शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपूरठा योजना मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 17:22 IST

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत सिन्नर तालुक्यातील २५ योजनांमधील ३४ गावे व ४१ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. सन २०३५ सालची लोकसंख्या लक्षात घेवून या पाणीपुरवठा योजनांसाठी २३ कोटी ९ लाख ५५ हजार रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिली.

राष्ट्रीय ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास यामुळे मदत होणार आहे. भूजलाची घटती पातळी, पावसाचे कमी होत असलेले प्रमाण, वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी या कारणांमुळे ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यावर प्रचंड ताण येत आहे. यावर उपाययोजना म्हणून केंद्र शासनामार्फत २००९-१० मध्ये वर्धीत वेग ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमाचे रुपांतर  ग्रामीण पेयजल कार्यक्रमात करण्यात आले आहे. या योजनेत तालुक्यातील आगासखिंड - ९५ लाख ९ हजार, बेलू- ८४ लाख ६० हजार, ब्राम्हणवाडे १ कोटी १० लाख ३९ हजार, चंद्रपूर-खापराळे ३० लाख, चास- २ कोटी १२ लाख, डुबेरे - १ कोटी ५९ लाख ७१ हजार, निºहाळे फत्तेपूर- ५३ लाख ६ हजार, फुलेनगर -१९ लाख, खोपडी बुद्रुक- ५७ लाख २९ हजार, मºहळ खुर्द- ३० लाख, मºहळ बुद्रुक- ७१ लाख ९६ हजार, नायगावसह नऊ गावे- ३ कोटी ५० लाख, नळवाडी- १ कोटी ३ लाख ९५ हजार, पास्तेसह तीन गावे - ८२ लाख, पाथरे बुद्रुकसह तीन गावे- १ कोटी १७ लाख ५० हजार, पाटपिंप्रीसह सात गावे- ५६ लाख, पिंपळे- ८५ लाख १४ हजार, पिंपरवाडी- ३२ लाख, सांगवी- ९५ लाख ५० हजार, शहा- ७० लाख, सोनांब- १ कोटी ५४ लाख ६४ हजार, सोनारी- ७१ लाख १५ हजार, सोनेवाडी- ६९ लाख ७१ हजार, सोनगिरी- ६६ लाख ९२ हजार, सुरेगाव- ३१ लाख ३७ हजार यांचा समावेश करण्यात आला आहे. मंजूर योजनांची लवकरच अंदाजपत्र तयार करून त्यास तांत्रिक मान्यता मिळवून निविदा काढण्यात येणार आहे. टंचाईग्रस्त असलेल्या तालुक्यातील या गावांना पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था होणार असल्याने तालुक्यातील टंचाईग्रस्त तालुका म्हणून असणारी ओळख पुसरण्यास मदत होणार आहे. सदर गावातील पिण्याची पाण्याची अडचण दुर होवून ग्रामस्थांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Waterपाणी