहबूबनगर परिसरात अत्यंत कमी व कमी वेळेत होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे महिलावर्गास कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच काही भागात तर पाणीपुरवठा होत नसल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.

इंदिरानगर : वडाळागावातील मेहबूबनगर परिसरात अत्यंत कमी व कमी वेळेत होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे महिलावर्गास कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच काही भागात तर पाणीपुरवठा होत नसल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.वडाळागावातील मेहबूबनगर, गुलशननगर, सादिकनगर, मुमताजनगर, मदारनगर यांसह परिसरात सुमारे सहा हजार लोकांची वस्ती आहे. यामध्ये बहुतेक हातावर काम करणाऱ्यांची वस्ती म्हणून ओळखली जाते. सुमारे चार महिन्यांपासून या परिसरात अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे. तसेच काही भागात पाणीपुरवठा होत नसल्याचे महिला वर्गाने तक्र ार केली आहे. ऐन उन्हाळ्यात महिलावर्गाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.पाणीपुरवठा विभागात तक्रार करूनसुद्धा कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.वणवण भटकंती वडाळागावातील परिसरात बहुतेक मुस्लीम वस्ती असल्याने रमजानचे उपवास सुरू असून, ऐन उन्हाळ्यात महिलावर्गात पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. परिसरातील दहा ते पंधरा कुटुंबे एकत्र येऊन पैसे गोळा करून पाण्याचा टँकर मागवत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी